शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

वर्ष तंत्रोदयाचे!

By admin | Updated: January 1, 2015 02:58 IST

नव्या पिढीला ज्ञानातून तंत्रज्ञान विकसित करण्याची सवय लावण्याचा आणि त्यासाठी पुरेशा संधी उपलब्ध करून देण्याचा एक बदल देशाला नवा उज्ज्वल चेहरामोहरा देऊ शकतो.

नव्या पिढीला ज्ञानातून तंत्रज्ञान विकसित करण्याची सवय लावण्याचा आणि त्यासाठी पुरेशा संधी उपलब्ध करून देण्याचा एक बदल देशाला नवा उज्ज्वल चेहरामोहरा देऊ शकतो. नव्या वर्षात असा बदल अपेक्षित अशासाठी आहे, की त्यातून रोजगार निर्माण करणारे प्रज्ञावान उद्योजक बनू शकतात. विज्ञान आणि गणितातील देशांतर्गत आणि जागतिक पातळीवरही अफाट वाढत्या संधींना गवसणी घालणेही त्यातून शक्य होईल. हस्तिदंती मनोऱ्यात बसून माझा मार्ग एकला वा वायला, ही धारणा बदलून विज्ञान-तंत्रज्ञान आणि त्याचा वापर याला अनुकूल ठरणारे नेटवर्किंग बळकट करायला हवे. कल्पनांची भूमी ते संधींचा देश अशा परिवर्तनासाठी हा बदल नव्या वर्षात अपेक्षित आहे. आपल्या समस्या आणि आपल्याकडची परिस्थिती लक्षात घेऊन विज्ञानातील संशोधन होणे गरजेचे आहे. जिथं विज्ञानाविषयीचे कुतूहल अफाट आहे, त्या ग्रामीण भागातून ही गरज भागू शकते. म्हणून तिथे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अधिक गुंतवणुकीचा बदल अपेक्षित आहे.पली अर्थव्यवस्था बंदिस्त होती, तोवर कारखानदारीचा विकास आणि विस्तार सहज शक्य होता. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत आपण तंत्रज्ञान आयात करू लागलो. हा दुधारी उपाय आहे. कारण आपण जेव्हा तंत्रज्ञान इतर देशातून आयात करतो, तेव्हा त्या आधारे आपण वस्तू-सेवांची निर्मिती करतो. पण त्याचीच दुसरी बाजू अशी, की ते तंत्रज्ञान आपल्याला देणाऱ्यांकडे त्याहून अधिक विकसित तंत्रज्ञान असते. त्याच्या आधारे गुणवृद्धी केलेला माल ते आपल्याकडे पाठवू शकतात. तेव्हा गुणवत्तेच्या कसावर आपला माल त्याची बरोबरी करू शकत नाही. खुल्या बाजारपेठेत हे होणे अपरिहार्य ठरते. या परिस्थितीत आपण गुणवत्तेच्या बळावर आपल्या वस्तूंचं नाणं खणखणीत असल्याचं वाजवून सांगायला हवं. हे घडायचं तर विज्ञानाच्या क्षेत्रात विपुल आणि दर्जेदार संशोधन व्हायला हवं. त्यातून विज्ञानातील संशोधन व त्याचा तंत्रज्ञानात वापर अशी साखळी विकसित व्हायला हवी. जगभरात आता ज्ञानाधारित अर्थव्यवस्था सिद्ध झाली आहे. जे देश ती नीट हाताळू शकतील त्यांनाच त्याचा जास्त लाभ होईल. अफाट लोकसंख्या हे आपलं बलस्थान होऊ शकते. त्यासाठी लोकसंख्येचे रूपांतर प्रज्ञावान मनुष्यबळात करणे गरजेचे आहे. हे साध्य होण्यासाठी एक महत्त्वाचा बदल अपेक्षित आहे. तो असा की संशोधन, उद्योजकता आणि भांडवलनिर्मिती या त्रिवेणीची एक नैसर्गिक साखळी आपल्याकडे तयार होणे गरजेचे आहे. कल्पनांची वानवा नाही, पण नवी कल्पना वा नवा शोध तंत्रज्ञानात रूपांतरित करून तिचा पर्याप्त वापर करणे ही एक सामूहिक सहभागातून सिद्ध होणारी फलश्रुती असते. -डॉ. अनिल काकोडकर, अणुशास्त्रज्ञ