शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

बचतीचा कंटाळा

By admin | Updated: September 22, 2015 21:46 IST

राज्यभरात पावसाने ओढ दिल्याने अनेक भागात पाण्याची टंचाई प्रकर्षाने जाणवू लागली होती. पाण्याअभावी उन्हात करपणारी पिकं बघत हताश झालेला ग्रामीण भागातील शेतकरी आणि 'एक दिवसाआड पाणी

राज्यभरात पावसाने ओढ दिल्याने अनेक भागात पाण्याची टंचाई प्रकर्षाने जाणवू लागली होती. पाण्याअभावी उन्हात करपणारी पिकं बघत हताश झालेला ग्रामीण भागातील शेतकरी आणि 'एक दिवसाआड पाणी' यासारख्या घोषणेमुळे चिंतेने ग्रासलेला शहरी नागरिक या दोघांच्याही डोळ््यांत पावसाच्या अभावाने 'पाणी' येऊ लागले. मग पाण्याचे, पावसाचे महत्त्व किती, ते साठवणे, जपून वापरणे किती गरजेचे याच्या चर्चांचाच 'पाऊस' सुरू झाला. मग रेनवॉटर हार्वेस्टिंगची गरज, जलसंधारणाची कामे, पाणी अडवा पाणी जिरवाची आवश्यकता, पाण्याच्या बेसुमार वापरावर निर्बंध, पाण्याचा गैरवापर टाळण्यासाठी कारवाई हे सारे आवश्यक सोपस्कारही सुरू झाले. उशीरा का होईना सध्या सुरू असलेल्या पावसाने राज्याला काही प्रमाणात दिलासा दिला आहे. ग्रामीण भागात बराचसा हंगाम वाया गेला, हातची पिकं गेली तरी आहे त्यात चांगलं करू अशी उमेद मनाशी बाळगून बळीराजा पुन्हा एकदा शेतात राबताना दिसू लागला आहे. पावसाचा असाच जोर आणखी काही दिवस कायम राहिला तर हे पाण्याचे संकट टळेलही. पण आपण परत पुढे काय करणार? पाण्याच्या बाबतीत खरोखर संवेदनशील होऊन आपण पाण्याचे जतन करणार का हा खरा प्रश्न आहे. कारण 'नेमेचि येतो पावसाळा' हे व्रत निसर्गाने काहीही झाले तरी न चुकता पाळावे अशी आपली साऱ्यांचीच अपेक्षा असते. परंतु पाणीसंचयाचा विषय निघाला की मात्र 'नेमेचि येतो बचतीचा कंटाळा' असे म्हणत हात झटकून मोकळे होतो आणि पुढचे वर्षभर पाण्याची बेसुमार उधळपट्टी करायला मोकळे होतो. मग पुन्हा पाण्याचा वापर जपून करायला हवा ही जाणीव प्रकर्षाने होते, पुन्हा पावसाने ओढ दिली की मगच. गेल्या वर्षी देखील अशीच पाणीटंचाई निर्माण झाली होती, धरणसाठ्यातील पाणी कमी झाले होते, एक दिवसाआड पाण्याची घोषणाही झाली होती. वर्षभराच्या पाणी नियोजनाच्या व संपूर्ण वर्षभर पाणी जपून वापरण्याच्या चर्चाही झाल्या. तेव्हाही निसर्ग मदतीला धावून आला. एकदा का पाऊस आला की पुन्हा साऱ्या तथाकथित नियोजनावर पुन्हा एकदा 'पाणी फिरते' कारण पुढच्या वर्षभराची चिंता मिटलेली असते. निसर्गाने गेल्या वर्षी आपल्याला सावरले. कदाचित याही वर्षी सावरेल. पण म्हणून आपण किती काळ पुन्हा तसेच निष्काळजी राहणार आहोत? पाणीबचत ही टंचाई सुरू झाल्यानंतर सुरू करण्याची बाब नसून ती सातत्यपूर्ण रितीने करण्याची गोष्ट आहे, ही बाब प्रशासनापासून व्यक्तिगत स्तरापर्यत रुजवणे गरजेचे आहे. त्यासाठी पाणीबचत व पाण्याचा संचय हा स्वभावधर्म बनायला हवा. तेव्हा यंदाच्या वर्षी जरी पाणीटंचाई दूर झाली तरीही त्यानंतर पुन्हा नेहमीसारखे निश्चिंत न होता निसर्गाची अनमोल देण असलेल्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा संचय करण्याचा निश्चय साऱ्यांनी मिळून करायला हवा.