शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
3
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
4
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
5
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
6
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
7
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
8
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
9
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
10
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
11
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
12
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
13
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
14
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
15
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
16
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
17
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
18
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
19
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
20
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित

हे साऱ्यांना घातक

By admin | Updated: January 2, 2016 08:37 IST

राजधानी दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांचे राज्य तर नरेन्द्र मोदी यांचे केन्द्र अशा दोन्ही सरकारांमधील संघर्षाने आता अधिकच गंभीर वळण घेतले असून अखिल भारतीय सेवेतील

राजधानी दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांचे राज्य तर नरेन्द्र मोदी यांचे केन्द्र अशा दोन्ही सरकारांमधील संघर्षाने आता अधिकच गंभीर वळण घेतले असून अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांनी चक्क संपावर जाण्याचा भूतकाळात कधीही न घडलेला प्रकार तिथे घडावा हे भविष्याचा विचार करता केन्द्र सरकारच्या दृष्टीनेही घातक ठरु शकते. दिल्लीे सरकारला देशातील अन्य राज्य सरकारांचाच दर्जा मिळावा ही केजरीवाल यांची मागणी असली तरी ती अद्याप मान्य झालेली नाही व नजीकच्या भविष्यकाळात होईल अशी शक्यताही नाही. दिल्लीला केन्द्रशासित राज्यांपेक्षाही खालचा दर्जा आहे. पण केजरीवाल हे वास्तव स्वीकारायला तयार नाहीत. त्यांचे भांडण जसे केन्द्राशी आहे तसेच दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांच्याशीदेखील आहे. आता त्यांनी केन्द्रशासित राज्यांमध्ये नियुक्त केल्या जाणाऱ्या आयएएस आणि तत्सम श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या संवर्गाशी भांडण घेतले आहे. केजरीवाल यांनी दिल्ली सरकारच्या सेवेतील वकिलांच्या मानधनात वृद्धी करण्याचा जो निर्णय घेतला त्यावर स्वाक्षरी करण्यास दोन सचिवांनी नकार देताच केजरीवाल यांनी त्यांना निलंबित केले म्हणून या संवर्गातील तब्बल दोनशे अधिकाऱ्यांनी काही काळ काम बंद आंदोलन केले. त्यांच्याकडून अशा कृतीची अपेक्षा नसते. त्यावर या अधिकाऱ्यांनी रजेवर जावे, त्यांना आपण घरबसल्या पगार देऊ आणि त्यांच्या जागी व्यावसायिक लोकांची नियुक्ती करु असे पोरकट विधान केजरीवाल यांनी केले आहे. अर्थात यालाही केन्द्र विरुद्ध राज्य या संघर्षाचीच किनार आहे. दिल्ली जिल्हा आणि क्रिकेट संघटनेतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी केजरीवाल यांनी एका न्यायिक आयोगाची घोषणा केली तेव्हां दिल्ली सरकारला तसे करण्याचा घटनात्मक अधिकारच नसल्याचे नजीब जंग यांनी तत्काळ जाहीर केले आणि त्यावरही केजरीवाल यांनी थयथयाट केला होता. जंग हे केन्द्र सरकारचे हस्तक असल्याचे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी काम बंद आंदोलन करणाऱ्या अधिकाऱ्यांना केन्द्र सरकार नव्हे तर भाजपाची ‘बी टीम’ असल्याचे म्हटले आहे. खुद्द पंतप्रधान मात्र मौन बाळगून आहेत. पण अधिकाऱ्यांची अशी बेशिस्त त्यांनाही घातक ठरु शकते.