शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

शिवाजी विद्यापीठाचा कशासाठी अपमान?

By admin | Updated: March 11, 2016 03:34 IST

दक्षिण महाराष्ट्राचे आणि सीमा भागातील मराठी भाषिकांचे प्रमुख शैक्षणिक केंद्र म्हणून शिवाजी विद्यापीठाकडे पाहिले जाते.

दक्षिण महाराष्ट्राचे आणि सीमा भागातील मराठी भाषिकांचे प्रमुख शैक्षणिक केंद्र म्हणून शिवाजी विद्यापीठाकडे पाहिले जाते. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर बहुजन समाजातील मुलांची शिक्षणाची सोय व्हावी म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या द्रष्टेपणातून विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय झाला. त्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर अशा चार जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. मात्र, याचे केंद्र कोल्हापूरलाच असावे, असा जोरदार आग्रह तत्कालीन ज्येष्ठ मंत्री बाळासाहेब देसाई यांनी धरला आणि एका चळवळीतून हे विद्यापीठ दिमाखात उभे राहिले. पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांचे समर्पित नेतृत्व त्याला लाभले. थोड्याच अवधीत हे विद्यापीठ म्हणजे कोल्हापूरची अस्मिता ठरली. या विद्यापीठातून अनेक विद्यार्थी घडले. अनेक विषयांवर मूलभूत अभ्यास आणि संशोधनही होत राहिले आहे.अशा या विद्यापीठाने २०१२ मध्ये सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केले. विद्यापीठाने आपल्या ऐतिहासिक परंपरेने आणि कामगिरीला शोभेल असा सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम आखला. ‘लोकमत’सह सर्वच प्रसार माध्यमांनी विद्यापीठाचा गौरव होईल, अशी प्रसिद्धी दिली. शिवाजी विद्यापीठाने दक्षिण महाराष्ट्राच्या जडणघडणीत दिलेल्या योगदानाची दखल घेतली. सुवर्णमहोत्सवानिमित्त विद्यापीठास खास निधी मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करून राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केले. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवाजी विद्यापीठास सुवर्णमहोत्सवी निधी म्हणून ५० कोटी रुपये देण्याचे जाहीर केले. तसा प्रस्ताव मांडण्यास सांगितले. पुढे चव्हाण-पवार यांचे सरकार दोन वर्षे राज्यात सत्तेवर होते. मात्र, विद्यापीठास केवळ साडेतीन कोटी रुपये दिले. विद्यापीठाने वारंवार २५ पत्रे पाठवून आपल्या सुवर्णमहोत्सवी निधीची आठवण राज्य सरकारला दिली. असंख्यवेळा स्वत: कुलगुरू आणि प्रशासन अधिकाऱ्यांनी मंत्रालयात धडका दिल्या. ‘लोकमत’नेहीे अनेकवेळा आवाज उठविला. तत्कालीन उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यांनी केवळ एकाच महिन्यात निधी देण्याचे आश्वासन दिले. नवा प्रस्ताव मागून घेतला. मात्र, एक नवा पैसाही दिला नाही. राज्य मंत्रिमंडळाने यासाठी ४५ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर केला. ‘लोकमत’ने इतका पाठपुरावा केला होता की, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत ही मंजुरी दिल्याने आपल्या प्रसिद्धी अधिकाऱ्यास सांगितले की, ही वार्ता ‘लोकमत’पर्यंत पोहोचवा आणि तिच्या योग्य प्रसिद्धीची अपेक्षाही व्यक्त करा.हे सर्व घडत गेले. त्यांचे सरकारही गेले. त्यालाही आता दोन वर्षे होत आली. नवे उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याही निदर्शनास विद्यापीठ प्रशासनाने ही बाब आणून दिली. त्यांनीही केवळ आश्वासने देण्यापलीकडे काही केले नाही. ज्या शिवाजी विद्यापीठाला एक सामाजिक-शैक्षणिक वारसा लाभला आहे, तो येथील शिक्षणप्रेमी नागरिकांनी आणि प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी जपला आहे, त्याचाच हा अपमान आहे. राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेच्या (नॅक) ‘ए वन’ मूल्यांकनाचा मान अनेक वर्षे शिवाजी विद्यापीठास मिळतो आहे. सुवर्णमहोत्सवी निधीतून वेगवेगळे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवून विद्यापीठाच्या शैक्षणिक वाटचालीस एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न होणार आहे. इतके चांगले प्रस्ताव विद्यापीठाने दिले आहेत. मात्र, राज्य सरकारने दिलेले आश्वासन पाळू नये ही खेदाची बाब आहे. विशेष म्हणजे दक्षिण महाराष्ट्रात विधिमंडळाचे ३० सदस्य (आमदार) आहेत. त्यांपैकी एकानेही हा विषय विधिमंडळात मांडू नये, याचीही निंदा करावी, असे वाटते.- वसंत भोसले