शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

दुष्काळात तेरावा महिना!

By admin | Updated: April 23, 2016 23:49 IST

जालना : जायकवाडी ते जालना जलवाहिनी इंदेवाडीजवळ शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले.

जालना : जायकवाडी ते जालना जलवाहिनी इंदेवाडीजवळ शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. ऐन दुष्काळात जलवाहिनी फुटल्याने जालनेकरांना दुष्काळात तेरावा महिना सहन करावा लागणार आहे. जलवाहिनी फुटल्याने चार दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने कळविले आहे. घाणेवाडी जलाशय आटल्याने शहरातील नवीन जालना भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जायकवाडी जलवाहिनीचा दुरूस्तीचा प्रश्नही गाजत आहे. अशा परिस्थतीत एका दूरध्वनी सेवा देणाऱ्या कंपनीचे केबल अंथरण्याचे काम सुरू असताना पोकलॅनचा धक्का लागून जलवाहिनीचा पाईप निखळून गळती सुरू झाली. काही वेळातच परिसर जलमय झाला. दूरपर्यंत पाणी वाहून गेले. काही महिलांनी पाणी भरून घेतले. व्हॉल्व्ह बंद करेपर्यंत लाखो लिटर पाणी वाहून गेले. या पाण्यामुळे परिसरातील दोन विहिरीही तुडुंब भरल्या होत्या. जायकवाडी ते जालना जलवाहिनी दुरूस्तीच्या मुद्यावरून पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. संबंधित एजन्सी दुरूस्ती करण्यासाठी किती दिवस लावणार, पाणीपुरवठा कधी सुरळीत होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासोबतच या जलवाहिनीस इतर ठिकाणीही गळती लागली आहे. व्हॉल्व्हमधूनही मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. पालिका प्रत्येक व्हॉल्व्हर लोखंडी जाळ्या बसविणार होती. चार महिने उलटल्यानंतरही पालिकेने या जाळ्या बसविलेल्या नाहीत. परिणामी व्हॉल्व्हमधून गळतीसोबतच चोरीही वाढली आहे. मुख्याधिकादी दीपक पुजारी हे वैद्यकीय रजेवर आहेत. कर्मचारी संपामुळे सर्व विभाग बंद आहेत. त्यामुळे पालिकेत अधिकारी व कर्मचारी नसल्याने पालिका वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. त्यातच जलवाहिनी फुटल्याने शहरवासियांचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. घाणेवाडी जलाशय कोरडा पडल्याने नवीन जालना भागातील बहुतांश नागरिकांना जायकवाडीच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते. त्यातच आता जलवाहिनी फुटल्याने समस्या गंभीर बनत आहे. शहरात ठिकठिकाणी अंतर्गत जलवाहिनीला गळती लागली असली तरी पालिकेकडून कानाडोळा होत आहे. दुरूस्तीच्या नावाखाली थातूरमातूर डागडुजी करून बिल उचलण्याचा सर्रास प्रकार पालिकेत सुरू असल्याचे चित्र आहे. इंदेवाडीसोबतच गोलापांगरी, शेवगा, हारतखेडा, मठपिंपळगाव पाटी, जामखेड पाटी, पाचोड रस्त्या, अंबड रस्ता आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात जलवाहिनीला गळती लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना पैसे मोजावे लागत आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. नगर पालिकेने जलवाहिनी दुरूस्तीसाठी स्वतंत्र यंत्रणा तयार ठेवावी, अशी मागणीही नागरिकांतून जोर धरत आहे. पालिकेचा पाणीपुरवठा विभाग असून अडचण नसून खोळंबा असा बनला आहे. (प्रतिनिधी)जायकवाडी ते जालना जलवाहिनी फुटल्याने शहरवासियांना चार दिवस निर्जळीचा सामना करावा लागणार आहे. जलवाहिनी दुरूस्ती मंगळवारपर्यंत पूर्ण होईल, असे पालिकेतर्फे सांगण्यात आले. कडक उन्हामुळे कूपनलिका आटल्या आहेत. त्यातच चार दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने शहरवासियांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. जलवाहिनी दुरूस्तीचे काम तात्काळ हाती घेतले आहे. तरीही तीन ते चार दिवस पाणीपुरवठा बंद राहील, असे पाणीपुरवठा सभापती राहुल हिवराळे यांनी सांगितले.