शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
5
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
6
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
7
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
8
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
9
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
10
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
11
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
12
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
13
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
14
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
15
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
16
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
17
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
18
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
19
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

गाव कारभारींच्या निवडीसाठीचा धुरळा उडाला!

By किरण अग्रवाल | Updated: December 11, 2022 11:08 IST

Gram Panchayt election : ग्रामपंचायतींच्या व त्यातही थेट सरपंचपदाच्या निवडणुकीकडे त्याच दृष्टीने पाहता, स्थानिक राजकारणाचे कोणते वा कसे रंग उधळले जातात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

- किरण अग्रवाल

थेट सरपंचांसह ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची धामधूम सर्वत्र सुरू आहे. प्रचाराने वेग घेतला आहे. यात नव्या दमाची तरुण मंडळी पक्षविरहितपणे मोठ्या संख्येने उतरलेली दिसत असल्याने राजकारणातील मळलेल्या वाटा या नवोदितांकडून स्वच्छ होण्याची अपेक्षा करता येणारी आहे.

मोठी निवडणूक लढणे तुलनेने सोपे; पण गावकीचे राजकारण म्हणजे लई भारी. कारण यात रोज सोबत उठणारा-बसणारा व जेवणाराही काय घात करून जाईल याचा अंदाजच बांधता येत नाही. सर्वत्र होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या व त्यातही थेट सरपंचपदाच्या निवडणुकीकडे त्याच दृष्टीने पाहता, स्थानिक राजकारणाचे कोणते वा कसे रंग उधळले जातात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायतींना स्व-विकासाचे अधिकार लाभले आहेत, शिवाय राजकीय वाटचालीची पहिली पायरी म्हणून ग्रामपंचायत निवडणुकांकडे पाहिले जाते. त्यामुळे आता ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही रंगू लागल्या आहेत. नाही म्हणता अपवादात्मक काही ठिकाणी बिनविरोध निवडी झाल्याही; पण बहुसंख्य ठिकाणी निवडणुकांचा धुरळा उडून गेला आहे. राजकीय वारसा असणारेच नव्हे, तर नेतृत्वाची क्षमता ठेवून वेगळी वाट चोखाळू पाहणारे अनेक सुशिक्षित तरुण यात उतरलेले दिसत आहेत, ही मोठी समाधानाची व आशादायी बाब म्हणायला हवी. बरे, या निवडणुकीत पक्षीय अभिनिवेष तितकासा नसतो, किंबहुना अपवाद वगळता तो नसतोच. त्यामुळे राजकीय कोऱ्या पाट्या असलेले तरुण यातून पुढे येतात, हे अधिक महत्त्वाचे.

अकोला जिल्ह्यातील 258 साठी 936, बुलढाणा जिल्ह्यात 251 साठी 851, तर वाशिम जिल्ह्यात 287 साठी 912 उमेदवार सरपंचपदासाठी रिंगणात आहेत. यंदा थेट सरपंचपदासाठी निवडणूक होत असल्याने सदस्यांना ‘काय ते डोंगर, झाडी व हॉटेल...’ दाखवायची गरज उरलेली नाही. याखेरीज ग्रामपंचायत सदस्यपदासाठी तिन्ही जिल्ह्यात मिळून सुमारे दहा हजारांवर उमेदवार नशीब अजमावत आहेत. एकूणच हजारो उमेदवारांची व त्यापेक्षा कितीतरी अधिक म्हणजे लाखोंच्या संख्येतील मतदारांची ही निवडणूक पाहता हा खरा लोकशाहीचा उत्सव म्हणायला हवा. लोकशाहीच्या बळकटीकरणाचे बाळकडू हे या ग्रामस्तरावरील निवडणुकीतून लाभेल असे म्हटले तर वावगे ठरू नये.

गावाचा विकास आता गावकारभाऱ्यांच्याच हाती आला आहे. त्यासाठी पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेकडे हात पसरण्याची गरज उरलेली नाही. ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून ज्या अनेकविध योजना राबविल्या जातात, त्यात सहभागी होत सार्वजनिक, तसेच व्यक्तिगत लाभाच्या योजनांद्वारे अक्षरशः कोट्यवधींची कामे करून घेता येतात. त्यासाठी दांडगी इच्छाशक्ती व वेगळे काही करून दाखविण्याची उर्मी असणे तेवढे आवश्यक असते. राजकीय घराणेशाहीचा गंध नसलेले; परंतु गावासाठी काहीतरी करू इच्छिणारे अनेक शिकले सवरलेले व कामाधंद्याला लागलेले तरुणही त्यामुळेच या निवडणुकीत पुढे आलेले दिसत आहेत.

जवळपासच्या आदर्श गावांचा ‘आदर्श’ घेऊन प्रत्येकच गावाला विकसित करता येऊ शकते. एरवी राजकीय स्वच्छताकरणाच्या गप्पा सर्वत्र केल्या जातात, येथे अधिकतर पक्षीय टोप्या परिधान न करता ग्रामपंचायतींच्या निवडणुका लढल्या जात असल्याने व असंख्य उमेदवार प्रथमच निवडणुकांना सामोरे जात असल्याने मतदारांनीही अशा चांगुलपणा जपणाऱ्या, प्रामाणिक तरुणांना संधी देणे गरजेचे आहे, ज्यातून राजकीय स्वच्छताकरण आपसूकच घडून येईल. हीच पिढी पुढे विविध ठिकाणी आपले नेतृत्व करण्यास तयार होणार असल्याने, ती पिढी पहिल्या पायरीवर निवडण्याची जबाबदारी आता मतदारांची आहे.

सारांशात, गावकारभारींच्या निवडणुकीत राजकारणाचा धुरळा उडून गेला असला तरी यात तरुण व नेतृत्वाच्या विकासासाठी धडपडणारी मंडळी मोठ्या प्रमाणात असल्याने जागोजागी नवे नेतृत्व उदयास येण्याची अपेक्षा बळावली आहे. पारंपरिक नेत्यांनी त्यांच्या वाटेत काटे न पसरता त्यांना पुढे होण्याची व स्वतःला सिद्ध करण्यासाठी संधी देण्याची मानसिकता ठेवावी, इतकेच यानिमित्ताने.

टॅग्स :Politicsराजकारणgram panchayatग्राम पंचायत