शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचा राज ठाकरेंना मोठा धक्का; मनसे स्थापनेपासून सोबत असलेला नेता पक्षाची साथ सोडणार?
2
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
3
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
4
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
5
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
6
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल
7
आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली
8
Nikki Murder Case : "दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील
9
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
10
Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
11
गणेश चतुर्थी २०२५: राहु काळ कधी? ‘या’ शुभ मुहूर्तावर स्थापन करा गणपती; पाहा, चंद्रास्त वेळ
12
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
13
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
14
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
15
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
16
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
17
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
18
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
19
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
20
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!

शिवार व्हावं आबादानी!

By admin | Updated: June 16, 2017 04:16 IST

बळीराजाने रस्त्यावर उतरून जेव्हा त्याचा आक्रोश व्यक्त करायला सुरुवात केली तेव्हा सारेच हबकले होते. कारण आपल्या साऱ्यांचा पोशिंदा तो.

बळीराजाने रस्त्यावर उतरून जेव्हा त्याचा आक्रोश व्यक्त करायला सुरुवात केली तेव्हा सारेच हबकले होते. कारण आपल्या साऱ्यांचा पोशिंदा तो. तोच जर असा जगण्यावर रुसला तर कसं होणार? पण वर्षानुवर्षे चालत आलेली कमालीची राजकीय अनास्था आणि स्वार्थलोलुप राजकारण यामध्ये हा शेतकरी नुसताच भरडला जात होता हे वास्तव होतं. उत्पादनखर्चही निघेना, हमीभाव मिळेना, जगण्यासाठी कर्ज घेऊन त्याचं ओझं वागवू लागला. तेही डोईजड झालं तेव्हा त्याने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आणि सहन न होणाऱ्या त्रासातून स्वत:ला मुक्त केलं. पण या परिस्थितीविरुद्ध पहिल्यांदाच तो एल्गार करून उठला आणि थेट रस्त्यावर उतरला. असाही उत्पादन केलेला माल पडून सडतोय. तो त्याने चक्क रस्त्यावर फेकला. दुधाचे टँकर रस्त्यावर रिते केले आणि आपल्या आक्रोशाला वाट मोकळी करून दिली. अर्थात त्यातही ओघाने राजकारण घुसलेच. मात्र ही परिस्थिती चिघळेल असे वाटत असताना शासनाला प्रसंगाचे गांभीर्य लक्षात आले आणि कर्जमाफीपासून इतर अनेक शेतकरी हक्काच्या घोषणा झाल्या आणि शेतकऱ्यांचे आंदोलन थांबले. हे आंदोलन योग्य वेळी थांबले कारण बळीराजाच्या डोळ्यांसमोर होता पेरणीचा काळ. काळी माती त्याची वाट पाहत होती. आंदोलन थांबले आणि पोशिंदा पुन्हा मातीतून सोनं काढण्यासाठी सज्ज झाला. योगायोग पहा, हे सारे चित्र बदलत असताना अगदी मोक्याच्या क्षणी मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाले. बरोबर ठरल्या मुहूर्तावर येऊन सगळीकडे बरसला. त्याच्या आगमनानेच शुभशकुनाची ग्वाही दिली. शेतकरी दुहेरी आनंदाने मनोमन सुखावला. गेले वर्ष त्याला तसे त्रास देणारेच ठरले होते. पाणीटंचाईने लोकांचे हाल होत होते. अनेक भागांत पाणी नव्हते. नद्या, तलाव, विहिरी, ओढे सारे काही कोरडेठाक पडलेले होते आणि पाऊस लांबलेला होता. त्यात भरीस भर शेतकऱ्यांचे न सुटणारे प्रश्न होतेच. त्यामुळे यंदा काय होणार याकडे शेतकरी डोळे लावून बसलेला होता. त्याला योग्य वेळी आलेल्या पावसाने चांगला दिलासा दिला आहे. घाम गाळून शेतातून समृद्धी आणणारा प्रत्येक शेतकरी आता कष्टाने, जिद्दीने आणि नेटाने पुन्हा पीक पीकवणार आहे. साऱ्या बळीराजांचं शिवार आबादानी व्हावं हीच प्रत्येकाची सद्भावना आहे.