शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
2
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
3
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
4
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
5
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
6
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
7
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
8
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
9
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
10
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
11
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
12
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
13
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
15
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
16
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
17
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
18
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
19
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
20
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ

शिवसेनेतील साठमारी

By admin | Updated: April 27, 2016 05:22 IST

तंगड्यात तंगडे अडकविण्याच्या राजकारणात मश्गुल असणाऱ्या शिवसेनेत तंगडे तोडीची भाषा ऐकू येतेय.

तंगड्यात तंगडे अडकविण्याच्या राजकारणात मश्गुल असणाऱ्या शिवसेनेत तंगडे तोडीची भाषा ऐकू येतेय. विसर पडलेल्या राडा संस्कृतीची भाषा अलीकडे लोप पावत चालली होती; पण औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी आपल्याच पक्षाचे महानगरपालिकेतील सभागृहनेते राजेंद्र जंजाळ यांना ही धमकी देणे म्हणजे गजबच. त्यावर जंजाळही त्याच संस्कृतीचे. त्यांनी दुसऱ्या दिवशी उघड्या जीपमध्ये बसून खैरेंचे घर गाठले आणि असेल हिंमत तर तोडा तंगडी, असे आव्हान देण्याचा प्रयत्न केला. खैरे घरी नव्हते, नाही तर पुन्हा राडा झाला असता. तीन वर्षांपूर्वी याच खैरेंनी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना मारहाण केली होती. याची आठवण अजून ताजी आहे. त्यावेळी दानवे हे जायकवाडीच्या पाण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री बाळासाहेब थोरातांना अडवायला निघाले होते आणि ते खैरेंना मंजूर नव्हते. हा झाला इतिहास.खैरेंनी जंजाळांना धमकी द्यावी आणि जंजाळांनी त्यांना प्रति आव्हान द्यावे हा मराठवाड्यातील त्यापेक्षा औरंगाबादच्या शिवसेनेतील दोन फळ्यांमध्ये असलेला सत्तासंघर्ष हेच कारण आहे. गेले पावशतक हे सेनेचे औरंगाबादेतील सर्वेसर्वा म्हणून वावरतात. या पंचवीस वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आणि सेनेत अंतर्गत संघर्ष नव्हता, असेही म्हणता येणार नाही. शिवसेना आणून ती रुजवण्यासाठी राबणारे सुभाष पाटील १९९२मध्ये बाहेर पडले त्यावेळीही वादळ उठले होते. शिवसेनेसाठी हा धक्का होता. पुढे अशोक चोटलानींचे तिकीट कापून खैरेंनी विधानसभेची उमेदवारी मिळविली. त्यावेळी राडा होणार, अशी परिस्थिती होती. वादळ उठले होते; पण तेव्हा सेना जोमात आणि सैनिक जोशात होते. ‘गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे,’ अशी सर्वांची धारणा होती. पुढे परशुराम वाखुरे, राधाकृष्ण गायकवाड, रमेश आमराव हे बिनीचे शिलेदार शिवसेनेतून बाहेर पडले. त्याचे तरंग उमटले; पण ही हाडाची कार्यकर्ते मंडळी एकापाठोपाठ का बाहेर पडली याचा गांभीर्याने विचार सेनेतील ज्येष्ठांनी केला नाही. कारण तोपर्यंत खैरेंचे मातोश्रीवर चांगले ट्युनिंग झाले होते. १९९५ ते ९९ हा सेनेचा औरंगाबादेतील सुवर्णकाळ आणि प्रथमच सत्तेवर आलेल्या युतीचाही. यानंतर नव्या शतकात सेनेत नव्या फळीचा उदय झाला. आता ही नवी फळी तरुण झाली; पण त्यांना कर्तृत्व दाखविण्यासाठी अवकाशच नाही. येथे घुसमटीला प्रारंभ झाला आणि सत्तेसाठी शह-काटशहाचे राजकारणही जोरावर आले. विशेष म्हणजे या पाव शतकात सेनेत मराठा नेतृत्व पणपले नाही. नामदेव पवार, अण्णासाहेब माने, संदीपान भुमरे पुढे आले; पण तालुक्यापुरतेच ठरले. यापैकी कोणी सेनेचा चेहरा बनू शकले नाही आणि सर्व सूत्रे मछलीखडकातूनच हलत राहिली. गेल्या वर्षभरापासून ही अंतर्गत धुसफूस जाहीर व्हायला लागली. धाक संपला. पालकमंत्री रामदास कदमांनी खैरेंविरुद्ध उघड भूमिका घेत त्यांची महानगरपालिकेत कोंडी केली आणि तरुण फळी सक्रिय झाली. त्याचीही कारणे आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीत सेनेने मार खाल्ला. त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांचे संख्याबळ घटले. ही तर सेनेची एका अर्थाने नामुष्कीच होती आणि परवा झालेल्या सातारा-देवळाईच्या निवडणुकीत सेनेला एकही जागा मिळाली नाही. राजकारण आणि अर्थकारणातील हितसंबंधांना अडसर निर्माण झाला की, संघर्ष अटळ असतो आणि औरंगाबादच्या शिवसेनेत नेमके हेच घडत आहे. औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ‘समांतर’ कंपनीच्या कामात अडथळे आणण्याचे धोरण खैरे विरोधकांनी ठरविले. कारण खैरेंचा प्राण ‘समांतर’मध्येच आहे. त्याद्वारे त्यांच्या शक्तिस्थानावर विरोधक हल्ले करताना दिसतात. गेल्या अनेक वर्षांचा असंतोष आणि धुसफुशीचे रूपांतर आता उघडपणे सत्तेच्या साठमारीत झालेले दिसते. सेनेत राडा होणार नाही; पण कदमांनी बळ दिल्याने साध्या प्याद्यांनासुद्धा हत्तीचे बळ आले आहे. रंगात आलेला खेळ पूर्ण होतो की ‘मातोश्री’वरून पट उधळला जातो, हेच पाहायचे.- सुधीर महाजन