शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

विध्वंसाचा मार्ग

By admin | Updated: February 9, 2015 23:05 IST

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत वावटळ निर्माण केल्यानंतर ‘एमआयएम’ (आॅल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन) हा राजकीय पक्ष विदर्भात आपली पाळेमुळे रोवण्याचा प्रयत्न करीत आहे

गजानन जानभोर -

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत वावटळ निर्माण केल्यानंतर ‘एमआयएम’ (आॅल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन) हा राजकीय पक्ष विदर्भात आपली पाळेमुळे रोवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्या दृष्टीने या पक्षाचे नेते, खासदार असदुद्दीन ओवेसी यांची जाहीर सभा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नागपुरात होण्याचे घाटत आहे.काँग्रेसपासून दुरावलेला मुस्लीम समाज आज आधाराच्या शोधात आहे. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर चेकाळलेल्या हिंदुत्ववादी संघटनांच्या लव्ह जिहाद, घरवापसी अशा उपद्रवांनी या समाजाच्या मनात भीतीचे वातावरण आहे. ओवेसी याच गोष्टींचा गैरफायदा घेत आहेत. प्रवीण तोगडिया, योगी आदित्यनाथ हे हिंदुत्ववादी नेते जेवढी गरळ ओकतील तेवढे ओवेसींचे फावणारे आहे. भांबावलेल्या मुस्लीम मतदारांनी विधानसभा, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची पाठ सोडली. विदर्भात काँग्रेसला सक्षम मुस्लीम नेतृत्व तयार करता आले नाही. विदर्भातील मुस्लीम काँग्रेस नेते केवळ निवडणुकीच्या प्रचारातच (आणि तेही फक्त स्टेजवरच) दिसतात. एरवी समाजात त्यांच्याबद्दल विश्वास उरलेला नाही. काँग्रेसने ज्या मुस्लीम नेत्यांना बळ दिले त्यांनी समाजापेक्षा स्वत:च्याच हिताचा अधिक विचार केला, हे वास्तव आहे. भंडाऱ्यात बशीर पटेल, नागपुरात अनिस अहमद, एस. क्यू. जामा, अकोल्यात अजहर हुसैन, नातिकोद्दीन खतिब ही नावे पुरेशी आहेत. यातील किती नेत्यांनी तळागाळातील मुस्लीम कार्यकर्त्यांना पुढे येऊ दिले? बायको-मुलांपलीकडे त्यांनी समाजाचा कधी विचार केला नाही. आज मुस्लीम तरुणांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. स्वातंत्र्याच्या ६० वर्षांनंतरही आपल्या समाजाला प्रगतीचा मार्ग सापडलेला नाही, ही या तरुणांच्या मनातील खदखद आहे. काँग्रेस असो की समाजवादी पक्ष या राजकीय पक्षांनी केवळ मतांसाठी आपल्याला वापरून घेतले, हा त्यांच्या मनातील संताप आहे. ओवेसी या संतापाला सराईतपणे कुरवाळतात. काँग्रेस-समाजवादी पक्षातील मुस्लीम नेते आपल्या बांधवांच्या हातात केवळ कुराण ठेवायचे. ओवेसी मात्र एका हातात कुराण तर दुसऱ्या हातात कॉम्प्युटर ठेवू पाहतात. मुस्लीम आरक्षणाबद्दल ते आक्रमक आणि आग्रही भूमिका घेतात. नेमक्या याच गोष्टी मुसलमानांना आज आश्वासक वाटतात. हिंदुत्ववाद्यांची आक्रमकता आणि पुरोगामी पक्षांची दुर्बलता हे ओवेसींचे बलस्थान आहे. आज ओवेसी मुसलमानांच्या प्रगतीबद्दल पोटतिडकीने बोलत असल्याचा आव आणत असले तरी त्यांचा छुपा अजेंडा मात्र वेगळा आहे. ओवेसी आणि तोगडिया या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोघांनाही विखार हवा आहे. तेच त्यांच्या धर्मकारणाचे आणि राजकारणाचे सूत्र आहे. परंतु बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर होरपळणारा देश बघून या देशातील सर्वसामान्य हिंदू जसा सावध झाला आणि हिंदुत्ववाद्यांना अव्हेरू लागला तेच परिवर्तन अलीकडच्या काळात मुस्लीम समाजात पाहायला मिळत आहे. दहशतवादाच्या नावावर होत असलेल्या समाजाच्या बदनामीला मुस्लीम तरुण विटला आहे. पेशावरच्या शाळेत मारली गेलेली १५० चिमुकली आपल्याच धर्माची होती आणि मारणाऱ्या सैतानांना धर्माच्या शिकवणीचा विसर पडला होता हे वास्तवही त्याला कळून चुकले आहे. त्यामुळे आता तो ओवेसीसारख्यांच्या जाळ्यात फसणार नाही. विध्वंसक वृत्तीचे ओवेसी आज मुसलमानांच्या हातात कुराणासोबतच कॉम्प्युटर ठेवू पाहतात तेव्हा या समाजाच्या बदलत्या विधायक मानसिकतेतून निर्माण झालेल्या दबावाचा तो परिपाक आहे, ही बाबही आपण समजून घेतली पाहिजे. ओवेसी आणि तोगडियांचा मार्ग विध्वंसाचा आहे. त्यांचा जेवढा प्रभाव वाढेल तेवढा हा देश दुभंगेल. त्यामुळे ओवेसींच्या गुंगी आणणाऱ्या भाषणांच्या प्रभावापासून समाजबांधवांना रोखण्याचे आव्हान आता मुस्लीम तरुणांनाच स्वीकारावे लागणार आहे. या देशात काँग्रेस पक्ष कमकुवत झाला असतानाच्या काळात पुरोगामी राजकीय पक्षांसमोरील हे मोठे आव्हान आहे.