शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिवार व्हावं आबादानी!

By admin | Updated: June 16, 2017 04:16 IST

बळीराजाने रस्त्यावर उतरून जेव्हा त्याचा आक्रोश व्यक्त करायला सुरुवात केली तेव्हा सारेच हबकले होते. कारण आपल्या साऱ्यांचा पोशिंदा तो.

बळीराजाने रस्त्यावर उतरून जेव्हा त्याचा आक्रोश व्यक्त करायला सुरुवात केली तेव्हा सारेच हबकले होते. कारण आपल्या साऱ्यांचा पोशिंदा तो. तोच जर असा जगण्यावर रुसला तर कसं होणार? पण वर्षानुवर्षे चालत आलेली कमालीची राजकीय अनास्था आणि स्वार्थलोलुप राजकारण यामध्ये हा शेतकरी नुसताच भरडला जात होता हे वास्तव होतं. उत्पादनखर्चही निघेना, हमीभाव मिळेना, जगण्यासाठी कर्ज घेऊन त्याचं ओझं वागवू लागला. तेही डोईजड झालं तेव्हा त्याने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आणि सहन न होणाऱ्या त्रासातून स्वत:ला मुक्त केलं. पण या परिस्थितीविरुद्ध पहिल्यांदाच तो एल्गार करून उठला आणि थेट रस्त्यावर उतरला. असाही उत्पादन केलेला माल पडून सडतोय. तो त्याने चक्क रस्त्यावर फेकला. दुधाचे टँकर रस्त्यावर रिते केले आणि आपल्या आक्रोशाला वाट मोकळी करून दिली. अर्थात त्यातही ओघाने राजकारण घुसलेच. मात्र ही परिस्थिती चिघळेल असे वाटत असताना शासनाला प्रसंगाचे गांभीर्य लक्षात आले आणि कर्जमाफीपासून इतर अनेक शेतकरी हक्काच्या घोषणा झाल्या आणि शेतकऱ्यांचे आंदोलन थांबले. हे आंदोलन योग्य वेळी थांबले कारण बळीराजाच्या डोळ्यांसमोर होता पेरणीचा काळ. काळी माती त्याची वाट पाहत होती. आंदोलन थांबले आणि पोशिंदा पुन्हा मातीतून सोनं काढण्यासाठी सज्ज झाला. योगायोग पहा, हे सारे चित्र बदलत असताना अगदी मोक्याच्या क्षणी मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाले. बरोबर ठरल्या मुहूर्तावर येऊन सगळीकडे बरसला. त्याच्या आगमनानेच शुभशकुनाची ग्वाही दिली. शेतकरी दुहेरी आनंदाने मनोमन सुखावला. गेले वर्ष त्याला तसे त्रास देणारेच ठरले होते. पाणीटंचाईने लोकांचे हाल होत होते. अनेक भागांत पाणी नव्हते. नद्या, तलाव, विहिरी, ओढे सारे काही कोरडेठाक पडलेले होते आणि पाऊस लांबलेला होता. त्यात भरीस भर शेतकऱ्यांचे न सुटणारे प्रश्न होतेच. त्यामुळे यंदा काय होणार याकडे शेतकरी डोळे लावून बसलेला होता. त्याला योग्य वेळी आलेल्या पावसाने चांगला दिलासा दिला आहे. घाम गाळून शेतातून समृद्धी आणणारा प्रत्येक शेतकरी आता कष्टाने, जिद्दीने आणि नेटाने पुन्हा पीक पीकवणार आहे. साऱ्या बळीराजांचं शिवार आबादानी व्हावं हीच प्रत्येकाची सद्भावना आहे.