शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

शिक्षण म्हणजे काय?

By admin | Updated: August 23, 2016 07:19 IST

शिक्षण म्हणजे काय, या प्रश्नाचे सामान्य उत्तर, अभ्यास करुन पदवी मिळवून चांगली नोकरी मिळवणे.

शिक्षण म्हणजे काय, या प्रश्नाचे सामान्य उत्तर, अभ्यास करुन पदवी मिळवून चांगली नोकरी मिळवणे. पण आज उच्च शिक्षण घेतलेल्यांच्याही मनावर ताबा नाही. त्यांचे शरीर व मन आजारी आहे म्हणून सध्याचे शिक्षण खरे आहे का, याचा विचार करायला हवा.माणसाला मन, भावना व चेतना असतात. योगशास्त्रानुसार माणसाच्या व्यक्तिमत्वाचे पाच अभिन्न भाग आहेत. त्यांना ‘कोष’ म्हणतात. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोष.अन्नमयकोष म्हणजे शरीर. तो हाडमांस मज्जारक्तातून बनलेला असतो. तो जिवंत ठेवण्यासाठी अन्न-पाण्याची गरज भासते. प्राणमय कोष प्राणवायूद्वारे जिवंत राहातो. मनोमय कोष म्हणजे भावना, विचार, संवेदना आदिंचे उगमस्थान असलेल्या मनाचा पसारा. विज्ञानमय कोष म्हणजे माणसाच्या चेतनेचा विस्तार. शेवटी आनंदमय कोष म्हणजे शांत व सर्व विकार व उद्वेगांपासून मुक्त असणारे गहनतम व्यक्तिमत्व.या पाच कोषांचा विचार करता, असे लक्षात येते की, ही माणसाची परिपूर्ण व संतुलित कल्पना आहे. अन्नमयकोष भौतिक असून तो बाह्यरुपी आहे. प्राणमयकोष त्यापेक्षा सूक्ष्म व जसजसे आपण व्यक्तिमत्वाच्या आत उतरतो तसतसे तो अधिक सूक्ष्म होत जातोे. म्हणून माणसाच्या व्यक्तिमत्वाचा फक्त वीस टक्के भाग बाहेर दिसतो तर उरलेला ऐंशी टक्के भाग सूक्ष्म असल्याने नजरेच्या पलीकडे असतो.सध्याचे शिक्षण केवळ या फक्त वीस टक्के भागाची काळजी घेते. ऐंशी टक्के भाग दुर्लक्षित व उपेक्षित राहातो. म्हणून आजचा माणूस शरीराने पुष्ट असून सुध्दा अंत:शक्तिने हीन, मनाने व्यग्र, विचाराने आत्मकेन्द्रीत व व्यवहाराने असंतुलीत झाला आहे. शिक्षणाबाबत स्वामी विवेकानंद म्हणत, शिक्षणाचा उद्देश सकारात्मक वृत्ती रुजविणे हा आहे. बुध्दिसामर्थ्य वाढवून मन व भावनांवर अंकुश ठेवण्याची तालीम देते ते खरे शिक्षण. शिक्षण चारित्र्य निर्माण करते व जीवनकलहाला सामोरे जाऊन आव्हाने स्वीकारण्यासाठी सज्ज करते. -डॉ. भूषणकुमार उपाध्याय