शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
3
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
4
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
5
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
6
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
7
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
8
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
9
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
10
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
11
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
12
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
13
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
14
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
15
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
16
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
17
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
18
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
19
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
20
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?

तापमानवाढ अनियंत्रित

By admin | Updated: April 16, 2017 03:01 IST

युनोच्या आयपीसीसीचे पाचही अहवाल, तसेच गतवर्षीचा पॅरिस करार आणि गेल्या वर्षभरात आलेले नासा व इतर संस्थांचे अहवाल, तापमानवाढीमुळे ध्रुवांवरील बर्फ वेगाने वितळत

- अ‍ॅड. गिरीश राऊत 

युनोच्या आयपीसीसीचे पाचही अहवाल, तसेच गतवर्षीचा पॅरिस करार आणि गेल्या वर्षभरात आलेले नासा व इतर संस्थांचे अहवाल, तापमानवाढीमुळे ध्रुवांवरील बर्फ वेगाने वितळत असल्याचे व त्यामुळे सागर पातळीत वेगाने वाढ होत असल्याचे इशारे देत आहेत. मागील वर्षापासून दरवर्षी १/५ अंश सेल्सिअस या अभूतपूर्व गतीने पृथ्वीचे सरासरी तापमान वाढत आहे. येत्या ४ वर्षांत या गतीने १ अंश सेल्सिअसची भर उद्योगपूर्व काळाच्या म्हणजे, सन १७५०च्या तुलनेत पडत असून, मानवजात वाचविण्यासाठी तापमानातील वाढ २ अंशाच्या मर्यादेत ठेवण्याचे पॅरिस कराराचे उद्दिष्ट धुळीला मिळत आहे.तापमानवाढीचे विविध दुष्परिणाम व सागर पातळीतील वाढ, यामुळे २०३४ पासून पृथ्वीवरील मुंबई-चेन्नई पट्ट्यातील शहरे ओस पडू लागणार, हा प्रशांत महासागरातील हवाई विद्यापीठाचा अहवाल ३ वर्षांपूर्वी आला आहे. उत्तर गोलार्धात युरोपातही अभूतपूर्व बर्फवृष्टी झाली आहे. ग्रीस, रुमानिया इत्यादी देशांत तापमान ३० अंशापेक्षा खाली गेले. या वेळी विषुववृत्तावर श्रीलंकेत आतापर्यंतचा ऐतिहासिक दुष्काळ चालू आहे. दक्षिण गोलार्धात आॅस्ट्रेलियात काही ठिकाणी अधिक ४० अंशापेक्षा तापमान जास्त होत आहे. पश्चिम अंटार्क्टिकावरील सुमारे ५ हजार वर्ग किलोमीटर क्षेत्रफळाचा व सुमारे १ हजार फूट उंचीचा (जाडीचा) प्रचंड हिमखंड मूळ भागापासून निखळला आहे. तो प्रशांत महासागरात शिरत आहे. त्यामुळे त्याच्या आतील भागातील हिमनद्या वेगाने वितळणार आहेत.सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, दिनांक १८ जानेवारी रोजी जागतिक हवामान संघटनेने दिलेल्या अहवालानुसार, सन २०१६ हे तापमानाचा उच्चांक करणारे सलग १६ वे वर्ष ठरले आहे. डिसेंबर २०१६ हा वाढत्या तापमानाचा सलग २० वा महिना ठरला आहे. जानेवारी १९८५ पासून डिसेंबर २०१६ पर्यंतच्या सर्व ३७३ महिन्यांतील उच्चतम तापमान हे २०व्या शतकातील सरासरी तापमानापेक्षा जास्त होते. नोव्हेंबर २०१६ मधील उच्चतम तापमान २०व्या शतकाच्या सरासरी तापमानापेक्षा ०.९४ अंशाने जास्त होते. २०व्या शतकातील सरासरी तापमानात शेवटच्या ३ दशकांतील वाढलेल्या तापमानाचा मोठा वाटा होता आणि आता २१व्या शतकातील फक्त १६व्या वर्षातील नोव्हेंबर महिन्यातील उच्चतम तापमान यात जवळजवळ १ अंशाचे अंतर आहे. याचा अर्थ तापमानवाढीचा हा वेग सुन्न करणारा आहे.पॅरिस करार फक्त ४ वर्षांत अयशस्वी ठरणार आहे. कारण सन २०२० मध्ये मानवजात वाचविण्यासाठी नियंत्रित करावयाच्या २ अंश वाढीची मर्यादा ओलांडली जाणार आहे. प्रत्येक वर्षी १/५ अंशाची वाढ पृथ्वीच्या सरासरी तापमानात होत असल्याने, जीवसृष्टी नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.वातानुकूलन वाढतेयउन्हाळ्याची दाहकता वाढत असल्याने, वातानुकूलनाचा वापर वाढत आहे. त्यामुळे हे दुष्टचक्र अधिक तीव्र होत आहे. मुंबईत रोज १ हजार ४०० मेगावॅटपेक्षा जास्त वीज वातानुकूलनासाठी वापरली जाते. ही वीज कोळशापासून वीज निर्माण करणाऱ्या कारखान्यातून आली असे धरले, तर रोज सुमारे ३३ हजार टन कार्बन डायआॅक्साइड वातावरणात केवळ मुंबईच्या वातानुकूलनामुळे सोडला जातो. हा वायू उष्णता धरून ठेऊन पृथ्वीचे तापमान वाढविण्यास प्रामुख्याने कारण आहे.

(लेखक पर्यावरणतज्ज्ञ आहेत.)