शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

मराठीत बोला

By admin | Updated: February 26, 2017 23:24 IST

आज २७ फेब्रुवारी. कुसुमाग्रजांचा वाढदिवस. तात्यासाहेब आपल्यातून जाऊन १६ वर्षे झालीत.

आज २७ फेब्रुवारी. कुसुमाग्रजांचा वाढदिवस. तात्यासाहेब आपल्यातून जाऊन १६ वर्षे झालीत. त्यांची स्मृती येत नाही असा दिवस नसतो आणि आज जागतिक मराठी दिनही आपण करतोय. म्हणजे काय करायचं? आपल्याच मराठीची आपण आठवण काढायची, आपली मराठी किती लाघवी आहे, प्रभावी आहे, प्रखर आहे आणि आपली आई आहे हे म्हणायचं. पण आपली सध्याची तरुण पिढी किती मानते? मध्यंतरी यूपीएससीचे निकाल लागले. एका खेडेगावातील मुलाने ठरवून ही परीक्षा दिली आणि तो पास झाला. त्याला बाहेरचे कुठलेच क्लास नव्हते. इंग्रजीचा बागुलबुवा नव्हता. महागडे कपडे घालून सजविलेला डामडौल नव्हता. तो तोंडी परीक्षेला गेला, तेही चपला घालून. त्याचं कौतुक पेपरात आलं. आपण ते वाचलं. विसरून गेलो. पुन्हा आईबाप मुलाच्या बुटांचे बंद बांधायला मोकळे झाले. आपल्याला हे कधी आणि केव्हा पटणार की आपणच वाढविलेला हा रोग आहे. इकडे इंग्रजीचं अवसान वाढतंय म्हणून मराठीचा आपण जयजयकार करायचा. प्रथम आपल्या कळकट मराठी शाळा आपण सुधारायला हव्यात. माणसांना स्वत:ला जर मराठीची जाणीव नसेल तर तो ती बोलणार नाही. अंगीकारणार नाही. पुन्हा गर्वाने आपण सांगणार पुढील दहा-वीस वर्षांत मराठी शाळा बंद पडणार ! फक्त इंग्रजीच शाळा राहतील. मुलं घरी येतील. मुलगा काळजीने होमवर्क करायला बसेल आणि आईबाबा त्याच्या पुस्तकातल्या भाज्या, फुलं, फळं कुठे मिळतील हे पाहत राहतील, कारण ती परदेशातील हवामानातली. आपल्या इथे कुठे पिकणार? जिथे पिकत नाही तिथे हे विकलं जातं. आपल्याला अंधानुकरण फार आवडतं. म्हणून तर मराठी पुस्तक वाचणं कमअस्सल वाटतं. चेतन भगत आपल्याला पटतो कारण ज्या गोष्टी शिक्षक आपल्या कानीकपाळी ओरडून मराठीत सांगतात त्या गोष्टी चेतन व्यवस्थित इव्हेंट मॅनेजमेंट करून सांगतो. आपल्याला ते पटतं. माझा पोरगा छानछोकीत वाढला पाहिजे, दिसला पाहिजे हे महत्त्वाचं! त्याला मिळणारं ज्ञान कसं मिळतं ते आपण पाहत नाही. हे बघा मरेपर्यंत आई कुणीच विसरत नाही कारण ती आपल्याला घडवते म्हणून! तशी ही मराठी जन्मापासून आपण जपली पोसली, वर्धमान केली तर केवळ एक दिवसाचे स्मरण पुरेसे नाही. श्यामची आई किती वर्ष राहिली? अजून आहे ना? राहील. आपण विश्वासाने मराठीत एक पाऊल टाकू या. त्यासाठी बुद्धिमानांनी एक काम करा विज्ञान आणि तंत्रज्ञान मराठीत कसे येईल ते बघावे. यासाठी आपणच शासनाच्या मागे लागून हे काम करायला हवे. शासन करीत नाही असे नाही. आपण पुरेसे मागे लागत नाही. सदैव होकारार्थी दृष्टिकोन, ठेवून बोलायला हवे, मग एक दिवसापुरता ‘मराठीत बोला’ म्हणण्याची गरज नाही, सदैवच लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ! या मराठी भाषेचे आपण कृतज्ञ उतराई होऊ !-किशोर पाठक