शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

यातून काय साधले?

By admin | Updated: January 24, 2017 01:07 IST

सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशनतर्फे रविवारी विद्यापीठ अनुदान आयोगाची राष्ट्रीय चाचणी परीक्षा (नेट) घेण्यात आली. या परीक्षेला

सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशनतर्फे रविवारी विद्यापीठ अनुदान आयोगाची राष्ट्रीय चाचणी परीक्षा (नेट) घेण्यात आली. या परीक्षेला विविध राज्यांतील परीक्षार्थी सामोरे जातात, त्यात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे प्रमाणही मुबलक आहे. व्याख्याता आणि फेलोशिपसाठी घेण्यात येणाऱ्या या परीक्षेकडे पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा ओढा अधिक असल्याचे आजवरच्या परीक्षेतील परीक्षार्थी संख्येवरून लक्षात येते. सर्वाधिक प्रतिसाद लाभत असलेल्या या परीक्षेसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यार्थ्यांची गैरसोय कशी टाळता येईल यावरही लक्ष देणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील नेट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेने परीक्षा केंद्रांची संख्या फारच अल्प आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद, जळगाव आणि नागपूर या पाचच केंद्रांवर सध्या ही परीक्षा घेतली जाते. आरोग्य विज्ञान विद्यापीठ व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अशी दोन विद्यापीठे असलेल्या नाशिकसारख्या शहरातदेखील या परीक्षेसाठी केंद्र नाही. उपरोक्त पाच केंद्रांवर येण्यासाठी विद्यार्थ्यांना रात्री-अपरात्री निघावे लागते. त्यासाठी त्यांना खूपच गैरसोयीला सामोरे जावे लागते. विद्यार्थ्यांची सोय करण्याऐवजी विद्यापीठ अनुदान आयोग अथवा सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशनच्या व्यवस्थापनाकडून त्यात भर घातली जाणे मुळीच उचित नाही. रविवारच्या परीक्षेसाठी जळगाव, लातूर व साताऱ्यातील पाचशे विद्यार्थी केवळ एक ते दहा मिनिटे उशिरा आल्याबद्दल त्यांना परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आले. त्यात अंध विद्यार्थ्यांचाही समावेश होता. एकीकडे अंधांसाठी राज्य आणि केंद्रातील शासनाकडून विशेष योजना राबविली जाते आणि त्यांना सवलतीही दिल्या जात असताना या परीक्षा केंद्रावरील प्रशासनाने इतके निष्ठुरपणे वागणे न्यायोचित वाटत नाही. कोणतेही नियम सोय अथवा शिस्त म्हणून बनविले जातात, परंतु त्यांचा असा अतिरेक होऊ नये, ते विद्यार्थ्यांच्या भविष्यात आडकाठी ठरायला नकोत आणि पात्रता चाचणी शिक्षात्मक परीक्षा ठरता कामा नये. पुण्यातील या प्रकारातून नेमके काय साध्य झाले?