शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
4
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
5
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
6
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
7
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
8
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
9
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
10
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
11
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
12
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
13
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
14
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
15
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
16
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
17
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
18
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
19
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
20
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?

बळीराजासाठी ‘विकास’ संकल्प हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 03:24 IST

यंदाच्या अर्थसंकल्पात कृषिक्षेत्राला जास्त प्रमाणात प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. तसे संकेतदेखील केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिले आहेत.

यंदाच्या अर्थसंकल्पात कृषिक्षेत्राला जास्त प्रमाणात प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. तसे संकेतदेखील केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिले आहेत. सरकारी संकेत हे अनेकदा स्थिती व कालपरत्वे बदलत असतात. संकेत देणे आणि प्रत्यक्ष अर्थसंकल्पात तरतूद होऊन त्याचा शेतकºयांना फायदा मिळणे यात मोठे अंतर आहे. सद्यस्थितीत शेतकºयांमध्ये असलेला असंतोष व महाराष्ट्रात शेतकºयांचे झालेले मृत्यू यामुळे केंद्रावर यासंदर्भात नक्कीच कुठे ना कुठे दबाव आहे. २०१९ च्या निवडणुका डोळ््यासमोर ठेवून असे होऊदेखील शकते. मात्र या अर्थसंकल्पातून खरोखरच शेतकºयांना प्रत्यक्ष लाभ मिळेल का याचा विचार करणे जास्त आवश्यक आहे. आजच्या स्थितीत बळीराजाला केवळ अर्थसंकल्पाची नव्हे तर ‘अस्मानी’ व ‘सुलतानी’ संकटांच्या चक्रव्यूहातून बाहेर काढण्याची गरज आहे. सद्यस्थितीत देशातील व विशेषत: विदर्भातील शेतकरी अडचणीत सापडला असताना त्याला त्यातून वर काढून प्रगतिपथावर नेणे ही सरकारची जबाबदारी आहे. यंदा अर्थसंकल्प मांडत असताना कृषिक्षेत्रातील प्रादेशिक असमतोलाचा विचारदेखील होणे अपेक्षित आहे. प्रादेशिक असमतोल दूर करून शेतकºयांना नवसंजीवनी देणारा अर्थसंकल्प मांडला गेला पाहिजे. मुळात आपला देश शेतकरीप्रधान असूनदेखील कृषिक्षेत्राला आवश्यक ते प्राधान्य देण्यात आले नाही. २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठीची तरतूद ३७ टक्क्यांनी वाढविण्यात आली होती. मात्र २०१७-१८ मध्ये हा आकडा अवघा ६.१४ टक्क्यांनी वाढविण्यात आला. यंदा वास्तवाच्या निखाºयांचे चटकेदेखील लक्षात घेऊन तरतूद केली पाहिजे. विदर्भात कीटकनाशकांमुळे शेतकरी मृत्यूंमुळे देश हळहळला. दुसरीकडे शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहेत. अशा स्थितीत शेतकºयांच्या मूलभूत प्रश्नांसोबतच प्रशासकीय यंत्रणेतील त्रुटी दूर करण्यासाठीदेखील अर्थसंकल्पात विचार व्हायला हवा. एखादी मदत जाहीर झाल्यानंतर ती शेतकºयाच्या हाती येईपर्यंत मदतीचा आकडा कमी होतो आणि प्रतीक्षेचा काळ वाढलेला असतो. कर्जमाफीमध्ये हेच दिसून आले. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून यावरदेखील तोडगा काढला पाहिजे. आतापर्यंत शेतकºयांसाठी वेळोवेळी ‘पॅकेज’ची घोषणा झाली. मात्र केवळ ‘पॅकेज’च्या कुबड्यांनी शेतकरी अडचणीतून बाहेर येणार नाही. जर खºया अर्थाने शेतकºयांचे ‘अच्छे दिन’ आणायचे असेल तर त्यांना नियोजनबद्धरीतीने आवश्यक सोई, सुविधा पुरविणे आवश्यक आहे. खºया अर्थाने विकासाचा संकल्प मांडला गेला तर शेतकºयांमधील आत्मविश्वास व आत्मबळ वाढीस लागेल.

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८