शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

चराचरांतील पांडुरंगाची प्रचिती घेणारी अमेरिकेतील वारी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 08:26 IST

अमेरिकेत अनेक शहरांत वारकरी जोडले गेले आहेत. पंढरपूर यात्रा काळात हे वारकरी आपापल्या शहरात विठुनामाच्या गजरात रोज पाच मैल चालतात!

प्राजक्ता पाडगावकर, अटलांटास्थित वारकरी

पांडुरंग चराचरांत आहे, झाडात, पाना-फुलांत आहे हा दृढ विश्वास मनात ठेवून गेली चार वर्षे महाराष्ट्राबाहेर, भारताबाहेर निसर्गवारी सुरू आहे। कोविड काळात महाराष्ट्रात वारकरी चालू शकत नव्हते, तेव्हा तो वारसा पुढे नेण्याच्या दृष्टीने हा उपक्रम सुरू झाला। दूरदेशी वसलेल्या, विठ्ठलभक्तांसाठी ही पर्वणी ठरली. अमेरिकेत अटलांटा येथे निसर्गवारी सुरू केल्यानंतर तिला भरभरून प्रतिसाद मिळाला. पहिल्याच वर्षी जवळजवळ १५० वारकरी मिळून एका महिन्यात १०,००० मैल इतके अंतर चालले. आता यात अमेरिकेतील इतर अनेक शहरांतून वारकरी जोडले गेले आहेत. कॅन्सस सिटी, शार्लेट, वे एरिया, युटाह आणि अमेरिकेबाहेर लंडन, बर्लिन इथूनदेखील मंडळी चालतात. हळूहळू हा उपक्रम अनेक शहरांत रुजू लागला आहे।

मूळ वारीच्या संकल्पनेपेक्षा ही थोडी निराळी वारी आहे. देहू ते पंढरपूर हे अंतर साधारण १५५ मैल इतके असून, वारकरी हे अंतर २१ दिवसांत पूर्ण करतात. इथे अमेरिकेत आणि इतरत्र हे अंतर एका महिन्यात पूर्ण करतात.

स्वतःच्या घरापाशी अथवा कुठेही दररोज साधारण पाच मैल इतके चालून, त्याची एका सामूहिक गुगल स्प्रेडशीटवर रोज नोंद ठेवली जाते. तसेच रोज प्रत्येक वारकऱ्याला ई-मेल आणि व्हॉट्सअॅपद्वारे एक निरूपण, एक अभंग पाठवला जातो. पाच मैल चालायला साधारण एक तास चाळीस मिनिटे लागतात. तेवढ्या वेळेची अभंगांची प्लेलिस्ट जिओ सावन आणि स्पोटिफायवरून वारकऱ्यांना पाठवली जाते, जेणेकरून एकटे चालतानादेखील कानात विठुनामाचा गजर सुरू राहील. प्रत्येक शहराच्या व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारा वारकरी जोडले जातात.निसर्गवारीचा उद्देश पंढरपूर गाठणे नसून, चराचरांत पांडुरंगाची प्रचिती घेत राहणे, निसर्गाशी तादात्म्य राखणे असा आहे। त्या अनुषंगाने वारकरी रोज चालताना एखादा सुंदर सूर्योदय, सूर्यास्त कॅमेऱ्यात बंदिस्त करतात, तर कधी एखादा सुंदर सूर्योदय, सूर्यास्त कॅमेऱ्यात बंदिस्त करतात, तर कधी एखादा पक्षी, हरिण किंवा झाड! कुठेही जिथे निसर्गातील किमया बघून मनात आनंद, कुतूहल अथवा कृतज्ञता दाटून आली, तोच क्षण पांडुरंगाचा, त्याच्या प्रचितीचा असे आम्ही सर्व निसर्ग वारकरी मानतो!

चालण्याचा उद्देश वजन घटवणे, व्यायाम करणे, कोणत्याही धाकाने अथवा भीतीने चालणे असा नसून, निसर्गाकडे कृतकृत्य होऊन बघणे, आपण निसर्गाचा एक घटक आहोत अशा भावनेने निसर्गात वावरणे, त्यातील दैवी शक्तीची अनुभूती घेणे, निसर्गाला शरण जाणे हा हेतू आहे. दरवर्षी अनेक वारकरी इथल्या बागा, जंगलं, अभयारण्ये आणि नॅशनल पार्कस् येथे चालतात, सभोवतालच्या निसर्गात स्वतःला पूर्णपणे सामावून घेतातः निसर्गात रमतात!

वारीच्या शेवटच्या दिवशी, आषाढी एकादशीला सगळे मिळून एक मैल एकत्रित चालताना मात्र अगदी मूळ वारीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही, मंडळी पारंपरिक वेशांत, डोक्यावर पांडुरंगाची मूर्ती घेऊन, तुळशी घेऊन चालतात, विठुनामाचा गजर करत, टाळ चिपळ्यांच्या ठेक्यावर नाचत तल्लीन होतात। मग स्थानिक झाडांची निवड करून वृक्षारोपण करतात, जेणेकरून सर्वांना पांडुरंग येणारी अनेक वर्षे निसर्गात भेटू शकेल! दरवर्षी नवीन कलाकार स्वतःची कला सादर करत, भजन, अभंग सादर करतात आणि संपूर्ण परिसर विठ्ठलमय होऊन जातो। अगदी काही महिन्याचे तान्हे बाळ आणि त्याला बावागाडीतून घेऊन निसर्गात चालणारी त्याची आई, ते पार नव्वदी गाठलेले आजोबा-आजी असे सगळेच वारीत सामील होतात!

पाऊस अथवा वादळ असेल तेव्हा अनेक जण घरातल्या घरातही चालतात। सातत्य आणि भक्ती महत्त्वाची! यात कोणत्याही कर्मकांडाचा अंतर्भाव नाही, त्यामुळे वारीची लहानपणीची आठवण असलेली इतर धर्माची, भाषेची माणसेही या वारीत सामील होतात. अशी ही अनोखी निसर्गवारी, दूरदेशी असलेल्या विठ्ठलभक्तांना या अनोख्या सोहळ्यात समाविष्ट करून घेते!

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी