शहरं
Join us  
Trending Stories
1
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
2
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
3
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
4
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
5
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
6
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
7
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
8
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
9
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
10
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
11
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
12
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
13
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
14
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
15
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
16
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

चिवचिवणारी वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2016 06:38 IST

शालेय जीवनातील लक्षात ठेवावी अशी गोष्ट कोणती, असा जर प्रश्न मला कोणी केला तर त्याचे तत्काळ उत्तर म्हणजे कविता़ कविता मनात घर करून राहातात़

शालेय जीवनातील लक्षात ठेवावी अशी गोष्ट कोणती, असा जर प्रश्न मला कोणी केला तर त्याचे तत्काळ उत्तर म्हणजे कविता़ कविता मनात घर करून राहातात़ पुन्हा पुन्हा ओठी येतात, गुणगुणावाश्या वाटतात़ असे का व्हावे? कारण त्या कवितांनी एक संस्कार दिलेला असतो़ कवितेचा नित्य नवा अर्थ लागत जातो़ जीवाला बरे वाटते़ आपणच आपल्या मनाशी संवाद करत असतो़ कवितांची ही देन सुखावह वाटते़ उतारवयातील विस्मरणाच्या स्पर्धेत कविता मात्र स्मरणात राहातात़ नवा अनुभव देतात़ विंदा करंदीकरांची, ‘चिवचिवणारी वाट असावी दमछाटीची यावी घाटी घाटीनंतर गडग्यापाशी पार असावा बसण्यासाठी’ ही कविता अचानक ओठी आली आणि भुर्रकन उडून जाणाऱ्या चिमण्यांचा थवा नजरेपुढती आला़ ‘चिव चिव ये, दाणा खा पाणी पी, भुर्र उडून जा’ चिमणीला ना दाणा दिला, ना पाणी पाजले़ नातवंडांचे रडे थांबवायला मात्र चिऊ आणि काऊच लागतात़ त्यांना खेळवता खेळवता आपणच खेळत असतो़ चिऊ-काऊच्या गोष्टीतील एकाक्ष कावळ्याचा तिरस्कार बालपणीच मुलांना आपण शिकवतो़ त्याचे घर शेणाचे, पावसात वाहून जाणारे़ त्याला चिमणीच्याच दारी यावे लागते़ दार उघड, म्हणून केवढा तगादा चिमणीकडे लावतो़ चिमणी मात्र आपल्या बाळाचे सर्व काम पूर्ण करते, मगच कावळ्याला घरात घेते़ लहानपणी चिमणी कळलीच नाही़ आजोबा झाल्यावर नातवंडांना खेळवताना समजली़ संसारावर प्रेम करणारी, लेकरांचं कौतुक करणारी, आल्यागेल्यांना आश्रय देणारी़ वारे! चिमणी़ आपलाही संसार चिमणीसारखाच असतो़ आपले चिमणी आणि चिमणराव भुर्रकन उडून जातात ते पंखात बळ आल्यावऱ आपण मात्र त्यांच्या आठवणी काढून असहाय्यपणे जगत राहातो़ धुवाधार पाऊस सुरू झाला़ अनेक घरांची पडझड पाहिली की वाटते चिमणी किती हुशार. मेणाचे घर बांधते तिचा संसार सुखाचा संसाऱ पोराबाळांचे करता आले, दारी आलेल्या अतिथीची सोय करता आली म्हणजे झाले़ कावळ्याला घरात घेणारी चिमणी पोपटाचे निमंत्रण धुडकावते़ सोन्याच्या पिंजऱ्यात राहायला, बोलावणाऱ्या पोपटाला स्वाभिमानी चिमणी खडे बोल सुनावते़‘जळो तुझा पिंजरा मेलाचिमणी उडून गेली राना’ स्वातंत्र्यावर प्रेम करणारी, कोणत्याही आमिषाला न भुलणारी, बंधन झुगारणारी, स्वत:च्या संसारावर निरतिशय प्रेम करणारी चिमणी कदाचित म्हणतही असेल, ‘संसार हा सुखाचा मी अमृतात नाहते’ झाडे गेली, वेली गेल्या, चिमण्या राहणार कोठे आणि घरी येणार तरी कशा? चिमण्या आल्या पाहिजेत़ चिवचिवाट कानी पडला पाहिजे़-डॉ.गोविंद काळे