शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानने आधीच सिंधु पाणी कराराचे उल्लंघन केलेय", पाकच्या कांगाव्याला भारताकडून सडेतोड उत्तर!
2
ईशान्य भारतात पावसाचा कहर, भूस्खलनासह विविध कारणांनी ३२ जणांचा मृत्यू  
3
पुढील आठवड्यात शेअर बाजारात 'लिस्टिंगचा धमाका'! १० कंपन्या करणार दणक्यात पदार्पण, गुंतवणूकदारांची चांदी?
4
रोज ६,५०० तरुणांची तंबाखूसेवनाला सुरुवात, दरवर्षी १८ लाख जण गमावतात आपला जीव
5
"संविधानामुळेच आपला देश संकटकाळातही एकसंध"; सरन्यायाधीश भूषण गवई यांचे विधान
6
कॉलेजचं प्रेम आयुष्यात परतलं, आधीच विवाहित असलेल्या जवानानं पत्नीला संपवलं
7
चालकाला डुलकी लागली, कार थेट दुभाजक ओलांडून ट्रॅकला जाऊन धडकली; एकाचा मृत्यू, धुळे-सोलापूर महामार्गावरील घटना
8
आनंदाची बातमी...! LPG सिलिंडरची किंमत पुन्हा कमी झाली; 1 जूनपासून ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवा दर
9
फक्त SIP च नाही, आता 'STP' नेही वाढवा म्युच्युअल फंडातला परतावा! जाणून घ्या ही खास योजना!
10
पाकिस्तानमधील जीवितहानीबद्दल शोक करणारे वक्तव्य कोलंबियाने घेतले मागे- शशी थरूर
11
IPL 2025 : पुन्हा 'रोजंदारी'वर मिळालं काम! पण यावेळी MI नं दिला CSK पेक्षा दुप्पट पगार
12
शरीर संबंधास नकार मिळताच पती संतापला, पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला! मुंबईतील धक्कादायक घटना 
13
प्रेमाच्या मैदानात रिंकू सिंहचा महिला खासदाराने उडवला त्रिफळा, ८ जूनला होणार साखरपुडा
14
फक्त २५० रुपयांनी सुरुवात, ७० लाखांपर्यंतचा जमेल निधी! मुलीचे शिक्षण आणि लग्नाची चिंता कायमची मिटेल
15
मोठा अपघात टळला! रुळांवर होते सिमेंट, लोखंडाचे पाईप, ड्रायव्हरच्या प्रसंगावधानाने वाचले हजारो प्रवाशांचे प्राण 
16
पावसाचा कहर! अरुणाचलमध्ये भूस्खलनात १४ ठार; मिझोराममध्ये घरे कोसळून अनेक जण ठार
17
विशेष लेख: दादा, शिंदे, फडणवीसांचे 'कम्युनिकेशन' अन् एका विधानामुळे पडलेले असंख्य प्रश्न
18
नातेवाईकांना भेटायला गेला अन् तो पाकिस्तानचाच झाला, दिल्ली पोलिसांनी आणखी एका गद्दाराला केली अटक!
19
लेख: मनोरंजन उद्योगाला पायरसीचे ग्रहण; एक जण घेतो सबस्क्रिप्शन, पण पाहणारे मात्र अनेक!
20
आतंकवादी तुरुंगात अन् बायको झाली बाळंत, ओवेसींनी केली पाकिस्तानची पोलखोल! म्हणाले... 

शिक्षण म्हणजे काय?

By admin | Updated: August 23, 2016 07:19 IST

शिक्षण म्हणजे काय, या प्रश्नाचे सामान्य उत्तर, अभ्यास करुन पदवी मिळवून चांगली नोकरी मिळवणे.

शिक्षण म्हणजे काय, या प्रश्नाचे सामान्य उत्तर, अभ्यास करुन पदवी मिळवून चांगली नोकरी मिळवणे. पण आज उच्च शिक्षण घेतलेल्यांच्याही मनावर ताबा नाही. त्यांचे शरीर व मन आजारी आहे म्हणून सध्याचे शिक्षण खरे आहे का, याचा विचार करायला हवा.माणसाला मन, भावना व चेतना असतात. योगशास्त्रानुसार माणसाच्या व्यक्तिमत्वाचे पाच अभिन्न भाग आहेत. त्यांना ‘कोष’ म्हणतात. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोष.अन्नमयकोष म्हणजे शरीर. तो हाडमांस मज्जारक्तातून बनलेला असतो. तो जिवंत ठेवण्यासाठी अन्न-पाण्याची गरज भासते. प्राणमय कोष प्राणवायूद्वारे जिवंत राहातो. मनोमय कोष म्हणजे भावना, विचार, संवेदना आदिंचे उगमस्थान असलेल्या मनाचा पसारा. विज्ञानमय कोष म्हणजे माणसाच्या चेतनेचा विस्तार. शेवटी आनंदमय कोष म्हणजे शांत व सर्व विकार व उद्वेगांपासून मुक्त असणारे गहनतम व्यक्तिमत्व.या पाच कोषांचा विचार करता, असे लक्षात येते की, ही माणसाची परिपूर्ण व संतुलित कल्पना आहे. अन्नमयकोष भौतिक असून तो बाह्यरुपी आहे. प्राणमयकोष त्यापेक्षा सूक्ष्म व जसजसे आपण व्यक्तिमत्वाच्या आत उतरतो तसतसे तो अधिक सूक्ष्म होत जातोे. म्हणून माणसाच्या व्यक्तिमत्वाचा फक्त वीस टक्के भाग बाहेर दिसतो तर उरलेला ऐंशी टक्के भाग सूक्ष्म असल्याने नजरेच्या पलीकडे असतो.सध्याचे शिक्षण केवळ या फक्त वीस टक्के भागाची काळजी घेते. ऐंशी टक्के भाग दुर्लक्षित व उपेक्षित राहातो. म्हणून आजचा माणूस शरीराने पुष्ट असून सुध्दा अंत:शक्तिने हीन, मनाने व्यग्र, विचाराने आत्मकेन्द्रीत व व्यवहाराने असंतुलीत झाला आहे. शिक्षणाबाबत स्वामी विवेकानंद म्हणत, शिक्षणाचा उद्देश सकारात्मक वृत्ती रुजविणे हा आहे. बुध्दिसामर्थ्य वाढवून मन व भावनांवर अंकुश ठेवण्याची तालीम देते ते खरे शिक्षण. शिक्षण चारित्र्य निर्माण करते व जीवनकलहाला सामोरे जाऊन आव्हाने स्वीकारण्यासाठी सज्ज करते. -डॉ. भूषणकुमार उपाध्याय