शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

वेग

By admin | Updated: August 22, 2016 06:16 IST

मन आणि वास्तव व्यवहार हे एकमेकांना स्पष्ट करू शकत नाहीत. मन व्यवहार बनते आणि व्यवहार कालांतराने मनच होते.

मन आणि वास्तव व्यवहार हे एकमेकांना स्पष्ट करू शकत नाहीत. मन व्यवहार बनते आणि व्यवहार कालांतराने मनच होते. वास्तवातील उच्च प्रतीची कंपने तुम्हाला मनापर्यंत नेतात. अतिशय कमी कंपनातील मन वास्तव व्यवहाराचं दर्शन घडवतं. मन आणि वास्तवावर स्वामी विवेकानंद बोलताना हा भेद स्पष्ट करतात. ते मनच असते जे आपलं शरीर घडवते. शरीर असणे आणि घडविणे यात फरक आहे. म्हणून मनावर संस्कार करायचे. म्हणून विशेषत: मुलांबाबत वागताना त्यांच्या आणि आपल्या मनाचा विचार करावा लागतो. त्यात परिस्थिती महत्त्वाची, भवताल महत्त्वाचा.काळ बदलला तसा माणसांचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. पूर्वी मैदानी खेळ महत्त्वाचे वाटत. त्यात फक्त शरीर कमावणे एवढाच उद्देश नव्हता. मनही स्वच्छ प्रसन्न शुभ्र घडविणे महत्त्वाचे होते. सांघिक भावना महत्त्वाची होती. हे खेळ कमी झाले. आता ते आॅलिम्पिकमध्येच बघायचे आणि इतर देशांतील खेळाडूंना पदके मिळाली तर चुकचुकायचे एवढेच आपल्या हातात. एखाद्या सिंधूने मुसंडी मारली तर नाचायचे. जयजयकार करायचा. पण अशा सिंधू एवढ्या विशाल भारतात बिंदू होत आहेत हे मान्य करायला हवंय. आपल्याला अजून अंगण आहे. पण तेही हरवत चाललं आहे. मैदानं अतिक्रमित होत आहेत. बिल्डर, दलाल, माफिया यांनी देशाचं बांधकाम गिळंकृत केलं आहे. आपणही अतिक्रमणात राहू लागलो, पूररेषेत घरं बांधून नद्यांना गॅलरीतून बघू लागलो. पण कधीतरी महापूर येणारच, घरांची नासधूस होणारच. निसर्ग जसजसा आवळला जातो तसतसा तो कधीतरी उद्दाम होतोच. आपल्या जगण्याचा वेग आणि मोकळ्या हवेचा, आरोग्याचा विचार यांचं गणित जमवताना आयुष्य ओढलं जातंय हे आपल्या कधी लक्षात येणार? प्रगती झाली आणि संध्याकाळचा परवचा आणि शुभंकरोती इतिहासजमा झाले. परवा एका मित्राच्या घरी गेलो होतो. त्याची दोन मुले टीव्हीवर गेम खेळत होती. मुलगा हातातल्या रिमोटवर बटनं दाबून प्रचंड वेगाने गाडी चालवत होता. इतर गाड्यांना धडाड धडकत होता. झाडाला ढुशा मारीत होता. रेलिंग तोडत होता. आई आणि इतर टाळ्या वाजवीत होते. जेवढे जास्त अपघात तो करेल तेवढा तो पराक्रमी, शूर. मी सहज विचारले, कारे खरी गाडी अशीच चालवशील? त्याने माझ्याकडे ढुंकून न बघता अजून जोरात चालवीन असं फुशारकीने सांगितलं. गुन्हे करण्याची सवय लावणारे खेळ खेळत आपण मोठे होणार आणि ती मुले रस्त्याने कसरत करीत बाइक चालवणार.वास्तवाच्या वेगाने पछाडलेल्या आपणाला मनाचा वेग आवरा हे म्हणण्याचा काय अधिकार. बेफाम हा आयुष्याचा मंत्र होत असताना मनाला आवरा, हे बैलगाडीत बसल्यासारखेच होणार. बैल तर कधीच कत्तलखान्यात गेलेत आणि आपले ब्रेक फेल झालेत.-किशोर पाठक