शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
2
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
3
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
4
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
5
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
6
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
7
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
8
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
9
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
10
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
11
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
12
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
13
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
14
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
15
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
16
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
17
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
18
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
19
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
20
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?

वेदान्त जाहला स्वदेशी

By admin | Updated: July 21, 2016 04:13 IST

वैयक्तिक आणि सामुदायिक जीवन उन्नत करणे हे ब्रह्मविद्येचे किंवा वेदान्ताचे ध्येय होय.

वैयक्तिक आणि सामुदायिक जीवन उन्नत करणे हे ब्रह्मविद्येचे किंवा वेदान्ताचे ध्येय होय. जीवनापासून दूर जाण्यासाठी वेदान्त अवतीर्ण झाला नाही. परंतु मध्यंतरीच्या काळात हा वेदान्त परदेशी झाला होता. संत एकनाथमहाराज म्हणतात, ‘परदेशी जाहला होता वेदान्त।’ उपनिषदातील ब्रह्मविद्या म्हणजे वेदान्त हा फक्त त्रैवर्णिकांनाच उपलब्ध असे. त्यामुळे बहुजन समाजाला हा वेदान्त पोथ्या-पुराणे आणि ग्रंथांमध्ये बंदिस्त होऊन परदेशी झाला होता आणि दुसरीकडे वेदान्त आणि व्यवहार यात फारकत होऊनही तो परदेशी झाला होता. ज्ञानदेवांनी परदेशी झालेला वेदान्त पुन्हा देशी केला आणि वेदान्ताचा तसेच कैवल्याचा अधिकार सर्वांना आहे, हे ठामपणे सांगितले. सामान्य कष्टकरी ज्ञानदेवांकडे येतो आणि सांगतो, ‘मला ग्रंथ वाचता येत नाही. मला ज्ञान समजत नाही. भक्तीपासून मी दूर आहे. तरीही मला कैवल्य हवे आहे.’ माऊली त्याला असे म्हणाले नाहीत की, ‘अरे तुला काहीच येत नाही; मग कैवल्य कसे मिळणार?’ ज्ञानदेव म्हणतात, म्हणौनि स्वधर्मे निष्कामता। अनुसरले पार्था।।तेथ कैवल्यपद तत्वता।पातले जगी।।तू कष्ट करतोस, श्रम करतोस, त्या श्रमालाच देव समज. तुझ्या कर्मातच कैवल्य उभे राहील. सम असणाऱ्या या भगवंताची भक्ती जेव्हा मानवी समतेच्या व निरपेक्ष सेवेच्या रुपाने प्रकट होते तेव्हा वेदांत स्वदेशी होतो. ज्ञानदेवांच्या लेखी विद्वान, पंडित, शास्त्री, तत्वज्ञ यांच्याइतकाच बहुजन कष्टकरी समाजही कैवल्याचा अधिकारी म्हणून उभा राहातो. म्हणूनच सामान्यांच्या बोलीभाषेत त्यांच्या नित्याच्या व्यवहारातील कृषी, मोट, पाणी, झाडे, शिवार, शेतकरी, कष्टकरी, वने, अरण्ये, बैल, औजारे यासारख्या प्रतिमा वापरून त्यांनी ज्ञानभक्तीचा उपदेश करीत त्यांच्याही जीवनात शुद्ध कर्मयोगाचे प्रबोधन घडविले आहे.परंपरागत कर्मकांडातील आणि लौकिक व्यवहारातील जडत्व त्यांना घालवायचे होते. त्यासाठी त्यांनी लोकाभिमुख होऊन, जनलोकात वावरून बहुजन समाजाच्या अंतरंगात आणि ब्राह्याचारात नवचैतन्यसाठी प्रयत्न केला. भक्तिपंथाचा उदय आणि विस्तार, देशभाषेची प्रतिष्ठा आणि त्याच्या अनुषंगाने लोकजीवनाच्या पृथगात्मतेची जाणीव या तीन संकल्पना स्वीकारून ज्ञानदेवांनी शास्त्रप्रामाण्याची चौकट काहीशी शिथील केली. पुरुषार्थप्रधान विवेकप्रामाण्याची बैठक दृढ केली. जनसमूहाच्या सामाजिक अभिसरणाठीच भक्तीपीठावर एकत्र आणले. समतेची पताका खांद्यावर घेतली आणि ज्ञानदेवांच्या नेतृत्वाखाली ही एकात्मतेची दिंडी निघाली. ही दिंडी महाराष्ट्राच्या लोकजीवनाचे सांस्कृतिक वैभव ठरली..-डॉ. रामचंद्र देखणे