शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कुरुप वास्तव

By admin | Updated: January 19, 2017 23:55 IST

पुढील सप्ताहात साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने काही प्रश्न मनात येतात.

पुढील सप्ताहात साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने काही प्रश्न मनात येतात. स्वातंत्र्य मिळून सत्तर तर देश प्रजासत्ताक होऊन जवळपास तेवढीच वर्षे झाली आहेत. नवे सहस्त्रक उदयाला आले, त्याचेही सतरावे वर्ष आता सुरू आहे. या कालखंडाने सर्वसामान्य माणसाला काय दिले, किंवा सर्वसामान्य माणसाने या कालखंडात काय मिळवले असा एक प्रश्न आहे.या प्रश्नाची अनेक उत्तरे येतील. नकारार्थी बोलायचे नाही अशी आपल्याला लहानपणापासून शिकवण असल्याने कोणकोणत्या क्षेत्रात आपण काय काय प्रगती केली याची एक यादी तयार करून आपण स्वत:ची पाठ स्वत:च थोपटून घेऊ. त्यासाठीच अशा प्रसंगी सार्वजनिक समारंभ आयोजित करण्याची, तेथे भाषणे करण्याची व भाषणात स्वत:ची वारेमाप स्तुती करण्याची पद्धत आहे. पण जर थोडे खोलात जायचे ठरले, परिस्थितीचा कठोर आढावा घ्यायचे ठरले तर काय हाती लागेल?तंत्रज्ञानाच्या विकासामुळे जगण्याला गती आली, हे खरे असले तरी त्या गतीमुळे भोवंडून गेलेल्या माणसाची जगण्याची दिशा चुकली, त्याचे काय? विज्ञानाने माणसाचे जगणे सुसह्य केले हे खरे आहे, पण त्याने त्याला विलासी बनवले त्याचे काय? भौतिक साधनांचा प्रचंड विकास झाला हे खरे आहे, पण माणसाच्या आत्मिक प्रगतीचे काय? भौतिक प्रगतीला महत्व दिले पाहिजेच, पण आत्मिक प्रगतीचे मोल नाकारून चालणार नाही. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची जी व्याख्या केली आहे तीत माणसाच्या शरीराबरोबरच त्याची मानसिक स्थिती, त्याची आध्यात्मिक जाण आणि त्याच्या सामाजिक स्थानाचाही विचार केला आहे. मग आपण दावा करत असलेल्या तथाकथित प्रगतीचा आनंद घेण्यासाठी माणूस जर सुदृढ मन:स्थितीत नसेल तर त्या प्रगतीला काय अर्थ आहे?जगणे सुंदर आहे असे अनेकजण सांगतात. माणसाचा जन्म एकदाच मिळतो, त्याची प्रतिष्ठा वाढावी असे काही तरी काम आपण केले पाहिजे, असेही साऱ्यांना वाटते. पण मग हे सुंदर आणि संस्मरणीय जगणे प्रत्यक्षात आपण कुरूप आणि दु:खमय करण्याच्या मागे का लागलो आहोत? भौतिक प्रगतीच्या नावाने होत असलेला बाहेरील कचरा आणि जातपात, धर्म, वर्ण, पंथ, वंशाच्या नावाने मनात साचत असलेला कचरा, व त्याच्या ढिगाऱ्यात माणसाच्या जगण्यातले सौंदर्य हरवून गेले आहे, हे नाकारण्यात काय अर्थ आहे? -प्रल्हाद जाधव