शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

-तरीही अस्वस्थ, असमाधानी का ?

By admin | Updated: July 4, 2017 00:09 IST

कर्जमाफीची घोषणा केल्यानंतरही विरोधकांचे समाधान होत नाही. त्यांचे समाधान नेमके कशात?

- गजानन जानभोरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतरही विरोधकांचे समाधान होत नाही. त्यांचे समाधान नेमके कशात? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत की फडणवीसांना अडचणीत आणण्यात? या प्रश्नाचे उत्तर एव्हाना सामान्य शेतकऱ्यांनाही हळूहळू सापडू लागले आहे. समजा उद्या फडणवीसांनी राज्यातील सर्वच शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ केले तरीही त्यांचे समाधान होणार नाही. कारण ही लढाई शेतकरी हितासाठी नाही तर गमावलेला जनाधार परत मिळविण्यासाठी आहे. शहरी मतदारांप्रमाणे ग्रामीण भागातील मतदारही भाजपाकडे जाईल, या भीतीमुळेच कर्जमाफी होऊनही शरद पवार ‘असमाधानी’ आहेत. शेतकरी नेते म्हणून आपले अस्तित्व धोक्यात येऊ नये, ही चिंता सुकाणू समितीतील काही नेत्यांना आहे. याच अस्वस्थतेतून हे आंदोलन पुढे नेण्याचा आणि ते अधिक चिघळविण्याचा त्यांचा डाव आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेली कर्जमाफी पुरेशी नाहीच. शेतकऱ्यांना पिढ्यान्पिढ्या उद्ध्वस्त करणारे जुलमी कायदे जोवर रद्द होत नाहीत, तोपर्यंत हे नष्टचर्य संपणार नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी यापूर्वीही झाली, पण कुठल्याही सरकारने ७० वर्षांच्या काळात कर्जमाफीच्या निर्णयातून सरकारी नोकर आणि लोकप्रतिनिधींना कधी वगळले नाही. शेती असलेले व्यापारी, सरकारी कर्मचारी आणि राजकीय नेत्यांवरच बँकांचे सर्वात जास्त कर्ज आहे. त्यांना या कर्जमाफीच्या लाभातून वगळण्याचा फडणवीसांचा निर्णय राजकारणाच्या पलीकडचा आहे. त्यात महाराष्ट्राचे व्यापक हित आहे. पण त्याच वेळी असे करणे राजकीयदृष्ट्या गैरसोयीचे असल्याचे ठाऊक असूनही फडणवीसांनी हे धाडस केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद चारवेळा सांभाळून व १० वर्षे देशाचे कृषिमंत्री राहूनही शरद पवारांना हे जमले नाही. नेमका याच गोष्टीचा तर हा पोटशूळ नाही ना? देवेंद्र फडणवीस दिल्लीत शरद पवार आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना भेटले. अशोक चव्हाण आणि उद्धव ठाकरेंशीही त्यांनी चर्चा केली. त्यानंतरच कर्जमाफीची घोषणा केली. विरोधकांना विश्वासात घेऊनच सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतल्याचा संदेश शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात मुख्यमंत्री यशस्वी ठरले. या कर्जमाफीमुळे छोटा शेतकरी आणि मोठा शेतकरी अशी वर्गवारी निश्चित झाल्याने ज्यांची उपजीविका शेतीवरच अवलंबून आहे त्या शेतकऱ्यांच्याच कल्याणासाठी योजना आखणे यापुढे सरकारला सोपे जाईल. आयकर वाचविण्यासाठी, भ्रष्ट मार्गाने मिळविलेला पैसा जिरविण्यासाठी जोडधंद्याची शेती करणाऱ्या सरकारी नोकर, नेत्यांना यापुढे त्याचे लाभ ओरबाडता येणार नाही. कर्जमाफी किंवा शेतकरी कल्याणाच्या योजना गरीब शेतकऱ्यांनाच मिळायला हव्यात, ही जनभावनाही या निर्णयामुळे खोलवर रुजणार आहे. ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप ज्यांच्यावर झालेत ते पवारांचेच आप्तस्वकीय आहेत. या भ्रष्ट सिंचनामुळेच विदर्भातील हजारो शेतकऱ्यांचा जीव गेला, हे कटु सत्यही या कर्जमाफीच्या निमित्ताने पवारांच्या लक्षात आणून देणे गरजेचे आहे. पण या पापाबद्दल पवार कधीच बोलत नाहीत. शेतकरी आंदोलनाच्या काळात पवारांना अचानक शिवाजी महाराजांची आठवण झाली. शिवाजी महाराज ‘गोब्राह्मण प्रतिपालक नव्हते’, असे वक्तव्य त्यांनी केले. शरद पवार कुठलीच गोष्ट सहज करीत नाहीत. त्यामागे त्यांचा ‘तर्क’ असतो. पवारांचे हे वक्तव्य झुंडशाहीला प्रोत्साहन देणारे आहे. जातीच्या झुंडी आपल्याच कब्जात ठेवण्यासाठी केलेला तो त्रागा आहे. मागे याच पवारांनी फडणवीसांची जात काढली होती. काही वर्षांपूर्वी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाने घायकुतीला आलेले पवार शरद जोशींच्या जातीचा असाच वारंवार उल्लेख करायचे. पवारांच्या जातीय दुखण्यावर प्रत्युत्तर न देता फडणवीसांनी कर्जमाफीवरच लक्ष केंद्रित केले, हे बरे झाले. नजीकच्या काळात असे जातीचे दुखणे अधूनमधून उफाळून येईल. आपले हित कशात आहे, हे शेतकऱ्यांना कळते. शेतकरी जातपात मानत नाही. तसे असते तर शरद जोशी, राजू शेट्टी यांचे नेतृत्व शेतकऱ्यांनी स्वीकारले नसते. कर्जमाफीनंतर फडणवीसांचे नेतृत्व शेतकऱ्यांना आश्वासक वाटू लागले आहे. पवारांना हा संकेत कळत असल्यानेच त्यांची अस्वस्थता आणि असमाधान असेच कायम राहणार आहे.