शहरं
Join us  
Trending Stories
1
"पक्षासाठी केसेस अंगावर, तिकीट मात्र दुसऱ्यांना"; संभाजीनगरात भाजप पदाधिकाऱ्यांचा राडा
2
काहीतरी मोठं घडणार! चीनची आक्रमक हालचाल, तैवानला सैन्याने वेढा घातला; विमानांची उड्डाणेही रद्द
3
Municipal Election 2026: सुरुवात झाली! अखेरच्या दिवशी पुणे, नाशिकसह या महापालिकांत भाजप-शिवसेनेची युती तुटली...
4
फोटोग्राफर, प्रोड्यूसर, नॅशनल लेव्हल फुटबॉलपटू... कोण आहे प्रियंका गांधींची होणारी सून?
5
विरोधकांच्या एकीला तडे; वसई-विरारमध्ये उद्धवसेना स्वबळावर, महायुतीतील मित्रपक्षाचा पाठिंबा
6
बच्चू कडूंच्या प्रहारची उद्धवसेनेसोबत युती, पण उमेदवार लढणार मशाल चिन्हावर!
7
Travel : चला, प्रेमाच्या शहरात! आयफेल टॉवर अन् सीन नदीच्या काठावर फिरण्यासाठी असा करा परफेक्ट प्लॅन
8
मिशन बंगाल; अमित शाहांनी रणनीती आखली, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ममता बॅनर्जींचा सामना करणार...
9
मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेसकडून ५६ उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध, अमराठी आणि मुस्लिम चेहऱ्यांना दिलं प्राधान्य   
10
२०२५ सरता सरता...! Google वर '67' सर्च करताच तुमची स्क्रीन थरथरू लागतेय? तुम्हीही करून पहा...
11
बाजारात एन्ट्री घेताच जोरदार आपटला 'हा' शेअर, पहिल्याच दिवशी २४% नं घसरला, गुंतवणूकदारांना मोठा झटका
12
"सूर्यकुमार यादव मला खूप मेसेज करायचा, पण आता...", बोल्ड कंटेटमुळे चर्चेत असलेल्या अभिनेत्रीचा खळबळजनक दावा
13
महायुतीत फूट! धुळ्यातही भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेना-अजित पवारांची NCP युतीत लढणार
14
Silver Price : चांदीचा ‘सिल्वर रिटर्न’! ऑक्टोबरची गुंतवणूक, डिसेंबरमध्ये ७२ हजारांचा फायदा; गणित समजून घ्या
15
'घरातील लोकांना तिकीट हवं होतं म्हणून युती तोडली!'; भाजपचा शिंदेसेनेवर पलटवार
16
"हा तर विश्वासघातच"; मित्रपक्षांनी 'झुलवत' ठेवल्याने रिपाई आक्रमक, रामदास आठवलेंनी दिला अल्टिमेटम
17
भाजपाचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी जुळले; शिंदेसेनेशी मात्र बिघडले! कोण किती जागा लढवणार?
18
LPG सबसिडीचे सूत्र बदलणार! अमेरिकेकडून गॅस आयातीमुळे केंद्र सरकार नवा निर्णय घेण्याच्या तयारीत
19
“कोणीही-कितीही सोडून जाऊ द्या, वसई-विरारमध्ये विजय आमचाच होणार”; हितेंद्र ठाकूरांचा एल्गार
20
प्रियंका गांधींच्या मुलाने गुपचुप उरकला साखरपुडा; 'ही' सुंदरी होणार वाड्रा कुटुंबाची सून...
Daily Top 2Weekly Top 5

दगडाचे कवित्व...

By admin | Updated: April 7, 2017 23:42 IST

दोन मित्र वाळवंटातून प्रवास करीत असतात. अचानक त्यांच्यात कुठल्यातरी कारणावरून वादावादी होते

दोन मित्र वाळवंटातून प्रवास करीत असतात. अचानक त्यांच्यात कुठल्यातरी कारणावरून वादावादी होते आणि रागाच्या भरात एक मित्र दुसऱ्या मित्राच्या कानशिलात देतो. दुसऱ्याला मित्राचे हे वागणे फार अपमानास्पद वाटते. परंतु आपल्या रागावर नियंत्रण ठेवत तो काही बोलण्याऐवजी वाळूवर लिहून ठेवतो, आज माझ्या सर्वोत्तम मित्राने मला थप्पड मारली. पुढे ते एका उद्यानात पोहोचतात. तेथे एक तलाव असतो. दोघेही तलावात स्नानासाठी उतरतात. अपमानित झालेला मित्र पाण्यात बुडू लागतो. परंतु दुसरा दलदलीतून बाहेर काढून त्याचे प्राण वाचवतो. तलावातून बाहेर आल्यावर मित्र दगडावर लिहितो, आज माझ्या मित्राने माझे प्राण वाचविले. हे बघून दुसरा त्याला विचारतो, मी थप्पड मारली तेव्हा तू रेतीवर लिहिलेस आणि जीव वाचविले तेव्हा दगडावर, असे का? यावर दुसऱ्याने दिलेले उत्तर अत्यंत मार्मिक असते. तो म्हणतो, अपमानाची घटना रेतीवर यासाठी लिहिली कारण ती क्षमेच्या हवेत मिटून जाईल. परंतु कुणी आपले चांगले केले तर ते नेहमी दगडावरच कोरले पाहिजे. जेणेकरून ते कायम आपल्या स्मरणात राहील. एखादा शब्द पाळण्याची गोष्ट होते तेव्हासुद्धा ‘ती दगडावरची रेषच’ असते आणि ऐतिहासिक निर्णय असला तर तो मैलाचा दगड ठरतो. दगडाचे हे कवित्व यासाठी कारण या दगडावरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. जम्मू-काश्मीरमधील तरुणांच्या हाती हा दगड का आणि कसा आला? याबाबत राजकीय नेत्यांमध्ये सध्या गंभीर विचारमंथन सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दगडाच्या वापराबद्दल काश्मिरी तरुणांना उद्बोधन काय केले अनेकांच्या मनात निरनिराळ्या कल्पना येऊ लागल्या. काश्मिरी नागरिकांच्या इच्छेनुसार काश्मीरचा प्रश्न सुटावा, अशी इच्छा बाळगणाऱ्या खोऱ्यातील तरुणांनी देशासाठी लढा देण्याकरिता हे दगड हाती घेतले असल्याचा अफलातून युक्तिवाद या राज्याचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी केला तर दगडफेक करणारी ही मुले हताश झाली असल्याचे या राज्याच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचे म्हणणे आहे. अर्थात कुणी काहीही म्हणो एवढे मात्र नक्की की हा प्रश्न दगडांनी सुटणारा नाही. बिच्चारा दगड ! तो ाुद्धा हे जाणतो, पण करणार काय? एकवेळ या दगडाला पाझर फुटेल पण केवळ आपल्या क्षुल्लक राजकीय स्वार्थापोटी हा प्रश्न कायम जिवंत ठेवणाऱ्यांची मने मात्र विरघळणार नाहीत. तेव्हा त्यांना पाषाणहृदयी म्हणणे हासुद्धा दगडाचाच अपमान ठरेल.