शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

बचतीचा कंटाळा

By admin | Updated: September 22, 2015 21:46 IST

राज्यभरात पावसाने ओढ दिल्याने अनेक भागात पाण्याची टंचाई प्रकर्षाने जाणवू लागली होती. पाण्याअभावी उन्हात करपणारी पिकं बघत हताश झालेला ग्रामीण भागातील शेतकरी आणि 'एक दिवसाआड पाणी

राज्यभरात पावसाने ओढ दिल्याने अनेक भागात पाण्याची टंचाई प्रकर्षाने जाणवू लागली होती. पाण्याअभावी उन्हात करपणारी पिकं बघत हताश झालेला ग्रामीण भागातील शेतकरी आणि 'एक दिवसाआड पाणी' यासारख्या घोषणेमुळे चिंतेने ग्रासलेला शहरी नागरिक या दोघांच्याही डोळ््यांत पावसाच्या अभावाने 'पाणी' येऊ लागले. मग पाण्याचे, पावसाचे महत्त्व किती, ते साठवणे, जपून वापरणे किती गरजेचे याच्या चर्चांचाच 'पाऊस' सुरू झाला. मग रेनवॉटर हार्वेस्टिंगची गरज, जलसंधारणाची कामे, पाणी अडवा पाणी जिरवाची आवश्यकता, पाण्याच्या बेसुमार वापरावर निर्बंध, पाण्याचा गैरवापर टाळण्यासाठी कारवाई हे सारे आवश्यक सोपस्कारही सुरू झाले. उशीरा का होईना सध्या सुरू असलेल्या पावसाने राज्याला काही प्रमाणात दिलासा दिला आहे. ग्रामीण भागात बराचसा हंगाम वाया गेला, हातची पिकं गेली तरी आहे त्यात चांगलं करू अशी उमेद मनाशी बाळगून बळीराजा पुन्हा एकदा शेतात राबताना दिसू लागला आहे. पावसाचा असाच जोर आणखी काही दिवस कायम राहिला तर हे पाण्याचे संकट टळेलही. पण आपण परत पुढे काय करणार? पाण्याच्या बाबतीत खरोखर संवेदनशील होऊन आपण पाण्याचे जतन करणार का हा खरा प्रश्न आहे. कारण 'नेमेचि येतो पावसाळा' हे व्रत निसर्गाने काहीही झाले तरी न चुकता पाळावे अशी आपली साऱ्यांचीच अपेक्षा असते. परंतु पाणीसंचयाचा विषय निघाला की मात्र 'नेमेचि येतो बचतीचा कंटाळा' असे म्हणत हात झटकून मोकळे होतो आणि पुढचे वर्षभर पाण्याची बेसुमार उधळपट्टी करायला मोकळे होतो. मग पुन्हा पाण्याचा वापर जपून करायला हवा ही जाणीव प्रकर्षाने होते, पुन्हा पावसाने ओढ दिली की मगच. गेल्या वर्षी देखील अशीच पाणीटंचाई निर्माण झाली होती, धरणसाठ्यातील पाणी कमी झाले होते, एक दिवसाआड पाण्याची घोषणाही झाली होती. वर्षभराच्या पाणी नियोजनाच्या व संपूर्ण वर्षभर पाणी जपून वापरण्याच्या चर्चाही झाल्या. तेव्हाही निसर्ग मदतीला धावून आला. एकदा का पाऊस आला की पुन्हा साऱ्या तथाकथित नियोजनावर पुन्हा एकदा 'पाणी फिरते' कारण पुढच्या वर्षभराची चिंता मिटलेली असते. निसर्गाने गेल्या वर्षी आपल्याला सावरले. कदाचित याही वर्षी सावरेल. पण म्हणून आपण किती काळ पुन्हा तसेच निष्काळजी राहणार आहोत? पाणीबचत ही टंचाई सुरू झाल्यानंतर सुरू करण्याची बाब नसून ती सातत्यपूर्ण रितीने करण्याची गोष्ट आहे, ही बाब प्रशासनापासून व्यक्तिगत स्तरापर्यत रुजवणे गरजेचे आहे. त्यासाठी पाणीबचत व पाण्याचा संचय हा स्वभावधर्म बनायला हवा. तेव्हा यंदाच्या वर्षी जरी पाणीटंचाई दूर झाली तरीही त्यानंतर पुन्हा नेहमीसारखे निश्चिंत न होता निसर्गाची अनमोल देण असलेल्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा संचय करण्याचा निश्चय साऱ्यांनी मिळून करायला हवा.