शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

मराठीत बोला

By admin | Updated: February 26, 2017 23:24 IST

आज २७ फेब्रुवारी. कुसुमाग्रजांचा वाढदिवस. तात्यासाहेब आपल्यातून जाऊन १६ वर्षे झालीत.

आज २७ फेब्रुवारी. कुसुमाग्रजांचा वाढदिवस. तात्यासाहेब आपल्यातून जाऊन १६ वर्षे झालीत. त्यांची स्मृती येत नाही असा दिवस नसतो आणि आज जागतिक मराठी दिनही आपण करतोय. म्हणजे काय करायचं? आपल्याच मराठीची आपण आठवण काढायची, आपली मराठी किती लाघवी आहे, प्रभावी आहे, प्रखर आहे आणि आपली आई आहे हे म्हणायचं. पण आपली सध्याची तरुण पिढी किती मानते? मध्यंतरी यूपीएससीचे निकाल लागले. एका खेडेगावातील मुलाने ठरवून ही परीक्षा दिली आणि तो पास झाला. त्याला बाहेरचे कुठलेच क्लास नव्हते. इंग्रजीचा बागुलबुवा नव्हता. महागडे कपडे घालून सजविलेला डामडौल नव्हता. तो तोंडी परीक्षेला गेला, तेही चपला घालून. त्याचं कौतुक पेपरात आलं. आपण ते वाचलं. विसरून गेलो. पुन्हा आईबाप मुलाच्या बुटांचे बंद बांधायला मोकळे झाले. आपल्याला हे कधी आणि केव्हा पटणार की आपणच वाढविलेला हा रोग आहे. इकडे इंग्रजीचं अवसान वाढतंय म्हणून मराठीचा आपण जयजयकार करायचा. प्रथम आपल्या कळकट मराठी शाळा आपण सुधारायला हव्यात. माणसांना स्वत:ला जर मराठीची जाणीव नसेल तर तो ती बोलणार नाही. अंगीकारणार नाही. पुन्हा गर्वाने आपण सांगणार पुढील दहा-वीस वर्षांत मराठी शाळा बंद पडणार ! फक्त इंग्रजीच शाळा राहतील. मुलं घरी येतील. मुलगा काळजीने होमवर्क करायला बसेल आणि आईबाबा त्याच्या पुस्तकातल्या भाज्या, फुलं, फळं कुठे मिळतील हे पाहत राहतील, कारण ती परदेशातील हवामानातली. आपल्या इथे कुठे पिकणार? जिथे पिकत नाही तिथे हे विकलं जातं. आपल्याला अंधानुकरण फार आवडतं. म्हणून तर मराठी पुस्तक वाचणं कमअस्सल वाटतं. चेतन भगत आपल्याला पटतो कारण ज्या गोष्टी शिक्षक आपल्या कानीकपाळी ओरडून मराठीत सांगतात त्या गोष्टी चेतन व्यवस्थित इव्हेंट मॅनेजमेंट करून सांगतो. आपल्याला ते पटतं. माझा पोरगा छानछोकीत वाढला पाहिजे, दिसला पाहिजे हे महत्त्वाचं! त्याला मिळणारं ज्ञान कसं मिळतं ते आपण पाहत नाही. हे बघा मरेपर्यंत आई कुणीच विसरत नाही कारण ती आपल्याला घडवते म्हणून! तशी ही मराठी जन्मापासून आपण जपली पोसली, वर्धमान केली तर केवळ एक दिवसाचे स्मरण पुरेसे नाही. श्यामची आई किती वर्ष राहिली? अजून आहे ना? राहील. आपण विश्वासाने मराठीत एक पाऊल टाकू या. त्यासाठी बुद्धिमानांनी एक काम करा विज्ञान आणि तंत्रज्ञान मराठीत कसे येईल ते बघावे. यासाठी आपणच शासनाच्या मागे लागून हे काम करायला हवे. शासन करीत नाही असे नाही. आपण पुरेसे मागे लागत नाही. सदैव होकारार्थी दृष्टिकोन, ठेवून बोलायला हवे, मग एक दिवसापुरता ‘मराठीत बोला’ म्हणण्याची गरज नाही, सदैवच लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ! या मराठी भाषेचे आपण कृतज्ञ उतराई होऊ !-किशोर पाठक