शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर पॅटर्नची संघाकडून दखल

By admin | Updated: January 23, 2016 03:47 IST

केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांत राबविण्याचा विचार असलेल्या महाकाय

केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांत राबविण्याचा विचार असलेल्या महाकाय जलपुनर्भरण योजनेची हवाई पाहणी केली. योजनेसंंबंधी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आदेशदेखील दिले गेले आहेत. दोन मंत्री ही पाहणी करीत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात निवृत्त शासकीय भूवैज्ञानिक सुरेश खानापूरकर यांनी राबविलेली जलसंधारणाची तंत्राधारित प्रणाली प्रत्यक्ष पाहिली. तब्बल पाच तास त्यांनी भाटपुरा, अजनाड-बंगला, वाडी, बोराडी या गावात जाऊन नाल्यावर राबविलेल्या साखळी सीमेंट बंधाऱ्याचा प्रयोग पाहिला. बंधाऱ्यांमुळे साठलेले पाणी, शेतकऱ्यांनी पिकविलेली बागायती शेती पाहिली. हंगामात दोन-तीन पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधला.महाकाय जलपुनर्भरण योजनेविषयी गेल्या दहा वर्षांपासून चर्चा सुरू आहे. राज्याचा जलसंपदा विभाग जळगावच्या गिरीश महाजन यांच्याकडे, तर केंद्रातील जलसंपदा विभाग मध्य प्रदेशातील उमा भारती यांच्याकडे असल्याने आता योजनेला पुन्हा चालना मिळाली. मे महिन्यापर्यंत प्रकल्प अहवाल तयार होईल आणि वर्षभरात कामाला सुरुवात होईल, अशी जलसंपदा मंत्री महाजन यांची अपेक्षा आहे. एकीकडे वाघूर धरण, प्रकाशा, सारंगखेडा बॅरेजचे पाणी पाटचाऱ्यांअभावी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचलेले नाही. निधीअभावी पाडळसरेसह काही धरणांची कामे बंद असताना महाकाय पुनर्भरण योजनेच्या भवितव्याविषयी साशंकता असणे स्वाभाविक आहे. या पार्श्वभूमीवर सरसंघचालकांनी ‘शिरपूर पॅटर्न’ची प्रत्यक्ष पाहणी करण्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. काँग्रेसचे आमदार अमरीशभाई पटेल यांनी प्रियदर्शनी सूतगिरणी आणि शिक्षणसंस्थेच्या निधीतून ‘शिरपूर पॅटर्न’साठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले. खानापूरकर यांनी शिरपूर तालुक्यातील डोंगराळ भागातील नाल्यांची निवड करून उगमापासून संगमापर्यंत विशिष्ट अंतरावर टप्प्याटप्प्याने सीमेंट बंधारे बांधले. त्यासाठी नाले ४० फूट रुंद आणि ३० फूट खोल केले. एका नाल्यावर तब्बल १६ बंधारे बांधण्याचा प्रयोग त्यांनी दहिवद, गरताड येथे केला. असे तब्बल १३५ बंधारे त्यांनी बांधले आहेत.या जलसंधारण प्रयोगाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणतेही भूसंपादन करावे लागलेले नाही. बंधाऱ्याची देखभाल-दुरुस्ती करावी लागत नाही. कोणत्याही प्रकारचे स्थलांतर होत नाही. ‘शिरपूर पॅटर्न’चा परिणाम आता या तालुक्यात दिसून येत आहे. सरासरी ६०० मि.मी. पर्जन्यमान असताना या तालुक्यातही यंदा पाऊस कमी झाला. परंतु तरीही १३५ बंधाऱ्यांमुळे या परिसरात ठिकठिकाणी जानेवारीअखेर जलसाठे कायम आहेत. शंभर फुटावर गेलेल्या विहिरी आणि ८०० फुटापर्यंत पोहोचलेल्या कूपनलिकांचे पुनर्भरण झाले आहे. पावसाचा थेंब अन् थेंब वाचविला आणि साठविला जात आहे. जलसाठे तयार आहे; पण विजेअभावी ते पाणी उपसता येत नसल्याची समस्या लक्षात घेऊन अमरीशभाई पटेल यांनी शेतकऱ्यांना डिझेल पंप व पाइप दिले. त्यामुळे शेतकऱ्यांचा या प्रयोगात सहभाग वाढला. नाला रुंदीकरणासाठी शेतकरी स्वत:हून जमिनी देऊ लागले.धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यात जलयुक्त शिवार योजनेची पाहणी करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी शिरपूर पॅटर्नची पाहणी केलेली नाही. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि कृषिमंत्री एकनाथराव खडसे हे खान्देशचे असूनदेखील अद्याप याठिकाणी आलेले नाहीत. काँग्रेसच्या आमदाराने केलेल्या या रचनात्मक कार्याची दखल भाजपाच्या मंत्र्यांनी घेतली नसली तरी सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतली आहे. या दौऱ्यानंतर सरकारच्या सिंचन धोरणावर ‘शिरपूर पॅटर्न’चा काही प्रभाव जाणवतो काय, हा औत्सुक्याचा विषय राहील.- मिलिंद कुलकर्णी