शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

नेमकं काय खरं?

By admin | Updated: July 6, 2016 03:02 IST

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव राजेन्द्र कुमार यांच्यावर भ्रष्टाचाराचा ठपका ठेऊन अखेर शेवटी केन्द्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) त्यांना अटक केली असली तरी नेमकं खरं

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव राजेन्द्र कुमार यांच्यावर भ्रष्टाचाराचा ठपका ठेऊन अखेर शेवटी केन्द्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) त्यांना अटक केली असली तरी नेमकं खरं काय असा प्रश्न निर्माण होणारच नाही असं नाही. याचं कारण राजेन्द्र कुमार यांच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या जानेवारीत केलेला थयथयाट, सीबीआयच्या न्यायालयाने त्यावेळी केजरीवालाची केलेली साथ आणि खुद्द सीबीआयच्या विश्वासार्हतेला अलीकडच्या काळात वारंवार लागत असलेले गालबोट यामुळे असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. वास्तविक पाहाता कुमार यांच्यावर ज्या कालावधीत भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवला गेला आहे तो काळ केजरीवाल यांचा उदय होण्याच्याही अगोदरपासूनचा आहे. तो सुरु होतो २००७पासून आणि अत्यंत गंमतीशीर योगायोग म्हणजे त्याच वर्षी त्यांना उत्कृष्ट प्रशासकीय सेवेबद्दल पंतप्रधानांच्या नावाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. दिल्ली प्रशासनाच्या विविध विभागांच्या संगणीकरणाचे कंत्राट देताना कुमार यांनी भ्रष्टाचार केला असा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांनी आपल्या एका शाळूसोबतीसमवेत भागीदारीत एक कंपनी सुरु केली आणि तिलाच सुमारे ५० कोटींची कंत्राटे दिली व दिल्ली सरकारला १२ कोटींच्या खड्ड्यात घातले अशासारखा सीबीआयचा आरोप आहे. कुमार यांच्या कथित भ्रष्टाचारासंबंधी सीबीआयकडे एक लेखी तक्रार आल्यानंतर गेल्या डिसेंबरात कुमार यांच्या कार्यालयावर धाड टाकण्यात येऊन काही कागदपत्रे जप्त केली गेली. त्यावर अरविंंद केजरीवाल यांनी प्रचंड थयथयाट केला. परंतु केवळ तितकेच नव्हे तर तक्रार आली म्हणून कागदपत्रे जप्त केली आणि तपास करीत आहोत या सबबीखाली जप्त केलेली कागदपत्रे सोबत ठेवता येणार नाहीत अशी तंबी सीबीआयच्याच विशेष न्यायालयाने सीबीआयला दिली आणि जप्त केलेली कागदपत्रे परत करायला भाग पाडले. पण सोमवारी ज्याअर्थी कुमार यांच्यासह पाच जणांनी अटक करण्यात आली त्याअर्थी त्यांच्यावरील आरोपाचा प्रारंभिक तपास पूर्ण करण्यात आला असावा असे समजायला हरकत नाही. यातील खरं काय असा प्रश्न पडण्याचे प्रमुख कारण म्हणजे अण्णा हजारे यांचे बोट धरुन सार्वजनिक जीवनात आलेले केजरीवाल स्वत:ला भ्रष्टाचाराचे दमनकर्ते मानतात. मग केवळ मोदी विरोधातून ते राजेन्द्रकुमार यांची साथ करीत होते का? कुमार यांचा केन्द्राने जो गौरव केला त्याचा निकष काय? न्यायालयाने कठोर भूमिका घेण्यामागील तर्क कोणता? की केजरीवाल आणि न्यायालय यांना तेव्हां जे वाटले तेच खरे व म्हणून राजेन्द्र कुमार धुतल्या तांदळासारखे आहेत?