शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
2
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
3
विजय मल्ल्याच्या मनात होती Mumbai Indians, पण घ्यावी लागली RCB, वाचा टीम खरेदीचा भन्नाट किस्सा
4
“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक
5
रेपो दरात कपात, ५० आणि २० लाखांच्या लोनवर किती कमी होणार EMI? जाणून घ्या
6
परिस्थिती गंभीर! कोरोनापेक्षाही जीवघेणा 'हा' आजार; हृदयावरच आघात, दरवर्षी १८ मिलियन मृत्यू
7
९५ वर्षांचे आजोबा, ७० वर्ष राहत होते लिव्हइनमध्ये, आता झाली लग्न करायची इच्छा अन्...  
8
'स्पिरीट'नंतर दीपिका पादुकोण 'या' बिग बजेट सिनेमातूनही बाहेर? अभिनेत्रीच्या अटींमुळे मेकर्स विचारात
9
खळबळजनक! WhatsApp वर देवाचा फोटो DP; हनीट्रॅप, हेरगिरीसाठी पाकिस्तानचं 'देसी' प्लॅनिंग
10
Vijay Mallya : "हवं तर फरार म्हणा पण चोर म्हणू नका..," विजय माल्ल्यानं 'यांची'ही मागितली माफी
11
"लग्न झालं की लाइफ सेट असंच वाटायचं, पण...", लग्नाबद्दल स्पष्टच बोलली मधुराणी, म्हणाली...
12
Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक
13
देशातील निष्पाप नागरिकांवर हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांना पोसत होते, काश्मीरमधील 'त्या' ४ जणांना होणार शिक्षा!
14
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
15
महाराष्ट्राची 'समृद्धी': देशातील सर्वांत रुंद बोगद्यातून इगतपुरी-कसारा अंतर ८ मिनिटांत
16
NIrjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कोणते पदार्थ खाऊ नये, याची आजच नोंद करून घ्या!
17
भाजपासह काँग्रेसला खिंडार; माजी खासदार, पदाधिकारी अजित पवार गटात, NCPचे घड्याळ बांधले हाती
18
राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांच्या पत्नी रात्री जेवून झोपल्या, सकाळी उठल्याच नाहीत; सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यू
19
'हाऊसफुल' फेम अभिनेत्रीने ३७व्या वर्षी गुपचूप केलं लग्न, बिजनेसमॅन आहे पती, विवाहसोहळ्याचे फोटो समोर

वेग

By admin | Updated: August 22, 2016 06:16 IST

मन आणि वास्तव व्यवहार हे एकमेकांना स्पष्ट करू शकत नाहीत. मन व्यवहार बनते आणि व्यवहार कालांतराने मनच होते.

मन आणि वास्तव व्यवहार हे एकमेकांना स्पष्ट करू शकत नाहीत. मन व्यवहार बनते आणि व्यवहार कालांतराने मनच होते. वास्तवातील उच्च प्रतीची कंपने तुम्हाला मनापर्यंत नेतात. अतिशय कमी कंपनातील मन वास्तव व्यवहाराचं दर्शन घडवतं. मन आणि वास्तवावर स्वामी विवेकानंद बोलताना हा भेद स्पष्ट करतात. ते मनच असते जे आपलं शरीर घडवते. शरीर असणे आणि घडविणे यात फरक आहे. म्हणून मनावर संस्कार करायचे. म्हणून विशेषत: मुलांबाबत वागताना त्यांच्या आणि आपल्या मनाचा विचार करावा लागतो. त्यात परिस्थिती महत्त्वाची, भवताल महत्त्वाचा.काळ बदलला तसा माणसांचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. पूर्वी मैदानी खेळ महत्त्वाचे वाटत. त्यात फक्त शरीर कमावणे एवढाच उद्देश नव्हता. मनही स्वच्छ प्रसन्न शुभ्र घडविणे महत्त्वाचे होते. सांघिक भावना महत्त्वाची होती. हे खेळ कमी झाले. आता ते आॅलिम्पिकमध्येच बघायचे आणि इतर देशांतील खेळाडूंना पदके मिळाली तर चुकचुकायचे एवढेच आपल्या हातात. एखाद्या सिंधूने मुसंडी मारली तर नाचायचे. जयजयकार करायचा. पण अशा सिंधू एवढ्या विशाल भारतात बिंदू होत आहेत हे मान्य करायला हवंय. आपल्याला अजून अंगण आहे. पण तेही हरवत चाललं आहे. मैदानं अतिक्रमित होत आहेत. बिल्डर, दलाल, माफिया यांनी देशाचं बांधकाम गिळंकृत केलं आहे. आपणही अतिक्रमणात राहू लागलो, पूररेषेत घरं बांधून नद्यांना गॅलरीतून बघू लागलो. पण कधीतरी महापूर येणारच, घरांची नासधूस होणारच. निसर्ग जसजसा आवळला जातो तसतसा तो कधीतरी उद्दाम होतोच. आपल्या जगण्याचा वेग आणि मोकळ्या हवेचा, आरोग्याचा विचार यांचं गणित जमवताना आयुष्य ओढलं जातंय हे आपल्या कधी लक्षात येणार? प्रगती झाली आणि संध्याकाळचा परवचा आणि शुभंकरोती इतिहासजमा झाले. परवा एका मित्राच्या घरी गेलो होतो. त्याची दोन मुले टीव्हीवर गेम खेळत होती. मुलगा हातातल्या रिमोटवर बटनं दाबून प्रचंड वेगाने गाडी चालवत होता. इतर गाड्यांना धडाड धडकत होता. झाडाला ढुशा मारीत होता. रेलिंग तोडत होता. आई आणि इतर टाळ्या वाजवीत होते. जेवढे जास्त अपघात तो करेल तेवढा तो पराक्रमी, शूर. मी सहज विचारले, कारे खरी गाडी अशीच चालवशील? त्याने माझ्याकडे ढुंकून न बघता अजून जोरात चालवीन असं फुशारकीने सांगितलं. गुन्हे करण्याची सवय लावणारे खेळ खेळत आपण मोठे होणार आणि ती मुले रस्त्याने कसरत करीत बाइक चालवणार.वास्तवाच्या वेगाने पछाडलेल्या आपणाला मनाचा वेग आवरा हे म्हणण्याचा काय अधिकार. बेफाम हा आयुष्याचा मंत्र होत असताना मनाला आवरा, हे बैलगाडीत बसल्यासारखेच होणार. बैल तर कधीच कत्तलखान्यात गेलेत आणि आपले ब्रेक फेल झालेत.-किशोर पाठक