शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
2
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
3
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
4
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
5
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
6
मुलानं आईला मारलं, मग स्वतःलाही संपवलं; ChatGPT कारणीभूत? OpenAI वर खटला!
7
Kankavli: हरवलेल्या मोबाईलमुळे ‘त्या’ प्रेमी युगुलानं संपवलं जीवन, तपासातून धक्कादायक माहिती समोर   
8
आश्चर्यकारक! Tata च्या नवीन Sierra ने दिले 30 kmpl चे मायलेज; 222 kmph चा टॉप स्पीडही गाठला
9
हिरा निघाला 'हा' शेअर; ९० टक्के फायद्यावर लिस्टिंग, IPO मध्ये लागलेली फक्त २ पट बोली
10
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, सोनं 1.34 लाख पार तर चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
11
मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत
12
कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड...
13
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?
14
प. बंगालमध्ये आता बांधले जाणार राम मंदिर; भाजपा नेत्यांनी लावले पोस्टर, देणगी देण्याचे आवाहन
15
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
16
इंस्टाग्रामच्या कंटाळवाण्या रील्सला म्हणा 'बाय बाय'! फक्त एका सेटिंगने बदला फीडचा अल्गोरिदम
17
‘स्लीपर वंदे भारत’वर मोठी अपडेट! १ हजार किमी अंतर ८ तासात, १६० प्रति तास वेग; पहिली सेवा...
18
भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली...
19
व्हेनेजुएला-अमेरिका वादात रशियाची उडी; मादुरोंच्या मदतीला पुतिन धावले, ट्रम्पना धक्का...
20
'जुम्मा गर्ल' किमी काटकर आठवतेय का? लेटेस्ट फोटो आला समोर, ओळखणं झालंय कठीण
Daily Top 2Weekly Top 5

बोलाचीच कढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 02:44 IST

चुकांची जाणीव करून देत सत्ताधाºयांना खडे बोल सुनावणे ही साधी गोष्ट नाही; पण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी ते सुनावले, त्यावेळी सांगलीच्या संमेलनातील दुर्गा भागवत आठवल्या

चुकांची जाणीव करून देत सत्ताधाºयांना खडे बोल सुनावणे ही साधी गोष्ट नाही; पण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी ते सुनावले, त्यावेळी सांगलीच्या संमेलनातील दुर्गा भागवत आठवल्या. दुर्गा भागवतांचा काळ वेगळा होता, तो खºया अर्थाने पुरोगामी विचार करणाºयांचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करणारा होता, दुस-याचे विरोधी विचार समजून घेण्याचा होता. दुर्दैवाने आज ही परिस्थिती नाही आणि केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी वैचारिक लढा देणारा कोणी साहित्यिक मराठी सारस्वतांमध्ये दिसत नाही. हा काळाचा महिमा म्हणावा का? अशावेळी देशमुखांनी सडेतोड भूमिका घ्यावी हा आश्चर्याचा धक्का. गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या विषयांनी समाज ढवळून निघाला आहे. गोहत्या बंदी कायदा, मराठा आरक्षण आंदोलन, कोपर्डी बलात्कार प्रकरण, नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे या दोन पुरोगामी लढवय्यांच्या हत्या, शेतकºयांचे आत्महत्या सत्र असे अनेक प्रश्न उद्भवले. ज्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच झाला. गोहत्या बंदी कायद्यानंतर तर काही निरपराध लोकांना जीव गमवावा लागला. या घटनांचे तरंग साहित्यिक आणि साहित्य विश्वात उमटले नाहीत हे वास्तव आहे. कोपर्डी बलात्कार प्रकरण आणि त्यानंतर निघालेल्या मराठा समाजाच्या मोर्चांनी तर सामाजिक घुसळण झाली. विदर्भ आणि मराठवाड्यात गेल्या पंधरा वर्षांत शेतकºयांच्या आत्महत्या ही नैमित्तिक घटनाच होऊन बसली. यावर साहित्यात काही ठोस लिहिले गेले. ज्यांची नाळ ग्रामीण जीवनाशी अजून बांधलेली आहे, अशा बोटावर मोजता येतील एवढ्याच साहित्यिकांनी त्याला वाचा फोडली. नाही तरी आपल्यांकडे शहरी-ग्रामीण अशी साहित्याची विभागणी आहेच ती एवढ्यावर थांबली नाही, तर समाज घटकांपर्यंत ही उतरंड वाढली; अशा कोणत्याच घटनांवर साहित्यिकांनी ठोस भूमिका म्हणण्यापेक्षा कोणतीच भूमिका घेतली नाही हे वास्तव कसे विसरता येईल. तिकडे तामिळनाडूत पेरूमल मुरुगन ज्यावेळी आपले मर्तिक आटोपतो तेव्हा पुरोगामी साहित्यिकांची फळीच रस्त्यावर उतरते. आंदोलन उभे राहते ते केवळ साहित्यिकांचे आंदोलन न राहता समाज आंदोलन घडते, असे एखादे वानगीदाखल उदाहरण मराठी साहित्यात आहे का? साहित्यिकच साहित्यिकांच्या मदतीला जाण्याचे हे उदाहरण असले तरी मराठी साहित्य विश्वात या भाईचा-याचा दुष्काळच आहे. आनंद यादव यांना जे भोगावे लागले त्याची एक वेगळीच कादंबरी होऊ शकली असती. अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या निर्वाचित अध्यक्षावर अध्यक्षपद न भूषविण्याची नामुष्की आली. अध्यक्षपदावर दरवर्षी होणारे साहित्यिकांमधील संकुचित राजकारणाचे ओंगळवाणे चित्र मराठीत दिसते, त्याचे बळी आनंद यादव ठरले. हे काही एकमेव उदाहरण नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी साहित्यिकांचा उल्लेख बैल असा केला. त्याचा साधा निषेध करण्याचे धाडस कोणी दाखविले नव्हते. २००४ साली भांडारकर संशोधन केंद्रावर हल्ला झाला. त्याच्याविरुद्ध कोणी बोलले नाही. कोणत्याही ज्वलंत आणि वादग्रस्त विषयावर भूमिका न घेण्याची साहित्यिकांमधील प्रवृत्ती दिवसेंदिवस बळावत गेली आणि देशमुखांच्या वक्तव्याने हे सारे आठवले. गेल्या पाव शतकात साहित्यिकांचे कंपूकरण झाले. प्रत्येकाचा गट-तट वेगळा. जी काही मंडळी गंभीर लिखाण करणारी आहे ती शांतपणे आपले काम करताना दिसते. त्यांचे योगदान तर मराठीला समृद्ध करीत आहे; पण हौशा, गवशांचीच एवढी गर्दी झाली की, यात ही माणके सापडत नाहीत. हौशी मंडळी राजकीय नेत्यांच्या कच्छपी लागल्याचे चित्र दिसते, अशा एक ना अनेक अपप्रवृत्तींनी साहित्यक्षेत्र गढूळ झाले आहे, अशा वेळी कोण कोणाला खडे बोल सुनावणार. राजाला सुनावणे सोपे आहे वास्तविक साहित्यिकांनाच खडे बोल कोण देशमुख ऐकवणार?

टॅग्स :Laxmikant Deshmukhलक्ष्मीकांत देशमुख