शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

कुरुप वास्तव

By admin | Updated: January 19, 2017 23:55 IST

पुढील सप्ताहात साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने काही प्रश्न मनात येतात.

पुढील सप्ताहात साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने काही प्रश्न मनात येतात. स्वातंत्र्य मिळून सत्तर तर देश प्रजासत्ताक होऊन जवळपास तेवढीच वर्षे झाली आहेत. नवे सहस्त्रक उदयाला आले, त्याचेही सतरावे वर्ष आता सुरू आहे. या कालखंडाने सर्वसामान्य माणसाला काय दिले, किंवा सर्वसामान्य माणसाने या कालखंडात काय मिळवले असा एक प्रश्न आहे.या प्रश्नाची अनेक उत्तरे येतील. नकारार्थी बोलायचे नाही अशी आपल्याला लहानपणापासून शिकवण असल्याने कोणकोणत्या क्षेत्रात आपण काय काय प्रगती केली याची एक यादी तयार करून आपण स्वत:ची पाठ स्वत:च थोपटून घेऊ. त्यासाठीच अशा प्रसंगी सार्वजनिक समारंभ आयोजित करण्याची, तेथे भाषणे करण्याची व भाषणात स्वत:ची वारेमाप स्तुती करण्याची पद्धत आहे. पण जर थोडे खोलात जायचे ठरले, परिस्थितीचा कठोर आढावा घ्यायचे ठरले तर काय हाती लागेल?तंत्रज्ञानाच्या विकासामुळे जगण्याला गती आली, हे खरे असले तरी त्या गतीमुळे भोवंडून गेलेल्या माणसाची जगण्याची दिशा चुकली, त्याचे काय? विज्ञानाने माणसाचे जगणे सुसह्य केले हे खरे आहे, पण त्याने त्याला विलासी बनवले त्याचे काय? भौतिक साधनांचा प्रचंड विकास झाला हे खरे आहे, पण माणसाच्या आत्मिक प्रगतीचे काय? भौतिक प्रगतीला महत्व दिले पाहिजेच, पण आत्मिक प्रगतीचे मोल नाकारून चालणार नाही. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची जी व्याख्या केली आहे तीत माणसाच्या शरीराबरोबरच त्याची मानसिक स्थिती, त्याची आध्यात्मिक जाण आणि त्याच्या सामाजिक स्थानाचाही विचार केला आहे. मग आपण दावा करत असलेल्या तथाकथित प्रगतीचा आनंद घेण्यासाठी माणूस जर सुदृढ मन:स्थितीत नसेल तर त्या प्रगतीला काय अर्थ आहे?जगणे सुंदर आहे असे अनेकजण सांगतात. माणसाचा जन्म एकदाच मिळतो, त्याची प्रतिष्ठा वाढावी असे काही तरी काम आपण केले पाहिजे, असेही साऱ्यांना वाटते. पण मग हे सुंदर आणि संस्मरणीय जगणे प्रत्यक्षात आपण कुरूप आणि दु:खमय करण्याच्या मागे का लागलो आहोत? भौतिक प्रगतीच्या नावाने होत असलेला बाहेरील कचरा आणि जातपात, धर्म, वर्ण, पंथ, वंशाच्या नावाने मनात साचत असलेला कचरा, व त्याच्या ढिगाऱ्यात माणसाच्या जगण्यातले सौंदर्य हरवून गेले आहे, हे नाकारण्यात काय अर्थ आहे? -प्रल्हाद जाधव