शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

कुरुप वास्तव

By admin | Updated: January 19, 2017 23:55 IST

पुढील सप्ताहात साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने काही प्रश्न मनात येतात.

पुढील सप्ताहात साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने काही प्रश्न मनात येतात. स्वातंत्र्य मिळून सत्तर तर देश प्रजासत्ताक होऊन जवळपास तेवढीच वर्षे झाली आहेत. नवे सहस्त्रक उदयाला आले, त्याचेही सतरावे वर्ष आता सुरू आहे. या कालखंडाने सर्वसामान्य माणसाला काय दिले, किंवा सर्वसामान्य माणसाने या कालखंडात काय मिळवले असा एक प्रश्न आहे.या प्रश्नाची अनेक उत्तरे येतील. नकारार्थी बोलायचे नाही अशी आपल्याला लहानपणापासून शिकवण असल्याने कोणकोणत्या क्षेत्रात आपण काय काय प्रगती केली याची एक यादी तयार करून आपण स्वत:ची पाठ स्वत:च थोपटून घेऊ. त्यासाठीच अशा प्रसंगी सार्वजनिक समारंभ आयोजित करण्याची, तेथे भाषणे करण्याची व भाषणात स्वत:ची वारेमाप स्तुती करण्याची पद्धत आहे. पण जर थोडे खोलात जायचे ठरले, परिस्थितीचा कठोर आढावा घ्यायचे ठरले तर काय हाती लागेल?तंत्रज्ञानाच्या विकासामुळे जगण्याला गती आली, हे खरे असले तरी त्या गतीमुळे भोवंडून गेलेल्या माणसाची जगण्याची दिशा चुकली, त्याचे काय? विज्ञानाने माणसाचे जगणे सुसह्य केले हे खरे आहे, पण त्याने त्याला विलासी बनवले त्याचे काय? भौतिक साधनांचा प्रचंड विकास झाला हे खरे आहे, पण माणसाच्या आत्मिक प्रगतीचे काय? भौतिक प्रगतीला महत्व दिले पाहिजेच, पण आत्मिक प्रगतीचे मोल नाकारून चालणार नाही. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची जी व्याख्या केली आहे तीत माणसाच्या शरीराबरोबरच त्याची मानसिक स्थिती, त्याची आध्यात्मिक जाण आणि त्याच्या सामाजिक स्थानाचाही विचार केला आहे. मग आपण दावा करत असलेल्या तथाकथित प्रगतीचा आनंद घेण्यासाठी माणूस जर सुदृढ मन:स्थितीत नसेल तर त्या प्रगतीला काय अर्थ आहे?जगणे सुंदर आहे असे अनेकजण सांगतात. माणसाचा जन्म एकदाच मिळतो, त्याची प्रतिष्ठा वाढावी असे काही तरी काम आपण केले पाहिजे, असेही साऱ्यांना वाटते. पण मग हे सुंदर आणि संस्मरणीय जगणे प्रत्यक्षात आपण कुरूप आणि दु:खमय करण्याच्या मागे का लागलो आहोत? भौतिक प्रगतीच्या नावाने होत असलेला बाहेरील कचरा आणि जातपात, धर्म, वर्ण, पंथ, वंशाच्या नावाने मनात साचत असलेला कचरा, व त्याच्या ढिगाऱ्यात माणसाच्या जगण्यातले सौंदर्य हरवून गेले आहे, हे नाकारण्यात काय अर्थ आहे? -प्रल्हाद जाधव