शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळात तेरावा महिना

By admin | Updated: April 15, 2015 00:04 IST

एकीकडे गारपिटीचा हाहाकार, तर दुसरीकडे भीषण पाणीटंचाई, असे परस्पर विरोधाभास असणारे चित्र येथेच दिसते. आजच्या घडीला मराठवाड्यात २६३५ गावांमध्ये पाणीटंचाई आहे.

एकीकडे गारपिटीचा हाहाकार, तर दुसरीकडे भीषण पाणीटंचाई, असे परस्पर विरोधाभास असणारे चित्र येथेच दिसते. आजच्या घडीला मराठवाड्यात २६३५ गावांमध्ये पाणीटंचाई आहे.दुष्काळाने पाठ सोडली नाही आणि गारपिटीने पाठ पार सोलून काढली. हे दुष्टचक्र मागे लागले ते संपायची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. चौथे वर्ष हे असे आहे की, मराठवाड्याचा शेतकरी निसर्गाचे फटकेच खातो आहे. २०१२ साली दुष्काळ पडला, खरीप हातचे गेले. ज्या काही ठिकाणी रबीची सुविधा होती तेथे गारपिटीने ती उद्ध्वस्त केली. शेतकऱ्याच्या मुळावर दुष्काळापाठोपाठ ही गारपीट चार वर्षांपासून उठली आहे. २०१३ मध्येही गारपीट झाली आणि १४ मध्ये पहिल्या चरणात पावसाने डोळे उघडल्याने खरीप गेले; पण सप्टेंबरपासून जोरदार पाऊस झाला. रबी चांगले आले; पण फेब्रुवारी-मार्चमध्ये गारपिटीने पुन्हा उच्छाद मांडला. यावर्षी वेगळे काही नाही, अगोदर दुष्काळ आणि पुन्हा गारपीट. या माऱ्याने शेतकरी पार भेळकांडला आहे. गेल्या चार दिवसांपासून जे काही थैमान चालू आहे ते पाहता मराठवाड्यातील शेतकरी पार मोडून पडला. आंबा, गहू पार गेले. दोन दिवसांत गारपिटीत १२३ जनावरे ठार झाली. सात जण मृत्यू पावले. घरांची पडझड वेगळीच. प्राथमिक माहितीनुसार एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात १० हजार हेक्टरवरील पिके नष्ट झाली. आंबा, गव्हापाठोपाठ कांद्याचे नुकसान मोठे आहे.मराठवाड्यातील हवामान बदलत आहे. चार वर्षांचे निरीक्षण पाहिले, तर जुलै, आॅगस्ट हे दोन महिने पाऊस ताडन देतो. त्याचा परिणाम खरिपाच्या उत्पादनावर होतो. एकाअर्थी खरीप पूर्ण बुडते. पुढे पाऊस हजेरी लावत रबीच्या आशा उंचावतो. हे पीक ऐन हाती येण्याच्या वेळी गारपीट अवतरते. अशा विचित्र स्थितीत शेती सापडली आहे. पारंपरिक पीक पद्धत कोलमडली आहे. नेमके कोणते पीक घ्यावे याचा अंदाज तोकडा पडतो. नवीन पिके कोणती स्वीकारावीत याबाबत संभ्रम आहे आणि प्रत्येक शेतकरी प्रयोग करू शकत नाही, कारण तो यशस्वी होण्यापेक्षा बिघडतो. कृषी खाते, कृषी विद्यापीठे यावर कोणतेही मार्गदर्शन करताना दिसत नाहीत. शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असा कृती कार्यक्रम त्यांच्याकडे नाही. उलट राज्यात मराठवाडा, प. महाराष्ट्र, विदर्भ, कोकण असा बदलत्या हवामानाचा विचार करून कृषी विद्यापीठे स्थापन करण्याची दूरदृष्टी पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी दाखविली होती. या संस्था उभ्या राहिल्या; पण शेतकऱ्यांसाठी किती उपयुक्त ठरल्या याचा ताळेबंद मांडायला पाहिजे. कधी तरी ही झाडाझडती घेतलीच पाहिजे.मराठवाड्यातील शेती मोडीत निघण्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसते. शेवटी जगणे महत्त्वाचे. या बदलाचे काही सामाजिक परिणाम हळूहळू दिसत आहेत. तरुण वर्ग वेगाने शेतीपासून दूर जाताना दिसतो. खेड्यातून शहराकडे स्थलांतराचा वेग वाढला आहे. शहरातसुद्धा अकुशल कामगारांची संख्या वाढल्याने सर्वांनाच काम मिळेल याची खात्री नाही. शिक्षण, विवाह असे वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत. कुटुंब व्यवस्थेच्या चौकटीला हादरे बसताना दिसतात ते वेगळेच. खेडी ओस पडत असताना तालुका, जिल्ह्यासारखी शहरे बकाल होत आहेत. एकीकडे गारपिटीचा हाहाकार, तर दुसरीकडे भीषण पाणीटंचाई, असे परस्पर विरोधाभास असणारे चित्र येथेच दिसते. आजच्या घडीला मराठवाड्यात २६३५ गावांमध्ये पाणीटंचाई असून, त्यापैकी ११२१ गावांना १०६४ टँकरद्वारे पाणीपुरवठा होतो. म्हणजेच, हजारावर टँकर दिसतात. एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात ३८१ टँकरद्वारे पाणीपुरवठा होतो. त्यापाठोपाठ बीड, उस्मानाबाद, जालना हे होरपळत असलेले जिल्हे आहेत. ही पाणीटंचाई दिवसागणीक तीव्र होत जाणार. सरकारने शेतकऱ्यांसाठी दुष्काळी मदत जाहीर केली. मराठवाड्यासाठी २०३२ कोटी रुपये मंजूर केले. दोन टप्प्यांमध्ये १६९० कोटी रुपये वाटप करण्यासाठी आले; पण १५०० कोटीचेच वाटप झाले. अर्थसंकल्पीय वर्ष संपल्यामुळे १९० कोटी रुपये परत गेले; कारण हा आकस्मिक निधी होता व तो आर्थिक वर्षात खर्च होणे आवश्यक होते. म्हणजेच, ‘दैव देते आणि कर्म नेते’ अशी अवस्था. - सुधीर महाजन