शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

क्रीडा कृती दल

By admin | Updated: August 29, 2016 02:14 IST

चांगलेच आहे, त्यात वाईट काहीच नाही. पण स्वागत करण्याची घाई करायचे कारण नाही. रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताच्या पदरी पडलेली निराशा हा दीर्घकालीन वारसा आहे

चांगलेच आहे, त्यात वाईट काहीच नाही. पण स्वागत करण्याची घाई करायचे कारण नाही. रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताच्या पदरी पडलेली निराशा हा दीर्घकालीन वारसा आहे. तो यापुढील किमान तीन आॅलिम्पिक स्पर्धांमध्ये तरी मोडला जावा म्हणून एक विशेष क्रीडा कृती दल स्थापन करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाहीर केला आहे. येत्या काही दिवसात या दलाची स्थापना केली जाईल आणि देशांतर्गत क्रीडा प्रकारास आवश्यक सोयी सवलती, खेळाडंूचे प्रशिक्षण, त्यांची निवड पद्धती आदिचा कृती आराखडा तयार करण्याचे काम या दलाकडे सुपूर्द केले जाईल. कल्पना चांगली आहे. सरकार विद्यमान असो की आधीची, त्यांच्याकडे चांगल्या कल्पनांना कधी तोटाच नव्हता. पण आज देशातील विविध क्रीडा संघटनांकडे नजर टाकली असता तिथे सारी बजबजपुरी राजकारण्यांचीच आहे. क्रिकेट नियामक मंडळास या बजबजपुरीपासून मुक्त करण्याचा निर्णय माजी सरन्यायाधीश राजेन्द्रमल लोढा यांच्या समितीने घेतला असला तरी मुळात तो कितपत टिकेल याचीच शंका आता येऊ लागली आहे. तरीदेखील आत्तापासूनच येऊ घातलेल्या कृती दलास नाट लावण्याचे कारण नाही. पण त्याची घोषणा करणाऱ्या मोदी सरकारच्याच काळात गेल्या वर्षी या क्रीडा क्षेत्रात काय झाले याकडे लक्ष टाकण्यास हरकत नाही. अर्थसंकल्पात क्रीडेसाठी १५४१ कोटी ठेवले गेले. ती तरतूद नंतर १३७१ कोटींवर नेली. पुढे त्यात एकदा १६४ आणि दुसऱ्यांदा १७० कोटींची कपात केली गेली. शिल्लक राहिलेल्या निधीमधून राष्ट्रीय पातळीवरील इंंडियन इन्स्टिट्यूट आॅफ स्पोर्टस सायन्स अ‍ॅन्ड रिसर्च या संस्थेला ५० लाख रुपये मंजूर केले गेले. प्रत्यक्षात हातात टिकवले अवघे दोन लाख! त्याचप्रमाणे नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ स्पोर्टस या संस्थेला मंजूर केले गेले पुन्हा ५० लाख पण हातात टिकवले सात लाख! दोन्ही मिळूनच्या या कोटीभर रुपयातील जे नऊ लाख अदा केले गेले ते सारे प्रशासकीय खर्च, भत्ते वगैरे यावरच खर्ची पडले असणार. क्रीडा क्षेत्राकडे बघण्याचा देशातील सर्व सरकारांचा दृष्टिकोनच यातून प्रतिबिंबित होतो. तूर्तास आगामी कृति दलाच्या बाबतीत असे काही होणार नाही अशी आशा जनता बाळगू शकते कारण ती केवळ तेच करु शकते.