शहरं
Join us  
Trending Stories
1
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
2
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
3
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
4
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
5
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
6
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
7
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
8
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
9
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
10
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
11
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
12
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
13
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
14
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
15
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
16
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
17
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
18
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
19
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
20
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त

'एक निवडणूक' कठीण खरी, पण फायद्याची!

By विजय दर्डा | Updated: December 23, 2024 07:24 IST

देशात जर एकाचवेळी निवडणुका घेतल्या गेल्या तर जीडीपीमध्ये एक ते दीड टक्क्याची वाढ होऊ शकते, असे जाणकार मानतात.

डॉ. विजय दर्डा

चेअरमन, एडिटोरियल बोर्ड लोकमत समूह

आपल्याला ही गोष्ट थोडी आश्चर्यकारक वाटेल, परंतु वास्तव असे आहे की आम्ही पत्रकार सदानकदा निवडणुकीच्या बातम्या देण्यात गुंतलेले असतो. एका राज्यातल्या विधानसभा निवडणुका संपल्या की दुसऱ्या राज्यातल्या निवडणुका येतात. त्या संपत नाही तोच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतात. १९५२ साली पहिल्यांदा निवडणूक झाली, तेव्हापासून २०२३ पर्यंत प्रत्येक वर्षी सरासरी सहा निवडणुका झाल्या. यातून पहिल्या चार निवडणुका तर काढूनच टाका; कारण १९५१-५२, १९५७, १९६२ आणि १९६७ मध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र झाल्या होत्या.

प्रत्येक निवडणुकीच्या वेळी आचारसंहिता लागते आणि त्या काळात प्रशासकीय निर्णय होत नाहीत. त्याचा भुर्दंड देशाला सोसावा लागतो. पत्रकार आणि राजकीय नेता या दोन्ही भूमिका पार पाडत असल्यामुळे मी निवडणुकांचा गुंता जवळून पाहिला आहे. यावर सर्व राजकीय पक्षांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि 'एक देश, एक निवडणूक' या विषयावर एकमत झाले पाहिजे. प्रादेशिक पक्षांचे प्रश्न असू शकतात, पण राजकीय पक्षांच्या हितापेक्षा कोणत्याही परिस्थितीत देशच मोठा असतो, हे तर सर्वांनाच मान्य करावे लागेल. 

निवडणुकांवरचा बेसुमार सरकारी खर्च आटोक्यात आणणे अत्यंत गरजेचे आहे. एकेका जागेसाठी उमेदवार पन्नास-शंभर कोटी रुपये खर्च करतात; ते वेगळेचा अधिकृत सरकारी खर्चही सतत वाढतोच आहे. हे पैसे वाचवले तर ते देशाच्या कारणी लागतील. किमान लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र झाल्या तरी देशाच्या जीडीपीत एक ते दीड टक्क्याची वाढ होऊ शकते, असे तज्ज्ञ मंडळी सांगतात.

१९५१-५२ च्या पहिल्या निवडणुकीत जवळपास १७ कोटी मतदार होते आणि साधारणतः १०.५० कोटी रुपये खर्च झाले होते. म्हणजे एका मतदारावर सरासरी ६० पैसे. १९५७ साली हा खर्च कमी होऊन प्रतिमतदार केवळ ३० पैसे झाला होता. परंतु २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत खर्चाचा आकडा प्रतिमतदार सुमारे १४०० रुपयापर्यंत पोहचला आहे. लोकसभा निवडणुकीचा खर्च केंद्र सरकार करते; तर विधानसभा निवडणुकांचा खर्च संबंधित राज्य सरकारांकडून होतो. एका वेळी निवडणुका होऊ लागल्या तर एकाच खर्चात किंवा एका निवडणुकीपेक्षा थोडे जास्त पैसे लागून दोन्ही निवडणुका होतील.

अशाप्रकारे निवडणुका घ्यावयाच्या झाल्यास मोठ्या प्रमाणावर तयारी करावी लागेल, परंतु ते काही अशक्य असे काम नाही. सध्या लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण देशात वेगवेगळ्या टप्प्यांत मतदान एकत्र घेतले जाते तर मग त्यातच विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था जोडून घेण्यात काय अडचण आहे? असे केल्यास मतदारांचा गोंधळ उडेल असे काहींना वाटते. अशा लोकांनी सजग, सतर्क अशा भारतीय मतदारांनी राजकीय गणिते उलटीपालटी करून टाकल्याच्या निवडणुकांची उदाहरणे आठवावी. 

जर एखाद्या मोठ्या राजकीय पक्षाच्या बाजूने हवा असेल तर विधानसभा निवडणुकीत आपले नुकसान होईल असे प्रादेशिक राजकीय पक्षांना वाटते. ही शंका मला मान्य नाही. कारण भारतीय मतदार केंद्र आणि राज्यांच्या बाबतीत स्वतंत्र विचार करतात. त्याचा तुमच्यावर भरवसा असेल तर तुम्हीही त्याच्यावर विश्वास ठेवा. 'तुमच्या कामगिरीवर तुमचा विश्वास नाही का?' असे मी प्रादेशिक पक्षांना विचारू इच्छितो. 

खरेतर भारतासारख्या देशात 'एक देश, एक निवडणूक' हे काही आश्चर्य नव्हे. प्रारंभी निवडणुका एकत्रच होत असत. नंतर राजकीय उलथापालथी, आयाराम- गयारामच्या भानगडीत अनेक राज्य सरकारे गडगडली आणि विधानसभेच्या निवडणुका वेगळ्या वेळेला होऊ लागल्या. या समस्येला राजकीय पक्षच जबाबदार आहेत, तर उत्तरही त्यांनाच शोधावे लागेल. एकत्र निवडणुका घेतल्या जातात अशा अनेक देशांची उदाहरणे देता येतील. अमेरिकेचेच उदाहरण घ्यावयाचे तर तेथे राष्ट्रपती, काँग्रेस आणि सिनेटसाठी केवळ एकत्रच नव्हे तर दर चार वर्षांनी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी एकत्र निवडणूक होते. फ्रान्समध्ये दर पाच वर्षांनी राष्ट्रपती आणि नॅशनल असेम्ब्लीसाठी एकत्र निवडणुका होतात. स्वीडनमध्ये तर संसद, नगरपालिका आणि कौंटी परिषदांसाठी एकत्र निवडणुका होत असतात. कॅनडा, जर्मनी, दक्षिण आफ्रिका, फिलिपाइन्स आणि इंडोनेशियामध्येही एकत्र निवडणुका घेतल्या जातात.

भारतात एकत्र निवडणूक घेण्याचा विषय आता संयुक्त संसदीय समितीकडे पोहोचला आहे, या विषयावर सकारात्मक निर्णय होणे ही काळाची गरज आहे. उपलब्ध तंत्रज्ञानाच्या मदतीने अडचणींवर मार्ग काढता येतील. हे काम सुरुवातीला कठीण असले, तरी पुढे त्याला लय मिळेल, व्यवस्था उभी राहील. शिवाय फायदे तर पुष्कळच आहेत.

काही लोक म्हणतात, की ईव्हीएममध्ये फेरफार करता येऊ शकतात, पण मतपत्रिकांच्या वेळीही घोटाळे होतच होते. लोकशाही तरी कुठे 'फुलप्रूफ' आहे? माझे स्पष्ट मत आहे, की एका पक्षाने काही चांगली योजना मांडली; तर तिचे स्वागत झाले पाहिजे. विरोधासाठी विरोध ही भूमिका असता कामा नये. अविश्वासाचे धुके जितके गडद होत जाईल, लोकशाहीसाठी ते तितकेच घातक ठरेल. 

टॅग्स :One Nation One Electionवन नेशन वन इलेक्शनElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगNarendra Modiनरेंद्र मोदी