शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठाचा कशासाठी अपमान?

By admin | Updated: March 11, 2016 03:34 IST

दक्षिण महाराष्ट्राचे आणि सीमा भागातील मराठी भाषिकांचे प्रमुख शैक्षणिक केंद्र म्हणून शिवाजी विद्यापीठाकडे पाहिले जाते.

दक्षिण महाराष्ट्राचे आणि सीमा भागातील मराठी भाषिकांचे प्रमुख शैक्षणिक केंद्र म्हणून शिवाजी विद्यापीठाकडे पाहिले जाते. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर बहुजन समाजातील मुलांची शिक्षणाची सोय व्हावी म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या द्रष्टेपणातून विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय झाला. त्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर अशा चार जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. मात्र, याचे केंद्र कोल्हापूरलाच असावे, असा जोरदार आग्रह तत्कालीन ज्येष्ठ मंत्री बाळासाहेब देसाई यांनी धरला आणि एका चळवळीतून हे विद्यापीठ दिमाखात उभे राहिले. पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांचे समर्पित नेतृत्व त्याला लाभले. थोड्याच अवधीत हे विद्यापीठ म्हणजे कोल्हापूरची अस्मिता ठरली. या विद्यापीठातून अनेक विद्यार्थी घडले. अनेक विषयांवर मूलभूत अभ्यास आणि संशोधनही होत राहिले आहे.अशा या विद्यापीठाने २०१२ मध्ये सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केले. विद्यापीठाने आपल्या ऐतिहासिक परंपरेने आणि कामगिरीला शोभेल असा सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम आखला. ‘लोकमत’सह सर्वच प्रसार माध्यमांनी विद्यापीठाचा गौरव होईल, अशी प्रसिद्धी दिली. शिवाजी विद्यापीठाने दक्षिण महाराष्ट्राच्या जडणघडणीत दिलेल्या योगदानाची दखल घेतली. सुवर्णमहोत्सवानिमित्त विद्यापीठास खास निधी मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करून राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केले. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवाजी विद्यापीठास सुवर्णमहोत्सवी निधी म्हणून ५० कोटी रुपये देण्याचे जाहीर केले. तसा प्रस्ताव मांडण्यास सांगितले. पुढे चव्हाण-पवार यांचे सरकार दोन वर्षे राज्यात सत्तेवर होते. मात्र, विद्यापीठास केवळ साडेतीन कोटी रुपये दिले. विद्यापीठाने वारंवार २५ पत्रे पाठवून आपल्या सुवर्णमहोत्सवी निधीची आठवण राज्य सरकारला दिली. असंख्यवेळा स्वत: कुलगुरू आणि प्रशासन अधिकाऱ्यांनी मंत्रालयात धडका दिल्या. ‘लोकमत’नेहीे अनेकवेळा आवाज उठविला. तत्कालीन उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यांनी केवळ एकाच महिन्यात निधी देण्याचे आश्वासन दिले. नवा प्रस्ताव मागून घेतला. मात्र, एक नवा पैसाही दिला नाही. राज्य मंत्रिमंडळाने यासाठी ४५ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर केला. ‘लोकमत’ने इतका पाठपुरावा केला होता की, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत ही मंजुरी दिल्याने आपल्या प्रसिद्धी अधिकाऱ्यास सांगितले की, ही वार्ता ‘लोकमत’पर्यंत पोहोचवा आणि तिच्या योग्य प्रसिद्धीची अपेक्षाही व्यक्त करा.हे सर्व घडत गेले. त्यांचे सरकारही गेले. त्यालाही आता दोन वर्षे होत आली. नवे उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याही निदर्शनास विद्यापीठ प्रशासनाने ही बाब आणून दिली. त्यांनीही केवळ आश्वासने देण्यापलीकडे काही केले नाही. ज्या शिवाजी विद्यापीठाला एक सामाजिक-शैक्षणिक वारसा लाभला आहे, तो येथील शिक्षणप्रेमी नागरिकांनी आणि प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी जपला आहे, त्याचाच हा अपमान आहे. राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेच्या (नॅक) ‘ए वन’ मूल्यांकनाचा मान अनेक वर्षे शिवाजी विद्यापीठास मिळतो आहे. सुवर्णमहोत्सवी निधीतून वेगवेगळे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवून विद्यापीठाच्या शैक्षणिक वाटचालीस एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न होणार आहे. इतके चांगले प्रस्ताव विद्यापीठाने दिले आहेत. मात्र, राज्य सरकारने दिलेले आश्वासन पाळू नये ही खेदाची बाब आहे. विशेष म्हणजे दक्षिण महाराष्ट्रात विधिमंडळाचे ३० सदस्य (आमदार) आहेत. त्यांपैकी एकानेही हा विषय विधिमंडळात मांडू नये, याचीही निंदा करावी, असे वाटते.- वसंत भोसले