शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

तापमानवाढ अनियंत्रित

By admin | Updated: April 16, 2017 03:01 IST

युनोच्या आयपीसीसीचे पाचही अहवाल, तसेच गतवर्षीचा पॅरिस करार आणि गेल्या वर्षभरात आलेले नासा व इतर संस्थांचे अहवाल, तापमानवाढीमुळे ध्रुवांवरील बर्फ वेगाने वितळत

- अ‍ॅड. गिरीश राऊत 

युनोच्या आयपीसीसीचे पाचही अहवाल, तसेच गतवर्षीचा पॅरिस करार आणि गेल्या वर्षभरात आलेले नासा व इतर संस्थांचे अहवाल, तापमानवाढीमुळे ध्रुवांवरील बर्फ वेगाने वितळत असल्याचे व त्यामुळे सागर पातळीत वेगाने वाढ होत असल्याचे इशारे देत आहेत. मागील वर्षापासून दरवर्षी १/५ अंश सेल्सिअस या अभूतपूर्व गतीने पृथ्वीचे सरासरी तापमान वाढत आहे. येत्या ४ वर्षांत या गतीने १ अंश सेल्सिअसची भर उद्योगपूर्व काळाच्या म्हणजे, सन १७५०च्या तुलनेत पडत असून, मानवजात वाचविण्यासाठी तापमानातील वाढ २ अंशाच्या मर्यादेत ठेवण्याचे पॅरिस कराराचे उद्दिष्ट धुळीला मिळत आहे.तापमानवाढीचे विविध दुष्परिणाम व सागर पातळीतील वाढ, यामुळे २०३४ पासून पृथ्वीवरील मुंबई-चेन्नई पट्ट्यातील शहरे ओस पडू लागणार, हा प्रशांत महासागरातील हवाई विद्यापीठाचा अहवाल ३ वर्षांपूर्वी आला आहे. उत्तर गोलार्धात युरोपातही अभूतपूर्व बर्फवृष्टी झाली आहे. ग्रीस, रुमानिया इत्यादी देशांत तापमान ३० अंशापेक्षा खाली गेले. या वेळी विषुववृत्तावर श्रीलंकेत आतापर्यंतचा ऐतिहासिक दुष्काळ चालू आहे. दक्षिण गोलार्धात आॅस्ट्रेलियात काही ठिकाणी अधिक ४० अंशापेक्षा तापमान जास्त होत आहे. पश्चिम अंटार्क्टिकावरील सुमारे ५ हजार वर्ग किलोमीटर क्षेत्रफळाचा व सुमारे १ हजार फूट उंचीचा (जाडीचा) प्रचंड हिमखंड मूळ भागापासून निखळला आहे. तो प्रशांत महासागरात शिरत आहे. त्यामुळे त्याच्या आतील भागातील हिमनद्या वेगाने वितळणार आहेत.सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, दिनांक १८ जानेवारी रोजी जागतिक हवामान संघटनेने दिलेल्या अहवालानुसार, सन २०१६ हे तापमानाचा उच्चांक करणारे सलग १६ वे वर्ष ठरले आहे. डिसेंबर २०१६ हा वाढत्या तापमानाचा सलग २० वा महिना ठरला आहे. जानेवारी १९८५ पासून डिसेंबर २०१६ पर्यंतच्या सर्व ३७३ महिन्यांतील उच्चतम तापमान हे २०व्या शतकातील सरासरी तापमानापेक्षा जास्त होते. नोव्हेंबर २०१६ मधील उच्चतम तापमान २०व्या शतकाच्या सरासरी तापमानापेक्षा ०.९४ अंशाने जास्त होते. २०व्या शतकातील सरासरी तापमानात शेवटच्या ३ दशकांतील वाढलेल्या तापमानाचा मोठा वाटा होता आणि आता २१व्या शतकातील फक्त १६व्या वर्षातील नोव्हेंबर महिन्यातील उच्चतम तापमान यात जवळजवळ १ अंशाचे अंतर आहे. याचा अर्थ तापमानवाढीचा हा वेग सुन्न करणारा आहे.पॅरिस करार फक्त ४ वर्षांत अयशस्वी ठरणार आहे. कारण सन २०२० मध्ये मानवजात वाचविण्यासाठी नियंत्रित करावयाच्या २ अंश वाढीची मर्यादा ओलांडली जाणार आहे. प्रत्येक वर्षी १/५ अंशाची वाढ पृथ्वीच्या सरासरी तापमानात होत असल्याने, जीवसृष्टी नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.वातानुकूलन वाढतेयउन्हाळ्याची दाहकता वाढत असल्याने, वातानुकूलनाचा वापर वाढत आहे. त्यामुळे हे दुष्टचक्र अधिक तीव्र होत आहे. मुंबईत रोज १ हजार ४०० मेगावॅटपेक्षा जास्त वीज वातानुकूलनासाठी वापरली जाते. ही वीज कोळशापासून वीज निर्माण करणाऱ्या कारखान्यातून आली असे धरले, तर रोज सुमारे ३३ हजार टन कार्बन डायआॅक्साइड वातावरणात केवळ मुंबईच्या वातानुकूलनामुळे सोडला जातो. हा वायू उष्णता धरून ठेऊन पृथ्वीचे तापमान वाढविण्यास प्रामुख्याने कारण आहे.

(लेखक पर्यावरणतज्ज्ञ आहेत.)