शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

दगडाचे कवित्व...

By admin | Updated: April 7, 2017 23:42 IST

दोन मित्र वाळवंटातून प्रवास करीत असतात. अचानक त्यांच्यात कुठल्यातरी कारणावरून वादावादी होते

दोन मित्र वाळवंटातून प्रवास करीत असतात. अचानक त्यांच्यात कुठल्यातरी कारणावरून वादावादी होते आणि रागाच्या भरात एक मित्र दुसऱ्या मित्राच्या कानशिलात देतो. दुसऱ्याला मित्राचे हे वागणे फार अपमानास्पद वाटते. परंतु आपल्या रागावर नियंत्रण ठेवत तो काही बोलण्याऐवजी वाळूवर लिहून ठेवतो, आज माझ्या सर्वोत्तम मित्राने मला थप्पड मारली. पुढे ते एका उद्यानात पोहोचतात. तेथे एक तलाव असतो. दोघेही तलावात स्नानासाठी उतरतात. अपमानित झालेला मित्र पाण्यात बुडू लागतो. परंतु दुसरा दलदलीतून बाहेर काढून त्याचे प्राण वाचवतो. तलावातून बाहेर आल्यावर मित्र दगडावर लिहितो, आज माझ्या मित्राने माझे प्राण वाचविले. हे बघून दुसरा त्याला विचारतो, मी थप्पड मारली तेव्हा तू रेतीवर लिहिलेस आणि जीव वाचविले तेव्हा दगडावर, असे का? यावर दुसऱ्याने दिलेले उत्तर अत्यंत मार्मिक असते. तो म्हणतो, अपमानाची घटना रेतीवर यासाठी लिहिली कारण ती क्षमेच्या हवेत मिटून जाईल. परंतु कुणी आपले चांगले केले तर ते नेहमी दगडावरच कोरले पाहिजे. जेणेकरून ते कायम आपल्या स्मरणात राहील. एखादा शब्द पाळण्याची गोष्ट होते तेव्हासुद्धा ‘ती दगडावरची रेषच’ असते आणि ऐतिहासिक निर्णय असला तर तो मैलाचा दगड ठरतो. दगडाचे हे कवित्व यासाठी कारण या दगडावरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. जम्मू-काश्मीरमधील तरुणांच्या हाती हा दगड का आणि कसा आला? याबाबत राजकीय नेत्यांमध्ये सध्या गंभीर विचारमंथन सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दगडाच्या वापराबद्दल काश्मिरी तरुणांना उद्बोधन काय केले अनेकांच्या मनात निरनिराळ्या कल्पना येऊ लागल्या. काश्मिरी नागरिकांच्या इच्छेनुसार काश्मीरचा प्रश्न सुटावा, अशी इच्छा बाळगणाऱ्या खोऱ्यातील तरुणांनी देशासाठी लढा देण्याकरिता हे दगड हाती घेतले असल्याचा अफलातून युक्तिवाद या राज्याचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी केला तर दगडफेक करणारी ही मुले हताश झाली असल्याचे या राज्याच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचे म्हणणे आहे. अर्थात कुणी काहीही म्हणो एवढे मात्र नक्की की हा प्रश्न दगडांनी सुटणारा नाही. बिच्चारा दगड ! तो ाुद्धा हे जाणतो, पण करणार काय? एकवेळ या दगडाला पाझर फुटेल पण केवळ आपल्या क्षुल्लक राजकीय स्वार्थापोटी हा प्रश्न कायम जिवंत ठेवणाऱ्यांची मने मात्र विरघळणार नाहीत. तेव्हा त्यांना पाषाणहृदयी म्हणणे हासुद्धा दगडाचाच अपमान ठरेल.