शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

वेध दमदार मतदानास हिंंसेचे गालबोट !

By admin | Updated: February 24, 2017 00:31 IST

एका बाजूने मतदान केंद्रापर्यंत जाऊन सामान्य मतदार लोकशाहीतील महत्त्वपूर्णभूमिका प्रामाणिकपणे पार पाडत असताना

एका बाजूने मतदान केंद्रापर्यंत जाऊन सामान्य मतदार लोकशाहीतील महत्त्वपूर्ण भूमिका प्रामाणिकपणे पार पाडत असताना राजकीय वैचारिक लढाई न करता नेत्यांनी गैरमार्ग हाताळावेत, ही बाब खूपच गंभीर आहे. दक्षिण महाराष्ट्राने अनेक वेळा राज्याचे, पक्षांचे नेतृत्व केले आहे. या पार्श्वभूमीवर घडलेल्या हिंसाचाराच्या घटना गंभीर आहेत. 

दक्षिण महाराष्ट्राला असंख्य निवडणुकांची सवयच आहे. वर्षाला डझनभर मोठ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका अत्यंत चुरशीने होतात. शिवाय लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषदा, नगरपालिका, ग्रामपंचायती आदि लोकप्रतिनिधी सभागृहासाठी निवडणुका चुरशीने होतात. सामान्य शेतकरी पुरुष आणि महिलाही मतदानास भरभरून प्रतिसाद देतात. विशेषत: साखर कारखान्याच्या निवडणुकांसाठी दोन डझनभर संचालक निवडायचे असतात. त्यात उत्पादक शेतकरी गटाचे सतरा, अनुत्पादक गटातून दोन, सहकारी संस्था गटातून एक, महिला गटातून दोन-तीन, मागासवर्गीय आणि भटक्या विमुक्त गटातून प्रत्येकी एक, अशी विविध गटांत मते द्यावी लागतात. तरीही सभासद एकाच गटाच्या चोवीस जणांना मतदान करून ठरावीक गटास निवडून देतात. जिल्हा बँक, अर्बन बँक, शिक्षक बँक, पतसंस्था, सूतगिरण्या, दूध संघ, साखर कारखाने, अशा असंख्य संस्थांच्या निवडणुका जोरदार होतात. दक्षिण महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबातील एकजण तरी वर्षाला मतदानास सामोरे जातो. अशा या दक्षिण महाराष्ट्रात (कोल्हापूर, सांगली आणि सातारा) जिल्हा परिषदा, तसेच तालुका पंचायत समित्यांसाठी मंगळवारी मतदान झाले. या तिन्ही जिल्ह्यांतील मतदान ७१ ते ७७ टक्क्यांपर्यंत झाले आहे. राज्यातील दहा महापालिकांचे मतदान ५५ टक्क्यांपेक्षा पुढे जात नसताना जवळपास २० ते २५ टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. ग्रामीण भागातील जनता अधिकच मतदान करते. कोल्हापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांत ऐंशी टक्क्यांपेक्षाही अधिक मतदान झाले आहे. मुंबई महापालिकेसाठी गेल्या अनेक निवडणुकीत पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होत नव्हते. यावेळी त्यात वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर दक्षिण महाराष्ट्र खूपच आघाडीवर आहे. मतदार याद्यांची दुरुस्ती किंवा याद्या अद्ययावत केल्या, तर दक्षिण महाराष्ट्रातील टक्का नव्वदीपेक्षा पुढे जाऊ शकतो. जगभरात इतके मतदान कोठेही होत नाही. दक्षिण महाराष्ट्राची ही सर्व जमेची बाजू असली तरी अलीकडच्या काळात या निवडणुकांना हिंसाचाराचे गालबोट लागत आहे. पैशाचा वारेमाप वापर करण्यात येऊ लागला आहे. सांगली जिल्ह्यात एका पोलीस कर्मचाऱ्यासच मारहाण करण्यात आली. इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना पैसे वाटण्याच्या आरोपावरून कोंडून ठेवण्याचा प्रयत्न झाला. साताऱ्यात खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे या दोन चुलत भावांच्या कार्यकर्त्यांची रस्त्या-रस्त्यावर हाणामारी झाली. याप्रकरणात खासदार उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे गटाचे वसंत मानकुमरे यांच्यासह ८० जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे हे दोघे राजे एकाच पक्षात आहेत. एकाच शहरात राहतात. पण, त्यांचे राजकीय वैर आता हिंसेचे स्वरूप धारण करीत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एका सरपंचांकडून पोलिसास मारहाण करण्यात आली. अशा या मारामारीच्या घटना गंभीर आहेत. गोळीबाराचे प्रकारही घडले आहेत. निवडणूक आयोगाने अनेक बंधने घालूनही पैशाच्या वापराचे नियंत्रण होत नाही. एका गटात पैसे वाटप करताना कार्यकर्ते सापडले. नगराध्यक्षांवरच पैसे वाटल्याचा आरोप होतो आहे. खासदार आणि आमदारांविरुद्ध मारामारीच्या तक्रारी होत आहेत. ही धोक्याची घंटा आहे. एका बाजूने सामान्य मतदार मतदान केंद्रापर्यंत जाऊन लोकशाही प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका प्रामाणिकपणे पार पाडत असताना राजकीय वैचारिक लढाई न करता नेत्यांनी गैरमार्ग हाताळावेत, ही बाब गंभीर आहे. दक्षिण महाराष्ट्राने अनेक वेळा राज्याचे, पक्षांचे नेतृत्व केले आहे. या पार्श्वभूमीवर घडलेल्या हिंसाचाराच्या घटना गंभीर आहेत. - वसंत भोसले