शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण दिले, संस्कारांचे काय?

By admin | Updated: May 12, 2017 22:49 IST

शिक्षणाची ओंजळ ज्या ज्ञानमंदिरातून भरायची, तेथेच चोरी-घरफोडीचा प्रताप केला गेल्याचे पाहता; सामाजिक व नैतिक संस्काराच्या प्रेरणा किती क्षीण झाल्या आहेत हेच लक्षात यावे.

शिक्षणाची ओंजळ ज्या ज्ञानमंदिरातून भरायची, तेथेच चोरी-घरफोडीचा प्रताप केला गेल्याचे पाहता; सामाजिक व नैतिक संस्काराच्या प्रेरणा किती क्षीण झाल्या आहेत हेच लक्षात यावे.गुन्हेगारी घटनांतील अल्पवयीन मुलांचे वाढत चाललेले प्रमाण हा सामाजिक चिंतेचा तसेच चिंतनाचा विषय ठरला असताना, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वत:च्याच महाविद्यालयातील संगणक चोरून नेण्यासारखी घटना नाशकात पुढे आल्याने नेमके कुठे, काय व कुणाचे चुकते आहे याचा विचार समाजधुरिणांकडून केला जाणे अगत्याचे ठरून गेले आहे.दिवसेंदिवस शहरीकरणाच्या प्रमाणात नागरी समस्या व गुन्हेगारीचे प्रमाणही वाढणे एकवेळ समजून घेता येणारे असले तरी, विशेषत: गुन्हेगारी प्रकरणात आढळून येणारा अल्पवयीनांचा मोठ्या संख्येतील सहभाग हा न केवळ पोलीस दलाला, परंतु संपूर्ण समाजाला चक्रावून टाकणारा आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्रातील बालगुन्हेगारीचे प्रमाण तब्बल ७१ टक्क्यांहून अधिक वाढले असून, यातील १२ ते १६ या वयोगटातील मुलांच्या गुन्हेगारी घटनांत ७७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबई, नागपूरपाठोपाठ नाशिक, नांदेडसारख्या ठिकाणीही हे लोण वेगाने पसरत आहे. गुन्हेगाराची कोणतीही जात नसते की त्याचा कोणता धर्म नसतो. परंतु वयाच्या दृष्टीने विचार करता तो अल्पवयीन असेल, आणि तरी गुन्हेगारी कृत्यात आढळून आला असेल तर कायदा त्याच्याकडे काय म्हणून बघेल हा भाग वेगळा, मात्र समाजाला अशा अल्पवयीनांकडे गंभीरतेनेच पाहावयास हवे. कारण, असे घडून येण्यात सामाजिक स्थिती वा परिस्थितीचाच मोठा वाटा राहिल्याचे अनेकदा, अनेक प्रकरणांतून दिसून आले आहे. खेळण्या-बागडण्याच्या व शिकण्याच्या वयात कोवळी किंवा तरुण मुले ‘हातसफाई’ करून कुणाचे पाकीट, मोबाइल्स लंपास करत असतील; माता-भगिनींच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून नेत असतील आणि तितकेच नव्हे, तर त्याही पुढचे पाऊल टाकीत घरफोडी, प्राणघातक हल्ले व खुनासारख्या गंभीर प्रकरणात लिप्त असल्याचे आढळून येत असतील; तर ते समाजस्वास्थ्य बिघडल्याचेच लक्षण मानावयास हवे. कारण, कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा, समाजाचा म्हणून असणारा व समाजातील थोरामोठ्यांचा, नैतिकतेचा धाक ओसरत चालल्याचे यातून स्पष्ट होणारे आहे.महत्त्वाचे म्हणजे, अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शिक्षणानिमित्त घरापासून व पालकांपासून दूर शहरात आलेली मुले आपल्या छानछोकीसाठी गाड्या वगैरे चोरून चैन करू पाहत असल्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडत असतात; परंतु ज्या ज्ञानमंदिरात ते शिक्षण घेत आहेत तेथीलच संगणक आदी साहित्य चोरून नेण्याचा प्रकार नाशिक जिल्ह्यातील आगासखिंड येथील एका पॉलिटेक्निक महाविद्यालयात उघडकीस आल्याने, या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले पण संस्कार देण्यात कुटुंब, समाज व शिक्षण व्यवस्थाही कमीच पडल्याचे म्हणता यावे. सदर विषय चिंतेसोबतच चिंतनाचा ठरला आहे तो म्हणूनच. यातही नकळत्या वयातील अथवा शिक्षणापासून लांब असलेली झोपडपट्टीतील मुले किंवा आई-वडिलांतील सततच्या भांडणांचाच ‘संस्कार’ मनावर झालेली आणि त्यातून गुन्हेगारीकडे वळलेली मुले वेगळी व पॉलिटेक्निकमध्ये शिकावयास आलेली मध्यम वर्गातील, सभ्य घरातील ‘कळती’ मुले वेगळी; पण तरी त्यांच्यात गुन्हेगारीचा समान धागा गवसावा, हे यातील अधिक भयाण व वास्तव चित्र आहे. ते समाजमनाला अस्वस्थ करून सोडणारे असल्याने, समाजाच्या पुढारपणाच्या दिवट्या-बुधल्या घेऊन मिरवणाऱ्यांनी याबाबत अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आली आहे.बालसुधारगृह ते मुलांसाठी काम करणाऱ्या विविध संघटना, कुटुंबप्रमुखांपासून ते समाजाचे नेतृत्व करणाऱ्यांपर्यंत आणि शासनापासून ते शिक्षणक्षेत्रात असणाऱ्यांपर्यंत साऱ्यांनीच याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. उद्याची आशा म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहत आहोत ती पिढी अशी गुन्हेगारीत अडकणार असेल तर कोणत्याही कुटुंबाला, समाजाला अगर देशालाही उज्ज्वल भविष्याचे स्वप्नच पाहता येऊ नये इतकी यातील भयावहता आहे. ती वेळीच जाणली जावी, इतकेच यानिमित्ताने.- किरण अग्रवाल