शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
2
ज्यांनी ट्रेनिग दिले त्यांनाच डसला! AI ने मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या घालविल्या
3
पीडित तरुणीचे आरोपीवर प्रेम, लग्नही केले; सर्वोच्च न्यायालयाला बदलावा लागला आपलाच निर्णय...
4
बीडमधील पवनचक्की प्रकल्प पुन्हा चर्चेत; सुरक्षारक्षकांचा चोरट्यांवर गोळीबार, एक ठार
5
मोठी घटना! भारतीय खासदारांचे विमान लँड होणार, तेवढ्यात युक्रेनने विमानतळावर केला हल्ला
6
"तिला घटस्फोट दे, नाहीतर तुला जिवे मारू’’, पत्नीच्या प्रियकराने दिलेल्या धमकीमुळे पती घाबरला, त्यानंतर...  
7
बिटकॉइन म्हणजे काय? ते कोण बनवतं? बँकेशिवाय कसं काम करतं? वाचा!
8
Vaishnavi Hagawane Death Case : राजेंद्र हगवणे अटकेआधी कुठे-कुठे फिरला?, समोर आली मोठी माहिती
9
मोठा खुलासा! ज्योती मल्होत्राने देशातील 'या' प्रसिद्ध मंदिरात घेतलेलं दर्शन, फोटोही कढले अन्...
10
IPL 2025 गाजवून बिहारच्या घरी परतला वैभव सूर्यवंशी; साऱ्यांनी केलं धमाकेदार स्वागत (Video)
11
2014 पूर्वी पाकिस्तानला योग्य उत्तर दिले नाही, BSF च्या कार्यक्रमातून अमित शाहांचा हल्लाबोल
12
'पाकिस्तान जिंदाबाद,' चिकलठाण्यात शिकाऊ कामगाराचे कंपनीतील मशीनवर देशद्रोही लिखाण!
13
‘हुंडामुक्त महाराष्ट्र - हिंसामुक्त कुटुंब’, सुप्रिया सुळे यांनी केला राज्यव्यापी लढ्याचा निर्धार, २२ जून पासून होणार सुरुवात
14
'शालू'च्या नव्या डान्सने घातला इंटरनेटवर धुमाकूळ, राजेश्वरीच्या मॉडर्न लूकवर खिळल्या सर्वांच्या नजरा
15
Shani Pradosh 2025: शनि प्रदोष आणि शनि जयंतीच्या मुहूर्तावर सलग १३ दिवस करा 'हा' प्रभावी उपाय!
16
हद्द झाली! भलत्याच देशाची छायाचित्रे, व्हिडीओ दाखवून ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपतींना भिडले; तरी रामाफोसा म्हणत होते...
17
Shani Pradosh 2025: वैवाहिक जीवन सुखी व्हावे म्हणून 'असे' करा शनि प्रदोष व्रत; बघा व्रताचरण!
18
"आई मी चिप्सची पाकीटं चोरली नाही"; दुकानदाराचं बोलणं जिव्हारी लागलं, चिठ्ठी लिहून मुलानं आयुष्य संपवलं!
19
"मला सलमाननेच बोलावलं होतं!"; गॅलेक्सीमध्ये घुसखोरी करणाऱ्या ३२ वर्षीय मॉडेलचा मोठा दावा, म्हणाली-
20
"शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून रोजी साजरा करण्याची पद्धत बंद करा आणि...", संभाजी भिडे यांचं विधान

वर्ष तंत्रोदयाचे!

By admin | Updated: January 1, 2015 02:58 IST

नव्या पिढीला ज्ञानातून तंत्रज्ञान विकसित करण्याची सवय लावण्याचा आणि त्यासाठी पुरेशा संधी उपलब्ध करून देण्याचा एक बदल देशाला नवा उज्ज्वल चेहरामोहरा देऊ शकतो.

नव्या पिढीला ज्ञानातून तंत्रज्ञान विकसित करण्याची सवय लावण्याचा आणि त्यासाठी पुरेशा संधी उपलब्ध करून देण्याचा एक बदल देशाला नवा उज्ज्वल चेहरामोहरा देऊ शकतो. नव्या वर्षात असा बदल अपेक्षित अशासाठी आहे, की त्यातून रोजगार निर्माण करणारे प्रज्ञावान उद्योजक बनू शकतात. विज्ञान आणि गणितातील देशांतर्गत आणि जागतिक पातळीवरही अफाट वाढत्या संधींना गवसणी घालणेही त्यातून शक्य होईल. हस्तिदंती मनोऱ्यात बसून माझा मार्ग एकला वा वायला, ही धारणा बदलून विज्ञान-तंत्रज्ञान आणि त्याचा वापर याला अनुकूल ठरणारे नेटवर्किंग बळकट करायला हवे. कल्पनांची भूमी ते संधींचा देश अशा परिवर्तनासाठी हा बदल नव्या वर्षात अपेक्षित आहे. आपल्या समस्या आणि आपल्याकडची परिस्थिती लक्षात घेऊन विज्ञानातील संशोधन होणे गरजेचे आहे. जिथं विज्ञानाविषयीचे कुतूहल अफाट आहे, त्या ग्रामीण भागातून ही गरज भागू शकते. म्हणून तिथे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अधिक गुंतवणुकीचा बदल अपेक्षित आहे.पली अर्थव्यवस्था बंदिस्त होती, तोवर कारखानदारीचा विकास आणि विस्तार सहज शक्य होता. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत आपण तंत्रज्ञान आयात करू लागलो. हा दुधारी उपाय आहे. कारण आपण जेव्हा तंत्रज्ञान इतर देशातून आयात करतो, तेव्हा त्या आधारे आपण वस्तू-सेवांची निर्मिती करतो. पण त्याचीच दुसरी बाजू अशी, की ते तंत्रज्ञान आपल्याला देणाऱ्यांकडे त्याहून अधिक विकसित तंत्रज्ञान असते. त्याच्या आधारे गुणवृद्धी केलेला माल ते आपल्याकडे पाठवू शकतात. तेव्हा गुणवत्तेच्या कसावर आपला माल त्याची बरोबरी करू शकत नाही. खुल्या बाजारपेठेत हे होणे अपरिहार्य ठरते. या परिस्थितीत आपण गुणवत्तेच्या बळावर आपल्या वस्तूंचं नाणं खणखणीत असल्याचं वाजवून सांगायला हवं. हे घडायचं तर विज्ञानाच्या क्षेत्रात विपुल आणि दर्जेदार संशोधन व्हायला हवं. त्यातून विज्ञानातील संशोधन व त्याचा तंत्रज्ञानात वापर अशी साखळी विकसित व्हायला हवी. जगभरात आता ज्ञानाधारित अर्थव्यवस्था सिद्ध झाली आहे. जे देश ती नीट हाताळू शकतील त्यांनाच त्याचा जास्त लाभ होईल. अफाट लोकसंख्या हे आपलं बलस्थान होऊ शकते. त्यासाठी लोकसंख्येचे रूपांतर प्रज्ञावान मनुष्यबळात करणे गरजेचे आहे. हे साध्य होण्यासाठी एक महत्त्वाचा बदल अपेक्षित आहे. तो असा की संशोधन, उद्योजकता आणि भांडवलनिर्मिती या त्रिवेणीची एक नैसर्गिक साखळी आपल्याकडे तयार होणे गरजेचे आहे. कल्पनांची वानवा नाही, पण नवी कल्पना वा नवा शोध तंत्रज्ञानात रूपांतरित करून तिचा पर्याप्त वापर करणे ही एक सामूहिक सहभागातून सिद्ध होणारी फलश्रुती असते. -डॉ. अनिल काकोडकर, अणुशास्त्रज्ञ