शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

शिक्षण म्हणजे काय?

By admin | Updated: August 23, 2016 07:19 IST

शिक्षण म्हणजे काय, या प्रश्नाचे सामान्य उत्तर, अभ्यास करुन पदवी मिळवून चांगली नोकरी मिळवणे.

शिक्षण म्हणजे काय, या प्रश्नाचे सामान्य उत्तर, अभ्यास करुन पदवी मिळवून चांगली नोकरी मिळवणे. पण आज उच्च शिक्षण घेतलेल्यांच्याही मनावर ताबा नाही. त्यांचे शरीर व मन आजारी आहे म्हणून सध्याचे शिक्षण खरे आहे का, याचा विचार करायला हवा.माणसाला मन, भावना व चेतना असतात. योगशास्त्रानुसार माणसाच्या व्यक्तिमत्वाचे पाच अभिन्न भाग आहेत. त्यांना ‘कोष’ म्हणतात. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोष.अन्नमयकोष म्हणजे शरीर. तो हाडमांस मज्जारक्तातून बनलेला असतो. तो जिवंत ठेवण्यासाठी अन्न-पाण्याची गरज भासते. प्राणमय कोष प्राणवायूद्वारे जिवंत राहातो. मनोमय कोष म्हणजे भावना, विचार, संवेदना आदिंचे उगमस्थान असलेल्या मनाचा पसारा. विज्ञानमय कोष म्हणजे माणसाच्या चेतनेचा विस्तार. शेवटी आनंदमय कोष म्हणजे शांत व सर्व विकार व उद्वेगांपासून मुक्त असणारे गहनतम व्यक्तिमत्व.या पाच कोषांचा विचार करता, असे लक्षात येते की, ही माणसाची परिपूर्ण व संतुलित कल्पना आहे. अन्नमयकोष भौतिक असून तो बाह्यरुपी आहे. प्राणमयकोष त्यापेक्षा सूक्ष्म व जसजसे आपण व्यक्तिमत्वाच्या आत उतरतो तसतसे तो अधिक सूक्ष्म होत जातोे. म्हणून माणसाच्या व्यक्तिमत्वाचा फक्त वीस टक्के भाग बाहेर दिसतो तर उरलेला ऐंशी टक्के भाग सूक्ष्म असल्याने नजरेच्या पलीकडे असतो.सध्याचे शिक्षण केवळ या फक्त वीस टक्के भागाची काळजी घेते. ऐंशी टक्के भाग दुर्लक्षित व उपेक्षित राहातो. म्हणून आजचा माणूस शरीराने पुष्ट असून सुध्दा अंत:शक्तिने हीन, मनाने व्यग्र, विचाराने आत्मकेन्द्रीत व व्यवहाराने असंतुलीत झाला आहे. शिक्षणाबाबत स्वामी विवेकानंद म्हणत, शिक्षणाचा उद्देश सकारात्मक वृत्ती रुजविणे हा आहे. बुध्दिसामर्थ्य वाढवून मन व भावनांवर अंकुश ठेवण्याची तालीम देते ते खरे शिक्षण. शिक्षण चारित्र्य निर्माण करते व जीवनकलहाला सामोरे जाऊन आव्हाने स्वीकारण्यासाठी सज्ज करते. -डॉ. भूषणकुमार उपाध्याय