शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

गाव कारभारींच्या निवडीसाठीचा धुरळा उडाला!

By किरण अग्रवाल | Updated: December 11, 2022 11:08 IST

Gram Panchayt election : ग्रामपंचायतींच्या व त्यातही थेट सरपंचपदाच्या निवडणुकीकडे त्याच दृष्टीने पाहता, स्थानिक राजकारणाचे कोणते वा कसे रंग उधळले जातात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

- किरण अग्रवाल

थेट सरपंचांसह ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची धामधूम सर्वत्र सुरू आहे. प्रचाराने वेग घेतला आहे. यात नव्या दमाची तरुण मंडळी पक्षविरहितपणे मोठ्या संख्येने उतरलेली दिसत असल्याने राजकारणातील मळलेल्या वाटा या नवोदितांकडून स्वच्छ होण्याची अपेक्षा करता येणारी आहे.

मोठी निवडणूक लढणे तुलनेने सोपे; पण गावकीचे राजकारण म्हणजे लई भारी. कारण यात रोज सोबत उठणारा-बसणारा व जेवणाराही काय घात करून जाईल याचा अंदाजच बांधता येत नाही. सर्वत्र होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या व त्यातही थेट सरपंचपदाच्या निवडणुकीकडे त्याच दृष्टीने पाहता, स्थानिक राजकारणाचे कोणते वा कसे रंग उधळले जातात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायतींना स्व-विकासाचे अधिकार लाभले आहेत, शिवाय राजकीय वाटचालीची पहिली पायरी म्हणून ग्रामपंचायत निवडणुकांकडे पाहिले जाते. त्यामुळे आता ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही रंगू लागल्या आहेत. नाही म्हणता अपवादात्मक काही ठिकाणी बिनविरोध निवडी झाल्याही; पण बहुसंख्य ठिकाणी निवडणुकांचा धुरळा उडून गेला आहे. राजकीय वारसा असणारेच नव्हे, तर नेतृत्वाची क्षमता ठेवून वेगळी वाट चोखाळू पाहणारे अनेक सुशिक्षित तरुण यात उतरलेले दिसत आहेत, ही मोठी समाधानाची व आशादायी बाब म्हणायला हवी. बरे, या निवडणुकीत पक्षीय अभिनिवेष तितकासा नसतो, किंबहुना अपवाद वगळता तो नसतोच. त्यामुळे राजकीय कोऱ्या पाट्या असलेले तरुण यातून पुढे येतात, हे अधिक महत्त्वाचे.

अकोला जिल्ह्यातील 258 साठी 936, बुलढाणा जिल्ह्यात 251 साठी 851, तर वाशिम जिल्ह्यात 287 साठी 912 उमेदवार सरपंचपदासाठी रिंगणात आहेत. यंदा थेट सरपंचपदासाठी निवडणूक होत असल्याने सदस्यांना ‘काय ते डोंगर, झाडी व हॉटेल...’ दाखवायची गरज उरलेली नाही. याखेरीज ग्रामपंचायत सदस्यपदासाठी तिन्ही जिल्ह्यात मिळून सुमारे दहा हजारांवर उमेदवार नशीब अजमावत आहेत. एकूणच हजारो उमेदवारांची व त्यापेक्षा कितीतरी अधिक म्हणजे लाखोंच्या संख्येतील मतदारांची ही निवडणूक पाहता हा खरा लोकशाहीचा उत्सव म्हणायला हवा. लोकशाहीच्या बळकटीकरणाचे बाळकडू हे या ग्रामस्तरावरील निवडणुकीतून लाभेल असे म्हटले तर वावगे ठरू नये.

गावाचा विकास आता गावकारभाऱ्यांच्याच हाती आला आहे. त्यासाठी पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेकडे हात पसरण्याची गरज उरलेली नाही. ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून ज्या अनेकविध योजना राबविल्या जातात, त्यात सहभागी होत सार्वजनिक, तसेच व्यक्तिगत लाभाच्या योजनांद्वारे अक्षरशः कोट्यवधींची कामे करून घेता येतात. त्यासाठी दांडगी इच्छाशक्ती व वेगळे काही करून दाखविण्याची उर्मी असणे तेवढे आवश्यक असते. राजकीय घराणेशाहीचा गंध नसलेले; परंतु गावासाठी काहीतरी करू इच्छिणारे अनेक शिकले सवरलेले व कामाधंद्याला लागलेले तरुणही त्यामुळेच या निवडणुकीत पुढे आलेले दिसत आहेत.

जवळपासच्या आदर्श गावांचा ‘आदर्श’ घेऊन प्रत्येकच गावाला विकसित करता येऊ शकते. एरवी राजकीय स्वच्छताकरणाच्या गप्पा सर्वत्र केल्या जातात, येथे अधिकतर पक्षीय टोप्या परिधान न करता ग्रामपंचायतींच्या निवडणुका लढल्या जात असल्याने व असंख्य उमेदवार प्रथमच निवडणुकांना सामोरे जात असल्याने मतदारांनीही अशा चांगुलपणा जपणाऱ्या, प्रामाणिक तरुणांना संधी देणे गरजेचे आहे, ज्यातून राजकीय स्वच्छताकरण आपसूकच घडून येईल. हीच पिढी पुढे विविध ठिकाणी आपले नेतृत्व करण्यास तयार होणार असल्याने, ती पिढी पहिल्या पायरीवर निवडण्याची जबाबदारी आता मतदारांची आहे.

सारांशात, गावकारभारींच्या निवडणुकीत राजकारणाचा धुरळा उडून गेला असला तरी यात तरुण व नेतृत्वाच्या विकासासाठी धडपडणारी मंडळी मोठ्या प्रमाणात असल्याने जागोजागी नवे नेतृत्व उदयास येण्याची अपेक्षा बळावली आहे. पारंपरिक नेत्यांनी त्यांच्या वाटेत काटे न पसरता त्यांना पुढे होण्याची व स्वतःला सिद्ध करण्यासाठी संधी देण्याची मानसिकता ठेवावी, इतकेच यानिमित्ताने.

टॅग्स :Politicsराजकारणgram panchayatग्राम पंचायत