शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

विध्वंसाचा मार्ग

By admin | Updated: February 9, 2015 23:05 IST

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत वावटळ निर्माण केल्यानंतर ‘एमआयएम’ (आॅल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन) हा राजकीय पक्ष विदर्भात आपली पाळेमुळे रोवण्याचा प्रयत्न करीत आहे

गजानन जानभोर -

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत वावटळ निर्माण केल्यानंतर ‘एमआयएम’ (आॅल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन) हा राजकीय पक्ष विदर्भात आपली पाळेमुळे रोवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्या दृष्टीने या पक्षाचे नेते, खासदार असदुद्दीन ओवेसी यांची जाहीर सभा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नागपुरात होण्याचे घाटत आहे.काँग्रेसपासून दुरावलेला मुस्लीम समाज आज आधाराच्या शोधात आहे. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर चेकाळलेल्या हिंदुत्ववादी संघटनांच्या लव्ह जिहाद, घरवापसी अशा उपद्रवांनी या समाजाच्या मनात भीतीचे वातावरण आहे. ओवेसी याच गोष्टींचा गैरफायदा घेत आहेत. प्रवीण तोगडिया, योगी आदित्यनाथ हे हिंदुत्ववादी नेते जेवढी गरळ ओकतील तेवढे ओवेसींचे फावणारे आहे. भांबावलेल्या मुस्लीम मतदारांनी विधानसभा, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची पाठ सोडली. विदर्भात काँग्रेसला सक्षम मुस्लीम नेतृत्व तयार करता आले नाही. विदर्भातील मुस्लीम काँग्रेस नेते केवळ निवडणुकीच्या प्रचारातच (आणि तेही फक्त स्टेजवरच) दिसतात. एरवी समाजात त्यांच्याबद्दल विश्वास उरलेला नाही. काँग्रेसने ज्या मुस्लीम नेत्यांना बळ दिले त्यांनी समाजापेक्षा स्वत:च्याच हिताचा अधिक विचार केला, हे वास्तव आहे. भंडाऱ्यात बशीर पटेल, नागपुरात अनिस अहमद, एस. क्यू. जामा, अकोल्यात अजहर हुसैन, नातिकोद्दीन खतिब ही नावे पुरेशी आहेत. यातील किती नेत्यांनी तळागाळातील मुस्लीम कार्यकर्त्यांना पुढे येऊ दिले? बायको-मुलांपलीकडे त्यांनी समाजाचा कधी विचार केला नाही. आज मुस्लीम तरुणांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. स्वातंत्र्याच्या ६० वर्षांनंतरही आपल्या समाजाला प्रगतीचा मार्ग सापडलेला नाही, ही या तरुणांच्या मनातील खदखद आहे. काँग्रेस असो की समाजवादी पक्ष या राजकीय पक्षांनी केवळ मतांसाठी आपल्याला वापरून घेतले, हा त्यांच्या मनातील संताप आहे. ओवेसी या संतापाला सराईतपणे कुरवाळतात. काँग्रेस-समाजवादी पक्षातील मुस्लीम नेते आपल्या बांधवांच्या हातात केवळ कुराण ठेवायचे. ओवेसी मात्र एका हातात कुराण तर दुसऱ्या हातात कॉम्प्युटर ठेवू पाहतात. मुस्लीम आरक्षणाबद्दल ते आक्रमक आणि आग्रही भूमिका घेतात. नेमक्या याच गोष्टी मुसलमानांना आज आश्वासक वाटतात. हिंदुत्ववाद्यांची आक्रमकता आणि पुरोगामी पक्षांची दुर्बलता हे ओवेसींचे बलस्थान आहे. आज ओवेसी मुसलमानांच्या प्रगतीबद्दल पोटतिडकीने बोलत असल्याचा आव आणत असले तरी त्यांचा छुपा अजेंडा मात्र वेगळा आहे. ओवेसी आणि तोगडिया या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोघांनाही विखार हवा आहे. तेच त्यांच्या धर्मकारणाचे आणि राजकारणाचे सूत्र आहे. परंतु बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर होरपळणारा देश बघून या देशातील सर्वसामान्य हिंदू जसा सावध झाला आणि हिंदुत्ववाद्यांना अव्हेरू लागला तेच परिवर्तन अलीकडच्या काळात मुस्लीम समाजात पाहायला मिळत आहे. दहशतवादाच्या नावावर होत असलेल्या समाजाच्या बदनामीला मुस्लीम तरुण विटला आहे. पेशावरच्या शाळेत मारली गेलेली १५० चिमुकली आपल्याच धर्माची होती आणि मारणाऱ्या सैतानांना धर्माच्या शिकवणीचा विसर पडला होता हे वास्तवही त्याला कळून चुकले आहे. त्यामुळे आता तो ओवेसीसारख्यांच्या जाळ्यात फसणार नाही. विध्वंसक वृत्तीचे ओवेसी आज मुसलमानांच्या हातात कुराणासोबतच कॉम्प्युटर ठेवू पाहतात तेव्हा या समाजाच्या बदलत्या विधायक मानसिकतेतून निर्माण झालेल्या दबावाचा तो परिपाक आहे, ही बाबही आपण समजून घेतली पाहिजे. ओवेसी आणि तोगडियांचा मार्ग विध्वंसाचा आहे. त्यांचा जेवढा प्रभाव वाढेल तेवढा हा देश दुभंगेल. त्यामुळे ओवेसींच्या गुंगी आणणाऱ्या भाषणांच्या प्रभावापासून समाजबांधवांना रोखण्याचे आव्हान आता मुस्लीम तरुणांनाच स्वीकारावे लागणार आहे. या देशात काँग्रेस पक्ष कमकुवत झाला असतानाच्या काळात पुरोगामी राजकीय पक्षांसमोरील हे मोठे आव्हान आहे.