शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
2
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
3
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
4
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
5
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
6
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
7
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
8
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
9
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
10
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
11
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
12
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
13
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
14
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
15
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश
16
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
17
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
18
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
19
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
20
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"

हे साऱ्यांना घातक

By admin | Updated: January 2, 2016 08:37 IST

राजधानी दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांचे राज्य तर नरेन्द्र मोदी यांचे केन्द्र अशा दोन्ही सरकारांमधील संघर्षाने आता अधिकच गंभीर वळण घेतले असून अखिल भारतीय सेवेतील

राजधानी दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांचे राज्य तर नरेन्द्र मोदी यांचे केन्द्र अशा दोन्ही सरकारांमधील संघर्षाने आता अधिकच गंभीर वळण घेतले असून अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांनी चक्क संपावर जाण्याचा भूतकाळात कधीही न घडलेला प्रकार तिथे घडावा हे भविष्याचा विचार करता केन्द्र सरकारच्या दृष्टीनेही घातक ठरु शकते. दिल्लीे सरकारला देशातील अन्य राज्य सरकारांचाच दर्जा मिळावा ही केजरीवाल यांची मागणी असली तरी ती अद्याप मान्य झालेली नाही व नजीकच्या भविष्यकाळात होईल अशी शक्यताही नाही. दिल्लीला केन्द्रशासित राज्यांपेक्षाही खालचा दर्जा आहे. पण केजरीवाल हे वास्तव स्वीकारायला तयार नाहीत. त्यांचे भांडण जसे केन्द्राशी आहे तसेच दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांच्याशीदेखील आहे. आता त्यांनी केन्द्रशासित राज्यांमध्ये नियुक्त केल्या जाणाऱ्या आयएएस आणि तत्सम श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या संवर्गाशी भांडण घेतले आहे. केजरीवाल यांनी दिल्ली सरकारच्या सेवेतील वकिलांच्या मानधनात वृद्धी करण्याचा जो निर्णय घेतला त्यावर स्वाक्षरी करण्यास दोन सचिवांनी नकार देताच केजरीवाल यांनी त्यांना निलंबित केले म्हणून या संवर्गातील तब्बल दोनशे अधिकाऱ्यांनी काही काळ काम बंद आंदोलन केले. त्यांच्याकडून अशा कृतीची अपेक्षा नसते. त्यावर या अधिकाऱ्यांनी रजेवर जावे, त्यांना आपण घरबसल्या पगार देऊ आणि त्यांच्या जागी व्यावसायिक लोकांची नियुक्ती करु असे पोरकट विधान केजरीवाल यांनी केले आहे. अर्थात यालाही केन्द्र विरुद्ध राज्य या संघर्षाचीच किनार आहे. दिल्ली जिल्हा आणि क्रिकेट संघटनेतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी केजरीवाल यांनी एका न्यायिक आयोगाची घोषणा केली तेव्हां दिल्ली सरकारला तसे करण्याचा घटनात्मक अधिकारच नसल्याचे नजीब जंग यांनी तत्काळ जाहीर केले आणि त्यावरही केजरीवाल यांनी थयथयाट केला होता. जंग हे केन्द्र सरकारचे हस्तक असल्याचे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी काम बंद आंदोलन करणाऱ्या अधिकाऱ्यांना केन्द्र सरकार नव्हे तर भाजपाची ‘बी टीम’ असल्याचे म्हटले आहे. खुद्द पंतप्रधान मात्र मौन बाळगून आहेत. पण अधिकाऱ्यांची अशी बेशिस्त त्यांनाही घातक ठरु शकते.