शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

संस्कारातून विवेकाचे दर्शन

By admin | Updated: August 27, 2016 05:52 IST

सिंधू आणि स्पेनची मारिना कॅरोलिना यांच्यातील बॅडमिंटनचा अटीतटीचा अंतिम सामना दूरचित्रवाणीच्या पडद्यासमोर सगळे भारतीय श्वास रोखून व नजर खिळवून पाहात होते.

रिओ आॅलिम्पिकमध्ये आपली सिंधू आणि स्पेनची मारिना कॅरोलिना यांच्यातील बॅडमिंटनचा अटीतटीचा अंतिम सामना दूरचित्रवाणीच्या पडद्यासमोर सगळे भारतीय श्वास रोखून व नजर खिळवून पाहात होते. ती नाट्यमय चुरस आशानिराशेच्या हिंदोळ्यावर झुलत होती. दोघींच्या खेळात विजेची चपळता व कुशलता होती. आत्मविश्वास, जिद्द आणि एकाग्रता होती. आॅलिम्पिकच्या रौप्यपदकाची सिंधू मानकरी ठरली. मनातील खळबळ सावरत तिने मोठ्या उमदेपणाने मारिनाला जवळ घेतले व तिचे मन:पूर्वक अभिनंदन केले. त्याचक्षणी सव्वाकोटी भारतीयांची व जगातील क्रीडाप्रेमी प्रेक्षकांची मने या सोनपरीने जिंकून घेतली.आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. याचा गर्वाने, अहंकाराने तर नव्हेच पण अभिमानाने वारंवार उच्चार करण्याचे तिने संयमाने आणि उच्च संस्कार मिळाले असल्याने टाळले. ‘सुवर्णपदक मिळवण्याचे माझे लक्ष्य होते. त्यासाठी मी खूप प्रयत्न केले. पण मारिना खूप छान खेळली. तिच्या खेळावर मी खूश आहे’ अशी संयत प्रतिक्रिया तिने दिली. तिचे गुरू गोपीचंद, आई, माजी व्हॉलिबॉलपटू पी. विजया आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे माजी मानकरी पी.व्ही. रामण्णा म्हणजे तिचे वडील यांनीही मारिनाचे सोनेरी यश खिलाडू उमदेपणाने स्वीकारले. सिंधूचे सुवर्णपदक हुकले म्हणून यापैकी कोणीही आदळआपट, धुसफूस केली नाही. आपल्या अपयशाला प्रतिस्पर्धीच जबाबदार आहे, तिला दाद देणारे, तिचे मनोधैर्य वाढवणारे कितीतरी प्रेक्षक तिथे होते असा कांगावा एकानेही केला नाही. देशातील याआधीच्या खेळाडूंनी कधी नेत्रदीपक कामगिरी केलीच नाही, त्यांनी पदक न मिळवण्याचा वारसा आम्हाला विरासत (वारसा) म्हणून दिला असे म्हणत आपल्या अपयशाचे खापर त्यांनी आधीच्या खेळाडूंवर फोडले नाही. घरची साधारण आर्थिक स्थिती, समाजाकडून निर्माण केले जाणारे अडथळे, देशाची खेळनीती यांच्यावर सुवर्णपदक हुकल्याची जबाबदारी न ढकलता १२ वर्षे निष्ठेने तप करणाऱ्या सिंधूने आणि तिच्या पाठीशी पहाडाप्रमाणे उभे ठाकलेल्या गुरूंनी, आई-वडिलांनी प्रश्नकर्त्यांना अत्यंत सकारात्मक उत्तर दिले - ‘यानंतर स्वत:त अधिक सुधारणा करून भावी काळात यशासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.’एकाग्रता, परिश्रम तसेच विवेक विचार मानवी स्वभावाचा अमूल्य पैलू असतो हे त्यांनी दाखवून दिले. या विवेकाचेच दर्शन सिंधूच्या कृतीतून साऱ्या जगाने बघितले.-डॉ. सौ. प्रज्ञा आपटे