शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
3
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
4
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
6
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
7
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
8
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
9
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
10
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
11
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
12
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
13
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
14
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
15
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
16
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
17
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
18
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
19
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
20
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश

काळ सोकावेल !

By admin | Updated: April 13, 2016 03:45 IST

केंद्र सरकार कापसाच्या बियाण्यांच्या किंमतींवर नियंत्रण तर ठेवेलच शिवाय बीजोत्पादक कंपन्यांना शेतकऱ्यांची लूट करू दिली जाणार नाही, असा सज्जड इशारा केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह

केंद्र सरकार कापसाच्या बियाण्यांच्या किंमतींवर नियंत्रण तर ठेवेलच शिवाय बीजोत्पादक कंपन्यांना शेतकऱ्यांची लूट करू दिली जाणार नाही, असा सज्जड इशारा केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी थेट मोन्सँटो या बहुराष्ट्रीय कंपनीचे नाव घेऊनच दिला आहे. मोन्सँटोचा संयुक्त उपक्रम असलेली महिको मोन्सँटो बायोटेक लिमिटेड (एमएमबीएल) ही कंपनी भारतात बीटी कॉटन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कपाशीच्या बियाणाचे उत्पादन व विक्री करते. एमएमबीएलने इतर २८ भारतीय कंपन्यांनाही उत्पादनाचा परवाना दिला आहे. कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱ्या बोंडअळीला अटकाव करणारी ही जात जनुकीय अभियांत्रिकीचा वापर करून विकसित करण्यात आली आहे. मोन्सँटोकडे या तंत्रज्ञानाचे एकस्व (पेटंट) असल्यामुळे ती कंपनी कपाशीच्या इतर वाणांच्या तुलनेत किती तरी चढ्या दराने विक्री करीत आहे. केंद्राने त्यालाच लगाम घालण्याचा निर्धार केला आहे. बीटी बियाणाची ४५० ग्रॅम वजनाची पिशवी मोन्सँटो आतापर्यंत एक हजार रुपयांहून अधिक किमतीला विकत होती; मात्र गेल्याच महिन्यात भारत सरकारने त्यासाठी ८०० रुपयांपेक्षा जास्त किंमत आकारता येणार नाही, असे फर्मान काढले. बीटी बियाणाच्या किमतीत, मोन्सँटो आकारत असलेल्या एक प्रकारच्या स्वामीत्वशुल्काचाही अंतर्भाव आहे. आतापर्यंत बीटी बोलगार्ड-१ साठी १२२.९६ रुपये, तर बीटी बोलगार्ड -२ साठी १८३.४६ रुपये स्वामीत्वशुल्क आकारले जात होते; मात्र आता त्यावरही मर्यादा घालण्यात आली आहे. कपाशी लागवडीच्या वाढत्या भांडवली खर्चामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्राचा हा निर्णय नक्कीच मोठा दिलासा देणारा आहे. मोन्सँटोच्या मात्र तो स्वाभाविकच पचनी पडलेला नाही. किंमतीमध्ये पुरेशी वाढ करण्यास परवानगी दिली नाही, तर भारतातील कारभार गुंडाळावा लागेल आणि या देशात नवे तंत्रज्ञान आणता येणार नाही, असा इशाराच त्या कंपनीने दिला आहे. हा इशारा भारतासाठी धोकादायक आहे. वाढती लोकसंख्या आणि घटत चाललेले लागवडीखालील क्षेत्र, या पार्श्वभूमीवर भारताला कृषी उत्पादनात वाढ करणाऱ्या तंत्रज्ञानाची, विशेषत: नवनव्या बियाणांची नितांत गरज आहे. देशातील कृषी विद्यापीठे आणि इतर संस्थांमध्ये उपयुक्त संशोधनाच्या बाबतीत आनंदीआनंदच आहे. मोन्सँटोचे बीटी बियाणे २००२ मध्ये भारतात दाखल झाले. तेव्हापासून देशी बीटी वाण विकसित करण्याच्या गप्पा सुरू आहेत; पण प्रत्यक्षात अद्यापही केंद्रीय कापूस संशोधन संस्था (सीआयसीआर)चे बीटी बियाणे बाजारात आलेले नाही. उद्या मोन्सँटो निघून गेली, तर जगातील इतर कंपन्याही भारतात आपले तंत्रज्ञान आणण्यापूर्वी दहादा विचार करतील. भीती त्याची आहे. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही; पण काळ सोकावला तर काय?