शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

संस्कारातून विवेकाचे दर्शन

By admin | Updated: August 27, 2016 05:52 IST

सिंधू आणि स्पेनची मारिना कॅरोलिना यांच्यातील बॅडमिंटनचा अटीतटीचा अंतिम सामना दूरचित्रवाणीच्या पडद्यासमोर सगळे भारतीय श्वास रोखून व नजर खिळवून पाहात होते.

रिओ आॅलिम्पिकमध्ये आपली सिंधू आणि स्पेनची मारिना कॅरोलिना यांच्यातील बॅडमिंटनचा अटीतटीचा अंतिम सामना दूरचित्रवाणीच्या पडद्यासमोर सगळे भारतीय श्वास रोखून व नजर खिळवून पाहात होते. ती नाट्यमय चुरस आशानिराशेच्या हिंदोळ्यावर झुलत होती. दोघींच्या खेळात विजेची चपळता व कुशलता होती. आत्मविश्वास, जिद्द आणि एकाग्रता होती. आॅलिम्पिकच्या रौप्यपदकाची सिंधू मानकरी ठरली. मनातील खळबळ सावरत तिने मोठ्या उमदेपणाने मारिनाला जवळ घेतले व तिचे मन:पूर्वक अभिनंदन केले. त्याचक्षणी सव्वाकोटी भारतीयांची व जगातील क्रीडाप्रेमी प्रेक्षकांची मने या सोनपरीने जिंकून घेतली.आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. याचा गर्वाने, अहंकाराने तर नव्हेच पण अभिमानाने वारंवार उच्चार करण्याचे तिने संयमाने आणि उच्च संस्कार मिळाले असल्याने टाळले. ‘सुवर्णपदक मिळवण्याचे माझे लक्ष्य होते. त्यासाठी मी खूप प्रयत्न केले. पण मारिना खूप छान खेळली. तिच्या खेळावर मी खूश आहे’ अशी संयत प्रतिक्रिया तिने दिली. तिचे गुरू गोपीचंद, आई, माजी व्हॉलिबॉलपटू पी. विजया आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे माजी मानकरी पी.व्ही. रामण्णा म्हणजे तिचे वडील यांनीही मारिनाचे सोनेरी यश खिलाडू उमदेपणाने स्वीकारले. सिंधूचे सुवर्णपदक हुकले म्हणून यापैकी कोणीही आदळआपट, धुसफूस केली नाही. आपल्या अपयशाला प्रतिस्पर्धीच जबाबदार आहे, तिला दाद देणारे, तिचे मनोधैर्य वाढवणारे कितीतरी प्रेक्षक तिथे होते असा कांगावा एकानेही केला नाही. देशातील याआधीच्या खेळाडूंनी कधी नेत्रदीपक कामगिरी केलीच नाही, त्यांनी पदक न मिळवण्याचा वारसा आम्हाला विरासत (वारसा) म्हणून दिला असे म्हणत आपल्या अपयशाचे खापर त्यांनी आधीच्या खेळाडूंवर फोडले नाही. घरची साधारण आर्थिक स्थिती, समाजाकडून निर्माण केले जाणारे अडथळे, देशाची खेळनीती यांच्यावर सुवर्णपदक हुकल्याची जबाबदारी न ढकलता १२ वर्षे निष्ठेने तप करणाऱ्या सिंधूने आणि तिच्या पाठीशी पहाडाप्रमाणे उभे ठाकलेल्या गुरूंनी, आई-वडिलांनी प्रश्नकर्त्यांना अत्यंत सकारात्मक उत्तर दिले - ‘यानंतर स्वत:त अधिक सुधारणा करून भावी काळात यशासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.’एकाग्रता, परिश्रम तसेच विवेक विचार मानवी स्वभावाचा अमूल्य पैलू असतो हे त्यांनी दाखवून दिले. या विवेकाचेच दर्शन सिंधूच्या कृतीतून साऱ्या जगाने बघितले.-डॉ. सौ. प्रज्ञा आपटे