शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

वर्ष तंत्रोदयाचे!

By admin | Updated: January 1, 2015 02:58 IST

नव्या पिढीला ज्ञानातून तंत्रज्ञान विकसित करण्याची सवय लावण्याचा आणि त्यासाठी पुरेशा संधी उपलब्ध करून देण्याचा एक बदल देशाला नवा उज्ज्वल चेहरामोहरा देऊ शकतो.

नव्या पिढीला ज्ञानातून तंत्रज्ञान विकसित करण्याची सवय लावण्याचा आणि त्यासाठी पुरेशा संधी उपलब्ध करून देण्याचा एक बदल देशाला नवा उज्ज्वल चेहरामोहरा देऊ शकतो. नव्या वर्षात असा बदल अपेक्षित अशासाठी आहे, की त्यातून रोजगार निर्माण करणारे प्रज्ञावान उद्योजक बनू शकतात. विज्ञान आणि गणितातील देशांतर्गत आणि जागतिक पातळीवरही अफाट वाढत्या संधींना गवसणी घालणेही त्यातून शक्य होईल. हस्तिदंती मनोऱ्यात बसून माझा मार्ग एकला वा वायला, ही धारणा बदलून विज्ञान-तंत्रज्ञान आणि त्याचा वापर याला अनुकूल ठरणारे नेटवर्किंग बळकट करायला हवे. कल्पनांची भूमी ते संधींचा देश अशा परिवर्तनासाठी हा बदल नव्या वर्षात अपेक्षित आहे. आपल्या समस्या आणि आपल्याकडची परिस्थिती लक्षात घेऊन विज्ञानातील संशोधन होणे गरजेचे आहे. जिथं विज्ञानाविषयीचे कुतूहल अफाट आहे, त्या ग्रामीण भागातून ही गरज भागू शकते. म्हणून तिथे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अधिक गुंतवणुकीचा बदल अपेक्षित आहे.पली अर्थव्यवस्था बंदिस्त होती, तोवर कारखानदारीचा विकास आणि विस्तार सहज शक्य होता. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत आपण तंत्रज्ञान आयात करू लागलो. हा दुधारी उपाय आहे. कारण आपण जेव्हा तंत्रज्ञान इतर देशातून आयात करतो, तेव्हा त्या आधारे आपण वस्तू-सेवांची निर्मिती करतो. पण त्याचीच दुसरी बाजू अशी, की ते तंत्रज्ञान आपल्याला देणाऱ्यांकडे त्याहून अधिक विकसित तंत्रज्ञान असते. त्याच्या आधारे गुणवृद्धी केलेला माल ते आपल्याकडे पाठवू शकतात. तेव्हा गुणवत्तेच्या कसावर आपला माल त्याची बरोबरी करू शकत नाही. खुल्या बाजारपेठेत हे होणे अपरिहार्य ठरते. या परिस्थितीत आपण गुणवत्तेच्या बळावर आपल्या वस्तूंचं नाणं खणखणीत असल्याचं वाजवून सांगायला हवं. हे घडायचं तर विज्ञानाच्या क्षेत्रात विपुल आणि दर्जेदार संशोधन व्हायला हवं. त्यातून विज्ञानातील संशोधन व त्याचा तंत्रज्ञानात वापर अशी साखळी विकसित व्हायला हवी. जगभरात आता ज्ञानाधारित अर्थव्यवस्था सिद्ध झाली आहे. जे देश ती नीट हाताळू शकतील त्यांनाच त्याचा जास्त लाभ होईल. अफाट लोकसंख्या हे आपलं बलस्थान होऊ शकते. त्यासाठी लोकसंख्येचे रूपांतर प्रज्ञावान मनुष्यबळात करणे गरजेचे आहे. हे साध्य होण्यासाठी एक महत्त्वाचा बदल अपेक्षित आहे. तो असा की संशोधन, उद्योजकता आणि भांडवलनिर्मिती या त्रिवेणीची एक नैसर्गिक साखळी आपल्याकडे तयार होणे गरजेचे आहे. कल्पनांची वानवा नाही, पण नवी कल्पना वा नवा शोध तंत्रज्ञानात रूपांतरित करून तिचा पर्याप्त वापर करणे ही एक सामूहिक सहभागातून सिद्ध होणारी फलश्रुती असते. -डॉ. अनिल काकोडकर, अणुशास्त्रज्ञ