शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

घोषणांचा सुकाळ, अंमलबजावणीचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 04:20 IST

शब्द फसवे असतात, आकडे खरे बोलतात! विकासाच्या मूल्यमापनाच्या अनुषंगाने हे विधान अतिशय महत्त्वाचे मानले जाते. राजकारणात तर शब्द अन् आकडे यांचा खेळ करूनच विकासाचा डोंगर रचला जातो; मात्र जेव्हा मूल्यमापन करण्याची वेळ येते, तेव्हा शब्द उघडे पडलेले असतात अन् आकडे वास्तव अधोरेखित करीत असतात.

- रवी टालेशब्द फसवे असतात, आकडे खरे बोलतात! विकासाच्या मूल्यमापनाच्या अनुषंगाने हे विधान अतिशय महत्त्वाचे मानले जाते. राजकारणात तर शब्द अन् आकडे यांचा खेळ करूनच विकासाचा डोंगर रचला जातो; मात्र जेव्हा मूल्यमापन करण्याची वेळ येते, तेव्हा शब्द उघडे पडलेले असतात अन् आकडे वास्तव अधोरेखित करीत असतात. विदर्भातील रखडलेल्या प्रश्नांचे अन् वर्षानुवर्षापासून वाढत चाललेल्या अनुशेषाचे असेच काहीसे चित्र आहे.विदर्भाच्या अनुशेषामध्ये सर्वात मोठा वाटा आहे सिंचनाच्या अनुशेषाचा! या पार्श्वभूमीवर, पश्चिम विदर्भातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय जल संधारण मंत्री नितीन गडकरी यांनी डिसेंबरमध्ये पश्चिम विदर्भातील तीन ठिकाणी विविध विकास प्रकल्पांच्या कार्यान्वयन समारंभांमध्ये हजेरी लावली. त्यामध्ये प्रामुख्याने सिंचन प्रकल्पांचा समावेश होता. त्यापैकी अनेक प्रकल्प गत अनेक वर्षांपासून रखडले आहेत. ते पूर्णत्वास नेण्यासाठी तब्बल २० हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचे, नितीन गडकरी यांनी जाहीर केले. मोठा गाजावाजा करून कार्यान्वयन समारंभ घेण्यात आले. प्रकल्प पूर्णत्वास नेण्याची कालमर्यादाही जाहीर करण्यात आली; मात्र त्यास दोन महिने उलटून गेल्यावरही, प्रकल्पांच्या रखडलेल्या कामांना गती मिळणे तर जाऊ द्या, साधी सुरुवातही झालेली नाही. नेते मोठमोठ्या घोषणा करतात; पण त्यांच्या अंमलबजावणीचा मागोवा घेण्याची तसदी, ना सरकारी पातळीवर घेतली जाते, ना सत्ताधारी पक्षाच्या पातळीवर! केंद्र व राज्य सरकारच्या प्रति दिवसेंदिवस रोष वाढण्यामागचे हे एक प्रमुख कारण आहे.विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण मोठे आहे. त्यातही पूर्व विदर्भाच्या तुलनेत पश्चिम विदर्भात आत्महत्यांचे प्रमाण किती तरी अधिक आहे. ज्या भागात सिंचन अनुशेष मोठा, त्या भागात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाणही मोठे, असे समीकरण आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांना आळा घालण्यासाठी सिंचन सुविधा विकसित करण्याशिवाय तरणोपाय नाही; परंतु दुर्दैवाने सरकार केवळ घोषणांमध्ये अडकून पडल्याचे चित्र गत आर्थिक वर्षाच्या सर्वेक्षणाची आकडेवारी दर्शविते. त्या सर्वेक्षणानुसार राज्याचे सरासरी दरडोई वार्षिक उत्पन्न १,४९,३९९ रुपये एवढे आहे; मात्र त्या तुलनेत अमरावती विभागाचे दरडोई वार्षिक उत्पन्न केवळ ८४,८७८ रुपयेच आहे. जून २०१४ पर्यंत विदर्भाचा सिंचन अनुशेष १०,३३,२२० हेक्टर एवढा होता. त्यापैकी पश्चिम विदर्भाचा अनुशेष ९,१२,३५० हेक्टरचा असून, तो विदर्भातील सिंचन अनुशेषाच्या ८८.३० टक्के एवढा आहे. उर्वरित महाराष्टÑाच्या तुलनेत विदर्भ मागासलेला आहेच; मात्र आता विदर्भाच्या पूर्व व पश्चिम या दोन भागांमध्येही विकासाची दरी रुंदावत चालली आहे. पूर्व विदर्भाच्या तुलनेत पश्चिम विदर्भ सिंचन, रस्ते विकासात ८६ टक्क्यांनी मागे असल्याचे चित्र सरकारी आकडेवारीच दाखवित आहे. सिंचन, रस्ते, कृषिपंप जोडण्या, अशा अनेक आघाड्यांवर पश्चिम विदर्भाचा अनुशेष वाढत चालला आहे. येत्या वर्ष-दीड वर्षात राज्य व केंद्र सरकारला निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे. दिलेले शब्द अन् वास्तवातील आकडे यांच्यातील दरी मिटविण्यासाठी तेवढाच वेळ सत्ताधाºयांकडे आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस