शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
4
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
5
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
6
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
7
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
8
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
9
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
10
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
11
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
12
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
13
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
14
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
15
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
16
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
17
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
18
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
19
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
20
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं

इकोफ्रेंडली वाहतूक सुरू करायची!

By admin | Updated: January 1, 2015 02:57 IST

दररोज ३० कि़मी़ रस्ता बांधण्याचे नव्या वर्षातील आपले उद्दिष्ट आहे. पर्यावरण, इंधन बचत, आरोग्य जपण्यासाठी विकास व नावीन्यपूर्ण योजनांची अंमलबजावणी या पातळीवर विचार केला तेव्हा उत्तर मिळाले,

दररोज ३० कि़मी़ रस्ता बांधण्याचे नव्या वर्षातील आपले उद्दिष्ट आहे. पर्यावरण, इंधन बचत, आरोग्य जपण्यासाठी विकास व नावीन्यपूर्ण योजनांची अंमलबजावणी या पातळीवर विचार केला तेव्हा उत्तर मिळाले, नव्या वर्षीचा संकल्प ठरला-‘इकोफ्रेंडली वाहतूक, बायोइंधनाला प्राधान्य व जलवाहतूक सर्वौच्च पर्याय!’ ‘गडकरी एक ‘सक्सेस स्टोरी’ आहे. मी जे ठरवतो, ते करतो हेही होईलच!’देशाला उत्तम पर्यावरणाची गरज आहे. वातावरणातील कार्बन डायआॅक्साइड कमी करण्यावर माझा भर आहे. नव्या वर्षात नवीन तंत्रज्ञान व नव्या इंधनाला ताकद देणार असून इलेक्ट्रिक, बायोडिझेल, बायोगॅस, इथेनॉलवर बसेस चालवण्याचा मानस आहे. १०० टक्के इथेनॉलवर चालणारी केनियाच्या कंपनीची एक बस नागपुरात धावते आहे. ही चाचणी यशस्वी झाली तर सार्वजनिक वाहतुकीचा उत्तम पर्याय उभा होईल. अलीकडेच लंडन प्रवासात मी इलेक्ट्रिकची बस पाहिली. ती हिंदुजांनी तयार केली आहे. हा पर्यायही उत्तम ठरू शकेल. इकोफ्रेंडली ‘ई-रिक्क्षा’ धावतेच आहे. तीन-चार महिन्यांत सर्व बाबी स्पष्ट होतील. नवीन तंत्रज्ञानाची सांगड घालत केलेल्या वाहतूक व वाहन क्षेत्रातील या बदलामुळे आॅटोमोबाइल क्षेत्रात नक्कीच ऊर्जा निर्माण होईल. ‘ई-टोल’ ही एक चांगली कल्पना प्रत्यक्षात आली आहे. त्यामुळे इंधनाची मोठी बचत होईल. नव्या वर्षात देशातील सर्वच राष्ट्रीय महामार्गांवरील टोल प्लाझांवर सुरू झालेला असेल व त्याचे नियंत्रण दिल्लीतील माझ्या कार्यालयातून होईल. यामुळे इंधन, इंजिन व वेळीची बचत होईल. जहाजबांधणी मंत्रालय दुर्लक्षित राहिले आहे. त्याकडे आव्हान म्हणून मी पाहतो. रस्त्याने प्रवास केला तर एका किलोमीटरसाठी दोन रुपये, रेल्वेने केला तर एक रुपये आणि पाण्यातून केला तर त्याच अंतरासाठी फक्त ५० पैसे खर्च येतो. शिवाय पर्यावरणाची कोणतीच हानी नाही. त्यामुळे जलवाहतुकीला माझे सर्वौच्च प्राधान्य आहे. मुंबईमध्ये सीप्लेनला आधीच परवानगी दिली आहे. पुढच्या काळात एअरपोर्टप्रमाणे आपण बसपोर्ट, सीपोर्ट व वॉटरपोर्ट विकसित करणार आहोत. निविदांची प्रक्रियाही पूर्ण होण्याच्या टप्प्यात आहे़ त्यामुळे नव्या वर्षात जलवाहतुकीने मैदान गाजवलेले असेल. मुंबईच्या नागरिकांना दिलासा देण्यास काही योजना आहेत. आॅस्ट्रेलियन कंपनी लाइटवेट अ‍ॅल्युमिनियम बोटी तयार करते. त्या मुंबईतील वाहतुकीस उपयुक्त ठरू शकतात. त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. महाराष्ट्राला मुंबईपासून गोवा तसेच वर गुजरातच्या सीमेपर्यंतच्या समुद्रकिनाऱ्याने वाहतुकीचे अनेक पेच सोपे केले आहेत. समुद्रकिनाऱ्याच्या या सीमावर्ती भागात शिप बिल्डिंग, शिप ब्रेकिंग, इनलँड वॉटरवेज, हॉवरक्राफ्टस्ट सी प्लेनस, वॉटर टर्मिनल्स उभे करून त्यांना रेल्वे लाइनने जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. नद्यांतून देशांतर्गत जलवाहतुकीसाठी २३ हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव तयार झाले.(शब्दांकन : रघुनाथ पांडे)मुंबई - गोवा रस्ता चौपदरी काँक्रीटचा करून, १४ फ्लायओव्हर्सची कामे सुरू केली आहेत. नवीन पुलांच्या निर्मितीमध्ये जलसिंचनासाठी बंधाऱ्यांची निर्मिती, मुंबईला समुद्राच्या आतून भुयारी रिंग रोड करण्याबाबत अभ्यास सध्या सुरू आहे. तो ४५ ते ५० हजार कोटींचा होईल. अमरावतीपासून सूरतपर्यंतचा रस्ता ८ हजार कोटी खर्चून सिमेंट काँक्र ीटचा करणार आहे. त्याचबरोबर बोरखेडीपासून रत्नागिरीपर्यंत विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात जाणारा ८ ते ९ हजार किलोमीटरचा चौपदरी काँक्र ीटचा रस्ता तसेच देहू व आळंदीपासून पंढरपूरपर्यंतचे आठ हजार कोटी रु पये खर्चून दोन पालखी मार्ग निर्माण करण्याचे निर्णय घेतले आहेत.मुंबईतील मेट्रोपॉलिटन भागांमध्ये फेरी सर्व्हिस सुरू करण्याचे प्रयत्न करू. औरंगाबाद व वर्धा जिल्ह्यातील सिंदी येथे दोन ड्रायपोर्ट निश्चितपणे तयार होतील. नव्या वर्षात अनेक बदल दिसून येतील. रस्ते विकासाचे मार्ग असतात ते आपण यापूर्वी सिद्ध केले़ आता ते महामार्ग दिसून येईल.- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री