शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘तुम्ही’ कितीही काड्या लावा, ‘आम्ही’ पेटणार नाही... 

By अतुल कुलकर्णी | Updated: May 7, 2022 06:13 IST

राजकीय नेत्यांचे आग भडकावण्याचे प्रयत्न यावेळी सामान्य माणसांनी हाणून  पाडले. धार्मिक सलोखा बिघडला तर आपणच उघड्यावर येतो; हे लोकांना कळले आहे!

अतुल कुलकर्णी,संपादक, लोकमत, मुंबई

“आजवर झालेल्या दंगलींनी आम्हाला खूप काही शिकवलं आहे. त्यावेळी झालेल्या जखमा, गमावलेली माणसं आम्ही आजही विसरलेलो नाही. तुमच्या राजकारणासाठी आमचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका. कोरोनामुळे तसेही आम्ही प्रचंड अडचणीत आहोत. जातीय, धार्मिक तेढ निर्माण करून आमच्या उरल्यासुरल्या धंद्यांवर पाणी फिरवू नका...” -  मुंबईतील एक व्यापारी गृहस्थ सांगत होते. नाव लिहीत नाही कारण लगेच जात-धर्माचे  हिशेब होणार! 

गेल्या काही दिवसांपासून राज्यात चाललेल्या गदारोळामुळे सामान्य माणूस उद्विग्न झाला आहे. याआधी  धार्मिक तेढ निर्माण करणारे मुद्दे आले, त्या त्या वेळी कधी या बाजूने तर कधी त्या बाजूने दगडफेक, तणाव असे प्रकार सर्रास झाले.  ही पहिली वेळ होती ज्यावेळी अवघ्या महाराष्ट्रात  पक्षीय मतभेद झुगारून लोकांनीच धार्मिक सलोखा राखण्यासाठी सक्रिय पुढाकार घेतला.

औरंगाबाद शहरात हिंदू-मुस्लीम व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन गणपतीची आरती केली. रमजान ईद निमित्त एकमेकांना मिठाई भरवली. लाडसावंगी गावात हनुमान मंदिर कलश मिरवणुकीवर मुस्लीम बांधवांनी पुष्पवृष्टी केली. सांगली जिल्ह्यात ब्राह्मण समाजाने काढलेल्या परशुराम जयंतीच्या मिरवणुकीवर आणि शिवसेनेने काढलेल्या मिरवणुकीत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर मशिदीच्या मनोऱ्यावरून पुष्पवृष्टी करण्यात आली.  शिर्डीतील साई मंदिराचे ध्वनिक्षेपक सुरू करावे अशी मागणी शिर्डीतल्या मुस्लीम समाजाने केली. एका समाजाच्या मिरवणुकीत, दुसऱ्या समाजाने येऊन सरबते-पाण्याचे वाटप केले... या घटना टोकाच्या विखारी वातावरणात माणुसकीचा गहिवर दाखवणाऱ्या होत्या.

राज्यातील एकोपा आणि सामंजस्य टिकविण्याचे काम सर्वसामान्य नागरिकांनी कोणत्याही दबावाला न घाबरता पुढे येऊन केले. ही गोष्ट दिसते तेवढी सोपी नक्कीच नाही. तुम्ही आम्हाला एवढे गृहीत का धरता? यावरूनच लोकांमध्ये सर्वपक्षीय राजकारण्यांबद्दल तीव्र संताप आहे. 

मुंबईत अत्तर विकणारा एक दुकानदार हताशपणे सांगत होता, माझ्या अत्तराचा सुगंध जात-धर्म बघून कमी-जास्त होत नाही. दोन्ही समाजाचे लोक माझे अत्तर नेतात. त्यांच्या आनंदामुळे माझा व्यवसाय एवढी वर्षे टिकून आहे. त्याला नजर लावण्याचा अधिकार या राजकीय नेत्यांना दिला कोणी..? याचे उत्तर आज तरी कोणत्याही राजकीय पक्षाकडे नाही. 

मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसाचा वाद  शिगेला पोहोचलेला असताना महाराष्ट्रातून आलेल्या शेतकऱ्यांनी मुंबईत मंत्रालयाच्या प्रवेशद्वारापासून, महात्मा गांधींच्या पुतळ्यापर्यंत शांती मार्च काढला. गांधीजींच्या पुतळ्यासमोर  ‘शेतकरी चालिसा’ वाचली. “राजकीय भोंगे बंद करायला सांगा आणि आमचे प्रश्न सोडवण्याची सुबुद्धी द्या”, असे साकडे त्यांनी महात्मा गांधींना घातले. लोक मंदिरापुढे महाआरती करत आहेत, आम्ही मात्र शेतकऱ्यांच्या वेदनांची महाआरती मंत्रालयाच्या दारासमोर उभे राहून म्हणत आहोत, असे  माजी आमदार विनायकराव पाटील उद्विग्नपणे म्हणाले, तेव्हा  त्यांना पोलीस व्हॅनमध्ये नेण्यासाठी उभा असलेला पोलीसही चार पावले मागे सरकला...!

- ही साथ महाराष्ट्रभर पसरली तर याच राजकारण्यांची काय अवस्था होईल हा प्रश्न आज एकाही नेत्याच्या मेंदूला स्पर्श करताना दिसत नाही. समाजा-समाजात तेढ निर्माण करण्यासाठी धर्माच्या गोळीचा अचूक उपयोग होतो. हे वर्षानुवर्षे सिद्ध होत आले आहे. याच इतिहासातून माणसं बोध घेतात... चार हिताच्या गोष्टी शिकतात... हे गेल्या आठवडाभरातल्या घटनांवरून स्पष्ट झाले आहे. लोकांना धार्मिक विद्वेष नको आहे. दंगली नको आहेत. त्यामुळे कसे नुकसान होते हे त्यांनी अनुभवलेले आहे. महागाईने कंबरडे मोडलेला मध्यमवर्गीय आणि गरीब माणूस  चांगल्या आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात, मुलाबाळांना बऱ्यापैकी शिक्षण मिळावे, कुठेतरी नोकरी मिळावी यासाठी जीवतोड मेहनत करत असतो.  धार्मिक तेढ निर्माण झाली तर आपल्या आयुष्यभराच्या कमाईवर पाणी फिरणार आहे, हे तो अनुभवातून शिकला आहे.  त्यामुळेच इतकी माथी भडकाविण्याचे प्रयत्न झाले; पण लोक शांत राहिले. 

जे कोणी विद्वेषाचे राजकारण करू पाहत आहेत त्यांना ही मोठी शिकवण आहे. यातूनही कुणी बोध घ्यायला तयार नसतील, तर धर्माच्या नावावर राजकारण करू पाहणारे देश आज कुठे आहे..? याचा इतिहास  साक्षीला आहेच.

टॅग्स :Politicsराजकारण