शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

वेग

By admin | Updated: August 22, 2016 06:16 IST

मन आणि वास्तव व्यवहार हे एकमेकांना स्पष्ट करू शकत नाहीत. मन व्यवहार बनते आणि व्यवहार कालांतराने मनच होते.

मन आणि वास्तव व्यवहार हे एकमेकांना स्पष्ट करू शकत नाहीत. मन व्यवहार बनते आणि व्यवहार कालांतराने मनच होते. वास्तवातील उच्च प्रतीची कंपने तुम्हाला मनापर्यंत नेतात. अतिशय कमी कंपनातील मन वास्तव व्यवहाराचं दर्शन घडवतं. मन आणि वास्तवावर स्वामी विवेकानंद बोलताना हा भेद स्पष्ट करतात. ते मनच असते जे आपलं शरीर घडवते. शरीर असणे आणि घडविणे यात फरक आहे. म्हणून मनावर संस्कार करायचे. म्हणून विशेषत: मुलांबाबत वागताना त्यांच्या आणि आपल्या मनाचा विचार करावा लागतो. त्यात परिस्थिती महत्त्वाची, भवताल महत्त्वाचा.काळ बदलला तसा माणसांचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. पूर्वी मैदानी खेळ महत्त्वाचे वाटत. त्यात फक्त शरीर कमावणे एवढाच उद्देश नव्हता. मनही स्वच्छ प्रसन्न शुभ्र घडविणे महत्त्वाचे होते. सांघिक भावना महत्त्वाची होती. हे खेळ कमी झाले. आता ते आॅलिम्पिकमध्येच बघायचे आणि इतर देशांतील खेळाडूंना पदके मिळाली तर चुकचुकायचे एवढेच आपल्या हातात. एखाद्या सिंधूने मुसंडी मारली तर नाचायचे. जयजयकार करायचा. पण अशा सिंधू एवढ्या विशाल भारतात बिंदू होत आहेत हे मान्य करायला हवंय. आपल्याला अजून अंगण आहे. पण तेही हरवत चाललं आहे. मैदानं अतिक्रमित होत आहेत. बिल्डर, दलाल, माफिया यांनी देशाचं बांधकाम गिळंकृत केलं आहे. आपणही अतिक्रमणात राहू लागलो, पूररेषेत घरं बांधून नद्यांना गॅलरीतून बघू लागलो. पण कधीतरी महापूर येणारच, घरांची नासधूस होणारच. निसर्ग जसजसा आवळला जातो तसतसा तो कधीतरी उद्दाम होतोच. आपल्या जगण्याचा वेग आणि मोकळ्या हवेचा, आरोग्याचा विचार यांचं गणित जमवताना आयुष्य ओढलं जातंय हे आपल्या कधी लक्षात येणार? प्रगती झाली आणि संध्याकाळचा परवचा आणि शुभंकरोती इतिहासजमा झाले. परवा एका मित्राच्या घरी गेलो होतो. त्याची दोन मुले टीव्हीवर गेम खेळत होती. मुलगा हातातल्या रिमोटवर बटनं दाबून प्रचंड वेगाने गाडी चालवत होता. इतर गाड्यांना धडाड धडकत होता. झाडाला ढुशा मारीत होता. रेलिंग तोडत होता. आई आणि इतर टाळ्या वाजवीत होते. जेवढे जास्त अपघात तो करेल तेवढा तो पराक्रमी, शूर. मी सहज विचारले, कारे खरी गाडी अशीच चालवशील? त्याने माझ्याकडे ढुंकून न बघता अजून जोरात चालवीन असं फुशारकीने सांगितलं. गुन्हे करण्याची सवय लावणारे खेळ खेळत आपण मोठे होणार आणि ती मुले रस्त्याने कसरत करीत बाइक चालवणार.वास्तवाच्या वेगाने पछाडलेल्या आपणाला मनाचा वेग आवरा हे म्हणण्याचा काय अधिकार. बेफाम हा आयुष्याचा मंत्र होत असताना मनाला आवरा, हे बैलगाडीत बसल्यासारखेच होणार. बैल तर कधीच कत्तलखान्यात गेलेत आणि आपले ब्रेक फेल झालेत.-किशोर पाठक