शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

संस्कारातून विवेकाचे दर्शन

By admin | Updated: August 27, 2016 05:52 IST

सिंधू आणि स्पेनची मारिना कॅरोलिना यांच्यातील बॅडमिंटनचा अटीतटीचा अंतिम सामना दूरचित्रवाणीच्या पडद्यासमोर सगळे भारतीय श्वास रोखून व नजर खिळवून पाहात होते.

रिओ आॅलिम्पिकमध्ये आपली सिंधू आणि स्पेनची मारिना कॅरोलिना यांच्यातील बॅडमिंटनचा अटीतटीचा अंतिम सामना दूरचित्रवाणीच्या पडद्यासमोर सगळे भारतीय श्वास रोखून व नजर खिळवून पाहात होते. ती नाट्यमय चुरस आशानिराशेच्या हिंदोळ्यावर झुलत होती. दोघींच्या खेळात विजेची चपळता व कुशलता होती. आत्मविश्वास, जिद्द आणि एकाग्रता होती. आॅलिम्पिकच्या रौप्यपदकाची सिंधू मानकरी ठरली. मनातील खळबळ सावरत तिने मोठ्या उमदेपणाने मारिनाला जवळ घेतले व तिचे मन:पूर्वक अभिनंदन केले. त्याचक्षणी सव्वाकोटी भारतीयांची व जगातील क्रीडाप्रेमी प्रेक्षकांची मने या सोनपरीने जिंकून घेतली.आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. याचा गर्वाने, अहंकाराने तर नव्हेच पण अभिमानाने वारंवार उच्चार करण्याचे तिने संयमाने आणि उच्च संस्कार मिळाले असल्याने टाळले. ‘सुवर्णपदक मिळवण्याचे माझे लक्ष्य होते. त्यासाठी मी खूप प्रयत्न केले. पण मारिना खूप छान खेळली. तिच्या खेळावर मी खूश आहे’ अशी संयत प्रतिक्रिया तिने दिली. तिचे गुरू गोपीचंद, आई, माजी व्हॉलिबॉलपटू पी. विजया आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे माजी मानकरी पी.व्ही. रामण्णा म्हणजे तिचे वडील यांनीही मारिनाचे सोनेरी यश खिलाडू उमदेपणाने स्वीकारले. सिंधूचे सुवर्णपदक हुकले म्हणून यापैकी कोणीही आदळआपट, धुसफूस केली नाही. आपल्या अपयशाला प्रतिस्पर्धीच जबाबदार आहे, तिला दाद देणारे, तिचे मनोधैर्य वाढवणारे कितीतरी प्रेक्षक तिथे होते असा कांगावा एकानेही केला नाही. देशातील याआधीच्या खेळाडूंनी कधी नेत्रदीपक कामगिरी केलीच नाही, त्यांनी पदक न मिळवण्याचा वारसा आम्हाला विरासत (वारसा) म्हणून दिला असे म्हणत आपल्या अपयशाचे खापर त्यांनी आधीच्या खेळाडूंवर फोडले नाही. घरची साधारण आर्थिक स्थिती, समाजाकडून निर्माण केले जाणारे अडथळे, देशाची खेळनीती यांच्यावर सुवर्णपदक हुकल्याची जबाबदारी न ढकलता १२ वर्षे निष्ठेने तप करणाऱ्या सिंधूने आणि तिच्या पाठीशी पहाडाप्रमाणे उभे ठाकलेल्या गुरूंनी, आई-वडिलांनी प्रश्नकर्त्यांना अत्यंत सकारात्मक उत्तर दिले - ‘यानंतर स्वत:त अधिक सुधारणा करून भावी काळात यशासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.’एकाग्रता, परिश्रम तसेच विवेक विचार मानवी स्वभावाचा अमूल्य पैलू असतो हे त्यांनी दाखवून दिले. या विवेकाचेच दर्शन सिंधूच्या कृतीतून साऱ्या जगाने बघितले.-डॉ. सौ. प्रज्ञा आपटे