शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
2
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
3
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
4
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
5
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
6
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
7
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
8
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
9
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
10
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
11
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
12
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
13
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
14
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
15
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
16
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
17
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
18
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
19
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
20
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई

सांगा कसं जगायचं..

By admin | Updated: March 14, 2017 23:38 IST

मराठवाड्यात पावसाळ्यात साधारण ४२ दिवस पाऊस पडायचा. पुढे काही वर्षे तो ५४ दिवस होऊ लागला. आता तेवढाच पाऊस केवळ २८ ते ३१ दिवसांत पडत आहे.

मराठवाड्यात पावसाळ्यात साधारण ४२ दिवस पाऊस पडायचा. पुढे काही वर्षे तो ५४ दिवस होऊ लागला. आता तेवढाच पाऊस केवळ २८ ते ३१ दिवसांत पडत आहे. पावसाचे हे पाणी एक तर मुरते, वाहून जाते किंवा बाष्पीभवन होते. पाणी मुरण्याचे हे प्रमाण अधिकतर भूभागावरच अवलंबून असते. वाहून जाणाऱ्या पाण्याला अडविण्यासाठी राज्य सरकारने गेल्या वर्षीपासून जलयुक्त शिवार योजना हाती घेतली आहे. त्यामुळे उरला प्रश्न बाष्पीभवनाचा. एका संशोधनानुसार पावसाचे तब्बल ५६ टक्के पाणी हे बाष्पीभवनातून जाते. म्हणजे साधारण आपल्याकडे ६५ लाख लिटर पाऊस पडतो. यातला १८ ते २० लाख लिटर पाऊस बाष्पीभवनातून जातो. वाळवंटात हे प्रमाण ६५ टक्के इतके असते. याचा अर्थ आपण वाळवंटाच्या मार्गानेच जात आहोत.हे सारे दुष्काळपुराण उगाळण्याचे कारण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संख्याशास्त्र विभागातील संशोधक विद्यार्थी सत्यवान यशवंत यांनी डॉ. एस.एल. सनान्से यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मराठवाड्यातील पावसाचे संख्याशास्त्रीय विश्लेषण आणि पाऊसमानाचे पीक उत्पादनावर होणारे परिणाम’ यावर संशोधन केले आहे. जून ते आॅक्टोबर या काळातील १९७८-७९ ते २०१४-१५ या ३६ वर्षांच्या पावसाचे विश्लेषण ‘अ‍ॅव्हरेज लिकेंज मेथड’ने केले. यासाठी पुण्यातील भारतीय हवामान विभागाचा डाटा वापरला आहे. या संशोधनानुसार मराठवाड्यात सतत चार, सहा, आठ, दहा दिवस दडी मारण्याचे (ड्राय स्पेल) प्रमाण प्रचंड वाढ आहे. याचा गंभीर परिणाम पिकांची वाढ व उत्पादकतेवर होत आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात सलग चार दिवस पाऊस न पडण्याची शक्यता प्रतिवर्षी ९९ टक्के एवढी, सहा दिवसांची ९६ टक्के, ८ दिवसांची ८६ टक्के, १० दिवस पावसाने दांडी मारण्याची शक्यता ६८ टक्के एवढी आढळून आली आहे. या दडीचा परिणाम प्रत्यक्षात पिकांवर होत आहे. १९७८ ते २०१४ या ३६ वर्षांच्या काळात पिकांच्या उत्पादनात सरासरी ८ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. लातूर जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन सात टक्क्यांनी घटले आहे. हिंगोलीत ८.२ टक्क्यांनी, परभणीत ५.८ टक्क्यांनी, तर बीड जिल्ह्यात कापसाचे उत्पादन तब्बल ८.६ टक्क्यांनी घटले आहे. हे असेच सुरू राहिले तर दरडोई उत्पन्नाच्या दीड टक्का नुकसान हे शेतीत होऊ शकते. मग एक शेतकरी म्हणून मी काय करायचे? कविवर्य मंगेश पाडगांवकर म्हणतात, सांगा कसं जगायचं,कण्हत कण्हत की गाणं म्हणत...पेला अर्धा सरला आहे असंसुद्धा म्हणता येतंपेला अर्धा भरला आहे असंसुद्धा म्हणता येतंसरला आहे म्हणायचं कीभरला आहे म्हणायचंतुम्हीच ठरवा !औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबादसारख्या चांगल्या पाऊस होणाऱ्या तालुक्यात आधी एक हजार मि.मी. पाऊस व्हायचा. आता तो ५०० मि.मी.वर आला आहे. याचा अर्थ या तालुक्यावर फार मोठे आकाश कोसळले, असा होत नाही. हा पाऊसदेखील कमी नाही. भारतात वा बाहेर जिथे कोठे या प्रमाणात पाऊस पडतो तेथील जलव्यवस्थापनाचा अभ्यास करून येथील शेतकऱ्यांनी तसा बदल करायला हवा. तसे जलव्यवस्थापन करायला हवे. प्रत्येक जिल्हा-तालुक्याला दुष्काळावर हीच मात्रा लागू पडते. शिवाय बाष्पीभवन रोखण्यासाठी जैविक कुंपण वाढविणे आणि झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड करणे एवढेच आपल्या हातात आहे. दक्षिण-पश्चिम बाजूला अधिकाधिक झाडे लावून बाष्पीभवन रोखता येऊ शकते. कसदार जमीन परत मिळविण्यासाठी निंदण-खुरपणाच्या पद्धती बदलाव्या लागतील. सरकार काय करेल, याची वाट पाहत बसण्यापेक्षा परिसरात पडणारा पाऊस आणि त्याचे व्यवस्थापन याचा विचार प्रत्येक शेतकऱ्याने केला तरच भविष्यकाळ चांगला आहे. अन्यथा ढगात कितीही गोळ्या घालून पाऊस पाडला तरी तो पाऊस पुरवणी पडणार नाही. - सुधीर महाजन