शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

मोह सुटता सुटेना

By admin | Updated: October 28, 2016 04:51 IST

राजकीय महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या लोकांच्या हाती राज्यपालपदाची जबाबदारी सुपूर्द करावी अथवा नाही, हा विषय प्रथमपासूनच वादग्रस्त असला तरी नियुक्ती करताना तसा

राजकीय महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या लोकांच्या हाती राज्यपालपदाची जबाबदारी सुपूर्द करावी अथवा नाही, हा विषय प्रथमपासूनच वादग्रस्त असला तरी नियुक्ती करताना तसा विचार कधीच केला जात नाही हे वास्तव आहे. अरुणाचल प्रदेशातील सरकारच्या रचनेत आणि विशेषत: तेथील स्थानिक राजकारणात अकारण आणि अवास्तव स्वारस्य घेऊन सरतेशेवटी गच्छंतीला सामोरे जावे लागलेले तेथील माजी राज्यपाल ज्योतीप्रसाद राजखोवा खरे तर एक मुलकी अधिकारी. त्यामुळे त्यांनी राजकारणात स्वारस्य घेण्याचे काही कारण नव्हते. तरीही त्यांनी ते घेतले. स्वयंप्रेरणेने की कुणाच्या सांगण्यावरुन या वादात न पडलेलेच बरे. आपल्या अकारण घेतल्या गेलेल्या स्वारस्यातून त्यांनी नबाम तुकी यांना मुख्यमंत्रिपदावरुन डच्चू दिला व कालिको पूल यांना मुख्यमंत्री केले. परंतु न्यायालयाने राज्यपालांचा निर्णय अवैध ठरविला. पूल यांचे मुख्यमंत्रिपद औटघटकेचे ठरले. त्यांच्या ताब्यात असलेले मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान त्यांनी सोडलेही नव्हते आणि त्यातच त्यांनी या निवासस्थानी गळ्याला फास लावून घेऊन आत्महत्त्या केली. दरम्यान राजखोवा यांची केन्द्र सरकारने उचलबांगडीही केली. त्यावर आपल्याला ज्या अवमानकारकरीत्या उचलले गेले त्याबद्दल राजखोवा यांनी जाहीर खंतदेखील व्यक्त केली. तो त्यांचा अधिकार होता असे मानता येईल. पण हे सारे घडून गेल्यानंतर त्यांचे अरुणाचलातील राजकीय असो की अन्य बाबीतील असो, स्वारस्य संपावयास हवे होते. पण तसे झाले नाही. पूल यांनी आत्महत्त्या करण्यापूर्वी तब्बल ६० पानांची चिठ्ठी लिहून ठेवली, तिचे काय झाले अशी पृच्छा आता राजखोवा यांनी जाहीरपणे केली असून या चिठ्ठीतील मजकुरात देशभर राजकीय भूकंप घडवून आणण्याची क्षमता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या ६० पानांमधील काही पानांमधला मजकूर समाज माध्यमांमधून फिरतो आहे असेही त्यांनी म्हटले आहे. पण तितकेच नव्हे तर एक माजी मुख्यमंत्री आत्महत्त्या करतो, त्याआधी स्फोटक चिठ्ठी लिहितो पण त्याच्या आत्महत्त्येची चौकशी एक साधा फौजदार करतो, असे विधान करुन राजखोवा यांनी खंतदेखील व्यक्त केली आहे. प्रत्यक्षात एक महानिरीक्षक ती करीत आहे, हे वेगळे. कोणालाही सत्तेचा मोह सुटत नाही, हेच यातून दिसून येते.