शहरं
Join us  
Trending Stories
1
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
2
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
3
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
4
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
5
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
6
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
7
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
8
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
9
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
10
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
11
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
12
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
13
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
14
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
15
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
16
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
17
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
18
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
19
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
20
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग

छळ छावणी

By admin | Updated: February 24, 2016 03:53 IST

दुष्काळी भागातील चारा छावण्या बंद करण्याचा आदेश सरकारला चोवीस तासांच्या आत मागे घ्यावा लागला. आज मराठवाड्यात २३९ छावण्या आहेत. दुष्काळाशी दोन हात करण्याच्या

- सुधीर महाजनदुष्काळी भागातील चारा छावण्या बंद करण्याचा आदेश सरकारला चोवीस तासांच्या आत मागे घ्यावा लागला. आज मराठवाड्यात २३९ छावण्या आहेत. दुष्काळाशी दोन हात करण्याच्या बाता मारणारे सरकार आणि प्रशासन या दुष्काळाकडे किती गंभीरपणे पाहते याचा हा चांगलाच नमुना समोर आला. हस्तिदंती मनोऱ्यात बसून निर्णय घेतला की मुखभंग होतो. तसे सरकार तोंडावर आपटले. नोकरशाहीने चुकीची माहिती दिली आणि त्यावर विसंबून वेगळी शहानिशा न करता सरकारने छावण्या बंद करण्याचा निर्णय घेतला; पण सरकारची दिशाभूल करणाऱ्या नोकरशहांवर सरकारने अजून कारवाई केलेली नाही. अशाने यंत्रणेच्या अंगात कोडगेपणा भिनण्याचा धोका असतो.मराठवाड्यात चारा छावण्यांची आत्ताच गरज नाही असा अहवाल लातूर, बीड आणि उस्मानाबाद या तीन जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारला पाठविला आणि त्यावर छावण्या बंदची घोषणा झाली. आता यात आणखी एक प्रश्न निर्माण होतो. छावण्यांची गरज नाही, असा अहवाल पाठवा अशी वरून सूचना जिल्हाधिकाऱ्यांना होती का? कारण जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची जाण नाही असा जिल्हाधिकारी विरळाच असू शकतो. या तीन जिल्ह्यांमध्ये भीषण परिस्थिती आहे. लोकानी स्थलांतर केले. पाण्यासाठी लोक रानोमाळ भटकताना दिसतात. असे असतानाही हे घडले. सरकारने आदेश मागे घेत रंगसफेदी केली आणि त्यावर बोलणेही टाळले. महसूलमंत्री एकनाथ खडसे तोंडघशी पडले त्याचीही चर्चा झाली. बीड, उस्मानाबाद आणि लातूर या तीन जिल्ह्यांमध्ये २१ लाख ५९ हजार ८६१ पशुधन आहे. ते जूनपर्यंत जगविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करावे लागतील. छावण्यांची संख्या पाहाता बीडमध्ये १६१, उस्मानाबादेत ७७ आणि लातुरात एक अशी २३९ संख्या आहे. येथे संख्या सरळ दिसत असली तरी या छावण्यांचे वाटप पक्षनिहाय झालेले आहे. पक्षांच्या कार्यकर्त्यांची सोय लावण्याचा एक उत्तम मार्ग पूर्वीच्या सरकारने निवडला होता आणि त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसवर मात केली होती. चारा छावण्यांवर राष्ट्रवादीचे नियंत्रण होते. आता सरकार बदलले तरी परिस्थिती बदललेली नाही. आकडेवारीच पाहायची तर बीडमध्ये ३६ छावण्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मिळाल्या आहेत. त्यानंतर सेना २५, भाजपा ११, काँग्रेस एक अशी संख्या दिसते. हीच गोष्ट बीडमध्ये आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या ७० छावण्या असून भाजपा ४०, विनायक मेटेंचा शिवसंग्राम पक्ष २७, शिवसेना २०, काँग्रेस चार अशी स्थिती दिसते. चारा छावण्यांवरील राष्ट्रवादीचे वर्चस्व संपविण्यासाठी ही खेळी नव्हती ना, असाही प्रश्न पडतो. त्यामुळेच एवढे रामायण होऊनसुद्धा निर्णय मागे घेतल्यानंतरही या संपूर्ण प्रकरणाकडे सरकारने दुर्लक्ष केले. मराठवाड्याचा टंचाई आराखडा ३७० कोटींचा असून चारा छावण्यांवर आतापर्यंत तीन महिन्यात ३३ कोटी रुपये खर्च झाले आहेत. अशा परिस्थितीत कृषी विभागाने अहवाल देण्यात चूक केली. बीडचे उदाहरण घेतले तर या जिल्ह्यात स्थिती गंभीर आहे, पण जिल्ह्यात चारा पुरेसा आहे. रबीचा चारा चांगला आहे, असा निर्णय कृषी अधिकारी देतात याला काय म्हणायचे?सरकार दुष्काळाकडे किती गांभीर्याने पाहते याचे हे मासलेवाईक उदाहरण असले तरी अशा कार्यपद्धतीने दुष्काळ हाताळता येणार नाही. यातही खेदाची बाब म्हणजे विरोधी पक्षातील एकाही लोकप्रतिनिधीने सरकारच्या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची तयारी केली नाही. हा किल्ला खऱ्या अर्थाने प्रसारमाध्यमांनीच लढविला आणि सरकारला निर्णय मागे घ्यायला लावला. मराठवाड्याच्या नशिबी हा छळवाद नवा नाही. कायमच सापत्न वागणूक मिळत गेली. प्रकल्प पळविले, निधी पळविण्याचे प्रकारही झाले. मराठवाड्याची छळ छावणी झाली आहे. दुष्काळात तेरावा महिना यालाच म्हणतात.