शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

शांती कर्मप्रेरक शक्ती

By admin | Updated: March 16, 2017 01:02 IST

सत्य, सौंदर्य, कला आणि साहस ही जीवनाची चार मूल्ये मानली आहेत. शांती हे या चारही मूल्यांमध्ये सुसंवाद साधणारे अंतिच मूल्य आहे.

- डॉ. रामचंद्र देखणेसत्य, सौंदर्य, कला आणि साहस ही जीवनाची चार मूल्ये मानली आहेत. शांती हे या चारही मूल्यांमध्ये सुसंवाद साधणारे अंतिच मूल्य आहे. शांती म्हणजे सर्व सहन करणे, शांती म्हणजे कुणालाही न दुखावणे, काहीही झाले तरी वाद नको म्हणून निमूटपणे बसणे, अशी शांतीविषयीची काही विपरित कल्पना घेतली जाते. वास्तविक शांती म्हणजे निवृत्तीपर नैष्कर्म्याची कल्पना नसून, शरीरामध्ये आणि मानवी लोकजीवनामध्ये उत्साह ओतणारी, त्याला कार्यतत्पर बनविणारी अशी प्रवृत्तीपर भावना आहे. शांती ही नैतिकतेची अधिष्ठायी आहे. संतश्रेष्ठ तुकोबाराय म्हणतात, ‘‘म्हणवूनी शांती धरा, उतरात पैलतीरा’’नैतिकतेच्या पैलतीरावर जाण्यासाठी शांती हीच तारू आहे. ज्याने आपल्या सर्व इंद्रियांच्या ठिकाणी शांतीचे अलंकार धारण केले आहेत, त्याच्या सहजक्रियेतही नीती जन्म घेते आणि असा देह म्हणजे देवाच्या आवडीचे विश्रांतीस्थान होय. म्हणून तर वारकरी संप्रदायाचे कळस अर्थात जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबाराय म्हणतात,‘‘दया क्षमा शांती,तेथे देवाची वसती।’’परंतु, अगोदर दया म्हणजे काय, ती कुणावर करायची याचेही विवेचन संतश्रेष्ठ तुकोबाराय करतात. भूतांचे पालन करणे ही दया आहे. तसेच आणिक निर्दालन कंटकंचे म्हणजे कंटकांचे निर्दालन हीदेखील दयाच आहे. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांची दया ही प्रवृत्तीधर्माचेही सत्य जागविणारी आहे. शांती हे मानवी जीवनाचे खरे प्रयोजन आहे. ऋषिमुनींनी देवाजवळ जगाच्या शांतीसाठी मागणे मागितले. यजुर्वेदाचा छत्तीसावा अध्याय हा शांतीपाठार्थ म्हणून प्रसिद्ध असून, त्यात विश्वाचे शांतीगीत ऐकायला मिळते. आचार्य विनोबाजी भावे यांनी शांती तत्त्वाचे विवेचन फारच सुंदरपणे केले आहे. ते म्हणतात, ‘‘शांती शांतीमध्येही फरक आहे. दगड मूळच शांतच असतो, देवळाच्या पायरीलाही दगडच बसविलेला असतो.’’शेंदूर लावून दगडाचाच देव आपल्यासमोर असतो. म्हणजे शेंदूर लावल्यानंतरही तो शांतच असतो. पण दगडाची जड जड शांती निराळी आणि देवाची स्फूर्तिदायक शांती निराळी. दगड आणि दगडाचा देव हे दोन्हीही एका अर्थाने कर्मसंन्यासी. पण त्याच दगडातील देवाच्या कर्मसंन्यासातून भक्तांच्या डोळस श्रद्धेला कर्मयोगाचे अनंत किरण पसरलेले दिसतात. त्यामुळे त्याच्या कर्मसंन्यासात जे विशिष्ट सामर्थ्य आहे ते दगडाच्या कर्मसंन्यासात नाही. देवामधली प्रचंड कर्मप्रेरक शक्ती ही दगडात नाही म्हणून तर एकाच्या पायावर डोके ठेवले जाते तर दुसऱ्याच्या डोक्यावर पाय ठेवून पुढे जावे लागते. शांती हे स्थिरतेचे लक्षण असले तरी ती कर्मप्रेरक शक्ती असते, हे महत्त्वाचे.