शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

तापमानवाढ अनियंत्रित

By admin | Updated: April 16, 2017 03:01 IST

युनोच्या आयपीसीसीचे पाचही अहवाल, तसेच गतवर्षीचा पॅरिस करार आणि गेल्या वर्षभरात आलेले नासा व इतर संस्थांचे अहवाल, तापमानवाढीमुळे ध्रुवांवरील बर्फ वेगाने वितळत

- अ‍ॅड. गिरीश राऊत 

युनोच्या आयपीसीसीचे पाचही अहवाल, तसेच गतवर्षीचा पॅरिस करार आणि गेल्या वर्षभरात आलेले नासा व इतर संस्थांचे अहवाल, तापमानवाढीमुळे ध्रुवांवरील बर्फ वेगाने वितळत असल्याचे व त्यामुळे सागर पातळीत वेगाने वाढ होत असल्याचे इशारे देत आहेत. मागील वर्षापासून दरवर्षी १/५ अंश सेल्सिअस या अभूतपूर्व गतीने पृथ्वीचे सरासरी तापमान वाढत आहे. येत्या ४ वर्षांत या गतीने १ अंश सेल्सिअसची भर उद्योगपूर्व काळाच्या म्हणजे, सन १७५०च्या तुलनेत पडत असून, मानवजात वाचविण्यासाठी तापमानातील वाढ २ अंशाच्या मर्यादेत ठेवण्याचे पॅरिस कराराचे उद्दिष्ट धुळीला मिळत आहे.तापमानवाढीचे विविध दुष्परिणाम व सागर पातळीतील वाढ, यामुळे २०३४ पासून पृथ्वीवरील मुंबई-चेन्नई पट्ट्यातील शहरे ओस पडू लागणार, हा प्रशांत महासागरातील हवाई विद्यापीठाचा अहवाल ३ वर्षांपूर्वी आला आहे. उत्तर गोलार्धात युरोपातही अभूतपूर्व बर्फवृष्टी झाली आहे. ग्रीस, रुमानिया इत्यादी देशांत तापमान ३० अंशापेक्षा खाली गेले. या वेळी विषुववृत्तावर श्रीलंकेत आतापर्यंतचा ऐतिहासिक दुष्काळ चालू आहे. दक्षिण गोलार्धात आॅस्ट्रेलियात काही ठिकाणी अधिक ४० अंशापेक्षा तापमान जास्त होत आहे. पश्चिम अंटार्क्टिकावरील सुमारे ५ हजार वर्ग किलोमीटर क्षेत्रफळाचा व सुमारे १ हजार फूट उंचीचा (जाडीचा) प्रचंड हिमखंड मूळ भागापासून निखळला आहे. तो प्रशांत महासागरात शिरत आहे. त्यामुळे त्याच्या आतील भागातील हिमनद्या वेगाने वितळणार आहेत.सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, दिनांक १८ जानेवारी रोजी जागतिक हवामान संघटनेने दिलेल्या अहवालानुसार, सन २०१६ हे तापमानाचा उच्चांक करणारे सलग १६ वे वर्ष ठरले आहे. डिसेंबर २०१६ हा वाढत्या तापमानाचा सलग २० वा महिना ठरला आहे. जानेवारी १९८५ पासून डिसेंबर २०१६ पर्यंतच्या सर्व ३७३ महिन्यांतील उच्चतम तापमान हे २०व्या शतकातील सरासरी तापमानापेक्षा जास्त होते. नोव्हेंबर २०१६ मधील उच्चतम तापमान २०व्या शतकाच्या सरासरी तापमानापेक्षा ०.९४ अंशाने जास्त होते. २०व्या शतकातील सरासरी तापमानात शेवटच्या ३ दशकांतील वाढलेल्या तापमानाचा मोठा वाटा होता आणि आता २१व्या शतकातील फक्त १६व्या वर्षातील नोव्हेंबर महिन्यातील उच्चतम तापमान यात जवळजवळ १ अंशाचे अंतर आहे. याचा अर्थ तापमानवाढीचा हा वेग सुन्न करणारा आहे.पॅरिस करार फक्त ४ वर्षांत अयशस्वी ठरणार आहे. कारण सन २०२० मध्ये मानवजात वाचविण्यासाठी नियंत्रित करावयाच्या २ अंश वाढीची मर्यादा ओलांडली जाणार आहे. प्रत्येक वर्षी १/५ अंशाची वाढ पृथ्वीच्या सरासरी तापमानात होत असल्याने, जीवसृष्टी नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.वातानुकूलन वाढतेयउन्हाळ्याची दाहकता वाढत असल्याने, वातानुकूलनाचा वापर वाढत आहे. त्यामुळे हे दुष्टचक्र अधिक तीव्र होत आहे. मुंबईत रोज १ हजार ४०० मेगावॅटपेक्षा जास्त वीज वातानुकूलनासाठी वापरली जाते. ही वीज कोळशापासून वीज निर्माण करणाऱ्या कारखान्यातून आली असे धरले, तर रोज सुमारे ३३ हजार टन कार्बन डायआॅक्साइड वातावरणात केवळ मुंबईच्या वातानुकूलनामुळे सोडला जातो. हा वायू उष्णता धरून ठेऊन पृथ्वीचे तापमान वाढविण्यास प्रामुख्याने कारण आहे.

(लेखक पर्यावरणतज्ज्ञ आहेत.)