शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

व्रतस्थ वृत्तीचा प्रज्ञावंत संशोधक

By admin | Updated: July 7, 2016 03:51 IST

डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या निधनानं पुण्यातील एक ज्ञानवृक्षच उन्मळून पडला. संशोधनासारख्या शास्त्रकाट्याच्या कसोटीच्या क्षेत्रात प्रज्ञेला, सर्जनाला त्यांनी वाव दिला. आपल्या कार्यातून

- विजय बाविस्करडॉ. रा. चिं. ढेरे यांच्या निधनानं पुण्यातील एक ज्ञानवृक्षच उन्मळून पडला. संशोधनासारख्या शास्त्रकाट्याच्या कसोटीच्या क्षेत्रात प्रज्ञेला, सर्जनाला त्यांनी वाव दिला. आपल्या कार्यातून अभिजन-बहुजन संस्कृतीतील दरी मिटवली.पुण्यात गेल्या आठवड्यात प्रस्थानत्रयी झाली. ज्ञानियांचा राजा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं व अजरामर शब्दरत्नांची उधळण करणाऱ्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं विठुरायाच्या भेटीसाठी पंढरीकडे प्रस्थान केलं. याच दिवशी पुण्यनगरीचं खऱ्या अर्थानं भूषण, लोकसंस्कृती, लोककला-संतपरंपरेचे अभ्यासक, संशोधक, ऋषितुल्य व्रतस्थ ज्ञानमहर्षी डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे यांनी आपला देह ठेवून महायात्रेसाठी प्रस्थान केलं. पुण्याची प्रतिष्ठा देश-विदेशात वाढवणाऱ्या अनेक श्रेष्ठ विभुती या शहरात होऊन गेल्या. डॉ. रा. चिं. ढेरे हे या परंपरेतील एक महत्त्वाचं नाव. प्राच्यविद्यापंडित परंपरेतील वि. का. राजवाडे, श्रीधर व्यंकटेश केतकर, धर्मानंद कोसंबी आदींशी नातं सांगणारा हा संशोधक होता. त्यांनी संतसाहित्य, लोकसाहित्य, प्राचीन साहित्याचा अभ्यास लोकसंस्कृती, लोकपरंपरा, लोकदैवतांच्या अंगानं केला. त्यांचं हे अफाट संशोधनकार्य थक्क करणारं आहे. त्यांची शंभरावर असलेली ग्रंथसंपदा याची अजरामर साक्ष देत राहील.पुणे परिसरात अंदर मावळातील निगडे या छोट्याशा गावात जन्मलेल्या रा. चिं. ढेरेंनी शिक्षण आणि उपजीविकेसाठी पुणं गाठलं. त्यानंतर सात दशकं पुण्यातच राहून त्यांनी संशोधनाचं भगीरथ कार्य सिद्धीस नेलं. या पुण्यभूमीविषयी त्यांच्या मनात अतीव कृतज्ञ भाव होते. पुण्यभूषण पुरस्कार त्यांना प्रदान झाला, त्या सोहळ्यात त्यांनी पुण्याचं ऋण व्यक्त केलं होतं. ‘या पुण्यानं मला अक्षरश: मातीतून वर काढलं. आधी पुण्यानं आणि मग सगळ्याच मराठी जगानं मला स्वीकारलं. पुण्यात येताना मी कुणीच नव्हतो. इथं आल्यावर मी अभ्यासक झालो, संशोधक झालो आणि मुख्य म्हणजे माणूस झालो,’ अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञ भावना व्यक्त केल्या होत्या. त्यांना प्रदान केलेला पुण्यभूषण पुरस्कार पुणेकरांच्या मनातील त्यांच्या स्थानाचं जणू प्रतीकच होतं. विविध पुरस्कारांनी ते सन्मानित झाले खरे, परंतु एखाद्या विद्यापीठापेक्षाही मोठं संशोधनकार्य एकहाती करणाऱ्या डॉ. ढेरेंच्या कार्याची देशपातळीवर योग्य ती दखल घेतली गेली नसल्याचा सल पुणेकरांच्या मनात आहे.‘अण्णा’ नावानं सर्वपरिचित असलेल्या डॉ. ढेरेंच्या अफाट कार्याला ‘ढेरे विद्यापीठ’ असंही म्हटलं जायचं. खरं तर ऋषितुल्य, लोकसंस्कृतीचा उपासक, समर्पित संशोधक अशी अमुक एक उपाधी त्यांना लावता येणार नाही, असं त्यांचं कार्य असिम आणि अमिट होतं.अण्णांनी प्रारंभीच्या काळात पुणे-मुंबई आकाशवाणीसाठी वेगवेगळ्या सांगीतिका लिहिल्या. ‘योगेश’ या टोपणनावानं कविताही केल्या; पण संशोधनाकडे वळल्यानंतर कविता मागे पडली. तरीही या कवितेनंच त्यांना संशोधन प्रांतातही सर्जनाशी बांधून ठेवलं. त्याविषयी त्यांनीच म्हटलंय, ‘संतपरंपरा आणि लोकपरंपरा हे माझ्या अभ्यासाचे विषय. माझ्या अभ्यासाचं क्षेत्रंच असं आहे, की तिथं आत जायचं तर मानव्याच्या महाद्वारातून जावं लागतं. माझ्या या वाटेवर कवितांचे दिलासे सारखे भरवसा देत राहिले.’ ‘त्यांच्यातल्या कवीनं संशोधनाच्या प्रज्ञेचा हात धरला आणि संशोधन हाच त्यांच्यासाठी प्रातिभ शक्तीचा विलास ठरला, ही गोष्ट मराठी संशोधन क्षेत्रात असाधारण म्हटली पाहिजे,’ अशा नेमक्या शब्दात त्यांच्या कन्या व प्रख्यात कवयित्री अरुणा ढेरे यांनी अण्णांच्या कार्याचं वर्णन केलं आहे. पानशेतच्या पुरात त्यांच्या घरातील दुर्मिळ ग्रंथसंपदा वाहून गेल्यानंतर पुस्तकं खरेदी करण्यासाठी उसनवारी करताना प्रसंगी पत्नीचे दागिनेही त्यांनी गहाण ठेवले. त्या माऊलीनंही अर्धांगिनीची संकल्पना सार्थ ठरवून त्यांना साथ दिली. त्यांच्या संशोधनावर वादही निर्माण झाले, तरी त्या वादात अण्णा गुंतून पडले नाहीत. थोरामोठयांच्या निधनानंतर पोकळी हा शब्द अनेकदा वापरल्यानं त्यातला भाव हरवला आहे. मात्र, अशा या ज्ञानयोग्याच्या जाण्याने शब्दश: ती भरून न येणारी आहे.