शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
6
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
7
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
10
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
11
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
12
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
13
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
14
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
15
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
16
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
17
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
18
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
20
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा

मधुमेहाचे दुष्परिणाम

By admin | Updated: February 28, 2016 02:53 IST

मधुमेहामुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांविषयी जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. ज्या रुग्णांची रक्तातील साखरेची पातळी सदैव अनियंत्रित असते, अशा रुग्णांना मधुमेहामुळे

(आरोग्याच्या कानामात्रा)- डॉ. व्यंकटेश शिवणेमधुमेहामुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांविषयी जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. ज्या रुग्णांची रक्तातील साखरेची पातळी सदैव अनियंत्रित असते, अशा रुग्णांना मधुमेहामुळे होणाऱ्या दुष्परिणामांचा धोका अधिक असतो. कित्येक वर्षांच्या संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, ज्या लोकांचा मधुमेह सदैव नियंत्रणात असतो, त्यांना हे दुष्परिणाम कमी प्रमाणात होतात. सर्वसाधारण मधुमेहामुळे हृदयविकार, पक्षाघात, डोळ्यांना अंधत्व येणे. पायाच्या संवेदना बधिर होणे, मूत्रपिंड निकामी होणे, पायांच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या निर्माण होऊन पायाला जंतुसंसर्ग होणे, यांसारखे दुष्परिणाम होतात.हृदयविकारमधुमेहामध्ये हृदयविकाराची शक्यता ५ ते ७ पटीने अधिक असते. जर मधुमेही धूम्रपान करणारा असेल तर ही शक्यता आणखीनच वाढते. मधुमेहींतील हृदयविकार हा इतर हृदयविकारांपेक्षा वेगळा असतो. हृदयाच्या एकापेक्षा जास्त रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या तयार होतात. शक्यतो यात दुखणे जाणवत नाही. म्हणूनच अनेकदा ते लक्षात येत नाही. हृदयविकार टाळण्याकरिता जेवणात मेदाचे प्रमाण कमी असावे. मद्यपान, धूम्रपान वर्ज्य करावे व डॉक्टरांच्या सल्ल्याने अ‍ॅस्परीन व कोलेस्ट्रॉल नियंत्रणात असणाऱ्या गोळ्या नियमित चालू ठेवाव्यात. वर्षातून किमान एकदातरी हृदयाची तपासणी करणे आवश्यक आहे; तसेच रक्तातील चरबीचे प्रमाणही नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. डोळ्यांना अंधत्व येणेमधुमेही रुग्णांमध्ये डोळ्यांच्या मागच्या पडद्यावर परिणाम होतो. ज्यामुळे या पडद्यावर रक्तस्राव होऊन तो दुभंगला जाऊ शकतो; परिणामी आयुष्यभर अंधत्व येऊ शकते. कमी वयामध्ये मोतीबिंंदूची शक्यताही अधिक असते. म्हणूनच वर्षातून किमान एक वेळा डोळ्यांची पूर्ण तपासणी करणे आवश्यक असते. भारतामध्ये अंधत्वाच्या कारणांमध्ये मधुमेहामुळे येणाऱ्या अंधत्वाचे प्रमाण खूप जास्त आहे.मधुमेह आणि मूत्रपिंडमूत्रपिंडाचे मुख्य काम रक्त शुद्ध करणे आहे. मधुमेहाचे प्रमाण खूप जास्त वाढले किंवा तो अनियंत्रित असेल तर मूत्रपिंंडातून शरीरातील प्रथिने लघवीवाटे बाहेर फेकली जातात. ज्यामुळे मूत्रपिंड हळूहळू निकामी होत जाते. रक्तदाब असणाऱ्या मधुमेही रुग्णांमध्ये याचे प्रमाण खूप आहे. याचा प्रतिबंध करण्यासाठी मिठाचा वापर कमी करावा. मूत्रपिंड पूर्णत: निकामी झाले तर डायलेसिसवर जावे लागते. भारतात डायलेसिस घेणाऱ्या रुग्णांमध्ये मधुमेही रुग्णांची संख्या सर्वांत जास्त आहे. वर्षातून एकदा तरी मूत्रपिंडाची तपासणी करणे आवश्यक आहे.मधुमेह आणि पायमधुमेही रुग्णांमध्ये रक्तातील साखर वाढल्यामुळे पायांच्या संवेदना बधिर होतात. पायांना सुन्नपणा येणे, पायांची जळजळ होणे किंवा पायात गोळे येणे यांसारखी लक्षणे उद्भवतात. ही संवेदना कमी झाल्यामुळे पायाला एखादी जखम झाली तरी आपल्याला दुखत नाही. त्यामुळे झालेली जखम चटकन लक्षात येत नाही. परिणामी, जंतुसंसर्ग होतो व पायाची बोटे किंवा कित्येक वेळा पायही कापावा लागतो. मधुमेहामुळे पायाला होणाऱ्या अंपगत्वाचे प्रमाण भारतात अधिक आहे. म्हणूनच वर्षातून किमान एक वेळा तरी पायाची तपासणी करणे आवश्यक आहे.पक्षाघात : मधुमेही रुग्णांमध्ये मेंदूमध्ये रक्तस्राव होणे किंवा हृदयाच्या गुठळ्या तयार होण्याची शक्यता जास्त असते. अशा रुग्णांना शरीराच्या एका भागामध्ये लकवा मारला जातो व शरीर अधू होते. याचा प्रतिबंध करण्यासाठी मधुमेह, रक्तदाब नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते.इतर दुष्परिणाम : मधुमेहामुळे वारंवार जंतुसंसर्ग होणे, क्षयरोगाचे प्रमाण वाढणे, लघवीच्या जागी होणारा जंतुसंसर्ग, पुरुषांमध्ये जननेंद्रियात येणारी शिथिलता, नैराश्य, चिडचिडेपणा, स्थूल मधुमेही स्त्रियांमध्ये पाळीमध्ये होणारा त्रास किंवा गर्भाशयाच्या तक्रारी, स्थूल मधुमेही रुग्णामध्ये होणारे यकृताचे आजार हेही गंभीर दुष्परिणाम दिसून येतात.