शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मधुमेहाचे दुष्परिणाम

By admin | Updated: February 28, 2016 02:53 IST

मधुमेहामुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांविषयी जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. ज्या रुग्णांची रक्तातील साखरेची पातळी सदैव अनियंत्रित असते, अशा रुग्णांना मधुमेहामुळे

(आरोग्याच्या कानामात्रा)- डॉ. व्यंकटेश शिवणेमधुमेहामुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांविषयी जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. ज्या रुग्णांची रक्तातील साखरेची पातळी सदैव अनियंत्रित असते, अशा रुग्णांना मधुमेहामुळे होणाऱ्या दुष्परिणामांचा धोका अधिक असतो. कित्येक वर्षांच्या संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, ज्या लोकांचा मधुमेह सदैव नियंत्रणात असतो, त्यांना हे दुष्परिणाम कमी प्रमाणात होतात. सर्वसाधारण मधुमेहामुळे हृदयविकार, पक्षाघात, डोळ्यांना अंधत्व येणे. पायाच्या संवेदना बधिर होणे, मूत्रपिंड निकामी होणे, पायांच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या निर्माण होऊन पायाला जंतुसंसर्ग होणे, यांसारखे दुष्परिणाम होतात.हृदयविकारमधुमेहामध्ये हृदयविकाराची शक्यता ५ ते ७ पटीने अधिक असते. जर मधुमेही धूम्रपान करणारा असेल तर ही शक्यता आणखीनच वाढते. मधुमेहींतील हृदयविकार हा इतर हृदयविकारांपेक्षा वेगळा असतो. हृदयाच्या एकापेक्षा जास्त रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या तयार होतात. शक्यतो यात दुखणे जाणवत नाही. म्हणूनच अनेकदा ते लक्षात येत नाही. हृदयविकार टाळण्याकरिता जेवणात मेदाचे प्रमाण कमी असावे. मद्यपान, धूम्रपान वर्ज्य करावे व डॉक्टरांच्या सल्ल्याने अ‍ॅस्परीन व कोलेस्ट्रॉल नियंत्रणात असणाऱ्या गोळ्या नियमित चालू ठेवाव्यात. वर्षातून किमान एकदातरी हृदयाची तपासणी करणे आवश्यक आहे; तसेच रक्तातील चरबीचे प्रमाणही नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. डोळ्यांना अंधत्व येणेमधुमेही रुग्णांमध्ये डोळ्यांच्या मागच्या पडद्यावर परिणाम होतो. ज्यामुळे या पडद्यावर रक्तस्राव होऊन तो दुभंगला जाऊ शकतो; परिणामी आयुष्यभर अंधत्व येऊ शकते. कमी वयामध्ये मोतीबिंंदूची शक्यताही अधिक असते. म्हणूनच वर्षातून किमान एक वेळा डोळ्यांची पूर्ण तपासणी करणे आवश्यक असते. भारतामध्ये अंधत्वाच्या कारणांमध्ये मधुमेहामुळे येणाऱ्या अंधत्वाचे प्रमाण खूप जास्त आहे.मधुमेह आणि मूत्रपिंडमूत्रपिंडाचे मुख्य काम रक्त शुद्ध करणे आहे. मधुमेहाचे प्रमाण खूप जास्त वाढले किंवा तो अनियंत्रित असेल तर मूत्रपिंंडातून शरीरातील प्रथिने लघवीवाटे बाहेर फेकली जातात. ज्यामुळे मूत्रपिंड हळूहळू निकामी होत जाते. रक्तदाब असणाऱ्या मधुमेही रुग्णांमध्ये याचे प्रमाण खूप आहे. याचा प्रतिबंध करण्यासाठी मिठाचा वापर कमी करावा. मूत्रपिंड पूर्णत: निकामी झाले तर डायलेसिसवर जावे लागते. भारतात डायलेसिस घेणाऱ्या रुग्णांमध्ये मधुमेही रुग्णांची संख्या सर्वांत जास्त आहे. वर्षातून एकदा तरी मूत्रपिंडाची तपासणी करणे आवश्यक आहे.मधुमेह आणि पायमधुमेही रुग्णांमध्ये रक्तातील साखर वाढल्यामुळे पायांच्या संवेदना बधिर होतात. पायांना सुन्नपणा येणे, पायांची जळजळ होणे किंवा पायात गोळे येणे यांसारखी लक्षणे उद्भवतात. ही संवेदना कमी झाल्यामुळे पायाला एखादी जखम झाली तरी आपल्याला दुखत नाही. त्यामुळे झालेली जखम चटकन लक्षात येत नाही. परिणामी, जंतुसंसर्ग होतो व पायाची बोटे किंवा कित्येक वेळा पायही कापावा लागतो. मधुमेहामुळे पायाला होणाऱ्या अंपगत्वाचे प्रमाण भारतात अधिक आहे. म्हणूनच वर्षातून किमान एक वेळा तरी पायाची तपासणी करणे आवश्यक आहे.पक्षाघात : मधुमेही रुग्णांमध्ये मेंदूमध्ये रक्तस्राव होणे किंवा हृदयाच्या गुठळ्या तयार होण्याची शक्यता जास्त असते. अशा रुग्णांना शरीराच्या एका भागामध्ये लकवा मारला जातो व शरीर अधू होते. याचा प्रतिबंध करण्यासाठी मधुमेह, रक्तदाब नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते.इतर दुष्परिणाम : मधुमेहामुळे वारंवार जंतुसंसर्ग होणे, क्षयरोगाचे प्रमाण वाढणे, लघवीच्या जागी होणारा जंतुसंसर्ग, पुरुषांमध्ये जननेंद्रियात येणारी शिथिलता, नैराश्य, चिडचिडेपणा, स्थूल मधुमेही स्त्रियांमध्ये पाळीमध्ये होणारा त्रास किंवा गर्भाशयाच्या तक्रारी, स्थूल मधुमेही रुग्णामध्ये होणारे यकृताचे आजार हेही गंभीर दुष्परिणाम दिसून येतात.