शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

मौन

By admin | Updated: April 3, 2017 23:56 IST

भारतीय संस्कृतीमध्ये ‘मौन’ ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण साधना मानली गेली आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये ‘मौन’ ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण साधना मानली गेली आहे. मौन या शब्दापासूनच ‘मुनि’ शब्द तयार झालेला आहे. ज्याने मौन साध्य केले, तो मुनि झाला. ज्यांनी मौनाला प्राप्त केले, त्यांना परमानंद प्राप्त झाला, असे जाणकारांचे मानणे आहे. मौन आपल्या मनाची अशी अवस्था आहे, जेव्हा आपले मन पूर्णत: शांत होते व सर्व विचार-प्रवाह क्षीण झालेले असतात. विचार-प्रवाह थांबल्याबरोबर साधकाला आपल्या मूळ स्वरूपाची माहिती होते व त्याला परमानंदाची प्राप्ती होते. मन जेवढे गतिमान राहील, तेवढीच अस्वस्थता आणखी वाढते. शेवटी मन जेव्हा शांत होते, तेव्हाच व्यक्तीला चांगले वाटते. जेव्हा विचाराचा प्रवाह अनियंत्रित होतो, त्यावेळी अस्वस्थता थांबविण्यासाठी चिकित्सक औषधांचा उपयोग करतात. निद्रावस्थेत मानवाला विश्रांती मिळते, कारण त्यावेळी त्याचे मन पूर्णत: शांत असते. मनाची विशेषता ही आहे की ते सतत गतिमान असते. आपण त्याला जेवढे दाबण्याचा प्रयत्न करतो तेवढे ते अनियंत्रित होते. एका क्षणातच आपल्या मनात हजारो विचार येतात. मनात उठणाऱ्या या विचारांचे जेव्हा आपण आकलन करतो, तेव्हा असे वाटते की हे सर्व विचार भूतकाळाशी संबंधित आहेत किंवा भविष्यकाळाशी. भूतकाळ किंवा भविष्यकाळाच्या विचाराने काळजी किंवा तणाव उत्पन्न होतो. भूतकाळ समाप्त झाला व भविष्यकाळ अद्याप यायचा आहे. शेवटी हे दोन्ही आपल्या हातात नाही. अर्थातच भूतकाळात घडून गेलेल्या घटनांना आपण काहीही करू शकत नाही, त्याचप्रमाणे भविष्यात होणाऱ्या घटनासुद्धा आपल्या आवाक्यात नसतात. म्हणूनच आपण कुठलेही क्रियात्मक काम वतर्मानकाळात करू शकतो. आपण जसे आपले मन भूतकाळ व भविष्यकाळापासून दूर करून वर्तमान काळावर केंद्रित करतो, तसे मौन धारण करतो. गरज नसताना बोलल्याने ऊर्जेचा नाश होतो आणि याच कारणामुळे आपल्याकडे मौनव्रताचे महत्त्व विशद केले आहे. सप्ताहातून एक दिवस मौन पाळले तर आपले मन अंतर्मुख होते व मौन साध्य करणे सोपे जाते. याशिवाय अन्नाचा खूप मोठा प्रभाव आपल्या मनावर होत असतो. अर्थातच मौनासाठी अन्न खूप उपयुक्त ठरते, जे शरीराला ऊर्जा तर देतेच; परंतु उत्तेजना निर्माण करत नाहीत. ‘ध्यान’ आपल्या मनाला शांत करून मौन प्राप्त करण्याचा सर्वोत्तम विधी आहे. आपण कुठल्याही विधीनुसार मौन साध्य करू शकतो. ध्यान सर्वप्रथम आपल्या मनाला शांत करते. जेव्हा शरीर शांत व शिथिल होते, तेव्हा श्वासाची गतीही मंद होते. श्वासाची गती मंद झाल्यामुळे आपले विचार-प्रवाहसुद्धा थांबतात. या अवस्थेतच मौन प्राप्त होते व साधक सोऽहम् बनतो. -डॉ. भूषणकुमार उपाध्याय