शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

काळ सोकावेल !

By admin | Updated: April 13, 2016 03:45 IST

केंद्र सरकार कापसाच्या बियाण्यांच्या किंमतींवर नियंत्रण तर ठेवेलच शिवाय बीजोत्पादक कंपन्यांना शेतकऱ्यांची लूट करू दिली जाणार नाही, असा सज्जड इशारा केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह

केंद्र सरकार कापसाच्या बियाण्यांच्या किंमतींवर नियंत्रण तर ठेवेलच शिवाय बीजोत्पादक कंपन्यांना शेतकऱ्यांची लूट करू दिली जाणार नाही, असा सज्जड इशारा केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी थेट मोन्सँटो या बहुराष्ट्रीय कंपनीचे नाव घेऊनच दिला आहे. मोन्सँटोचा संयुक्त उपक्रम असलेली महिको मोन्सँटो बायोटेक लिमिटेड (एमएमबीएल) ही कंपनी भारतात बीटी कॉटन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कपाशीच्या बियाणाचे उत्पादन व विक्री करते. एमएमबीएलने इतर २८ भारतीय कंपन्यांनाही उत्पादनाचा परवाना दिला आहे. कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱ्या बोंडअळीला अटकाव करणारी ही जात जनुकीय अभियांत्रिकीचा वापर करून विकसित करण्यात आली आहे. मोन्सँटोकडे या तंत्रज्ञानाचे एकस्व (पेटंट) असल्यामुळे ती कंपनी कपाशीच्या इतर वाणांच्या तुलनेत किती तरी चढ्या दराने विक्री करीत आहे. केंद्राने त्यालाच लगाम घालण्याचा निर्धार केला आहे. बीटी बियाणाची ४५० ग्रॅम वजनाची पिशवी मोन्सँटो आतापर्यंत एक हजार रुपयांहून अधिक किमतीला विकत होती; मात्र गेल्याच महिन्यात भारत सरकारने त्यासाठी ८०० रुपयांपेक्षा जास्त किंमत आकारता येणार नाही, असे फर्मान काढले. बीटी बियाणाच्या किमतीत, मोन्सँटो आकारत असलेल्या एक प्रकारच्या स्वामीत्वशुल्काचाही अंतर्भाव आहे. आतापर्यंत बीटी बोलगार्ड-१ साठी १२२.९६ रुपये, तर बीटी बोलगार्ड -२ साठी १८३.४६ रुपये स्वामीत्वशुल्क आकारले जात होते; मात्र आता त्यावरही मर्यादा घालण्यात आली आहे. कपाशी लागवडीच्या वाढत्या भांडवली खर्चामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्राचा हा निर्णय नक्कीच मोठा दिलासा देणारा आहे. मोन्सँटोच्या मात्र तो स्वाभाविकच पचनी पडलेला नाही. किंमतीमध्ये पुरेशी वाढ करण्यास परवानगी दिली नाही, तर भारतातील कारभार गुंडाळावा लागेल आणि या देशात नवे तंत्रज्ञान आणता येणार नाही, असा इशाराच त्या कंपनीने दिला आहे. हा इशारा भारतासाठी धोकादायक आहे. वाढती लोकसंख्या आणि घटत चाललेले लागवडीखालील क्षेत्र, या पार्श्वभूमीवर भारताला कृषी उत्पादनात वाढ करणाऱ्या तंत्रज्ञानाची, विशेषत: नवनव्या बियाणांची नितांत गरज आहे. देशातील कृषी विद्यापीठे आणि इतर संस्थांमध्ये उपयुक्त संशोधनाच्या बाबतीत आनंदीआनंदच आहे. मोन्सँटोचे बीटी बियाणे २००२ मध्ये भारतात दाखल झाले. तेव्हापासून देशी बीटी वाण विकसित करण्याच्या गप्पा सुरू आहेत; पण प्रत्यक्षात अद्यापही केंद्रीय कापूस संशोधन संस्था (सीआयसीआर)चे बीटी बियाणे बाजारात आलेले नाही. उद्या मोन्सँटो निघून गेली, तर जगातील इतर कंपन्याही भारतात आपले तंत्रज्ञान आणण्यापूर्वी दहादा विचार करतील. भीती त्याची आहे. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही; पण काळ सोकावला तर काय?