शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

लाजिरवाणा प्रकार

By admin | Updated: March 5, 2017 23:35 IST

उत्तर प्रदेशमधील एक मंत्री आणि अमेठी मतदारसंघातील समाजवादी पक्षाचा उमेदवार एवढीच काय ती त्याची ओळख.

गायत्री प्रजापती हे नाव देशभर माहीत होण्याचे कारण नाही. उत्तर प्रदेशमधील एक मंत्री आणि अमेठी मतदारसंघातील समाजवादी पक्षाचा उमेदवार एवढीच काय ती त्याची ओळख. पण तो सध्या गाजतो आहे वेगळ्याच कारणासाठी. त्याच्यावर बलात्कार व विनयभंगाचा आरोप आहे. त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करायला उत्तर प्रदेश पोलिसांनी टाळाटाळ केली आणि त्यामुळे हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात गेले. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला, तेव्हा तो अमेठी मतदारसंघात उघडपणे प्रचार करताना दिसत होता. मतदान करतानाची त्याची छायाचित्रेही झळकली. पण त्यानंतर तो बेपत्ताच झाला आणि आता तर तो देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी देशातील सर्व विमानतळांवर अलर्टच्या सूचना दिल्या आहेत. नेपाळची सीमा उत्तर प्रदेशला लागून आहे. तो रस्त्याने तिथे पळून जाईल, असा अंदाज असल्याने तेथील सर्व सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. महिलेवर बलात्कार व तिच्या मुलीचा विनयभंग असे गंभीर आरोप असले तरी त्याने सराईतपणे आरोपांचा इन्कार केला आहे. पण तो ज्याप्रकारे गायब झाला, ते पाहता आरोपात तथ्य असण्याची शक्यताच अधिक. अन्यथा अटक टाळण्यासाठी त्याने एवढी पळापळ केली नसती. ऐन निवडणुकांच्या काळात या गायत्री प्रजापतीमुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव अडचणीत आले आहेत. त्याने पोलिसांच्या स्वाधीन व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. मुळात त्याला उमेदवारी देण्याचे कारणच नव्हते. त्याची पक्षातून हकालपट्टीच करायला हवी होती, मंत्री म्हणून अधिकारांचा गैरवापर करून त्याने प्रचंड पैसा कमावला असून, त्याची लोकायुक्तांमार्फत चौकशी सुरू आहे. तरीही यादव यांनी त्याला मंत्रिमंडळात ठेवले. पंधरा वर्षांपूर्वी दारिद्र्यरेषेखालील व्यक्ती असलेल्या गायत्री प्रजापतीने आता करोडो रुपयांची मालमत्ता कमावली. एवढेच नव्हे, तर त्याने अनेक गुन्हेगार पदरी ठेवले आणि माफियाराज सुरू केले. सध्या भाजपाचे नेते निवडणूक प्रचारात सतत गायत्री प्रजापतीचे नाव घेत उत्तर प्रदेशातील वाढत्या गुन्हेगारीचा उल्लेख करीत आहेत. त्याला अखिलेश यादव यांच्याकडून मिळणाऱ्या आश्रय मिळत असल्याचा आरोप करीत आहेत. पण अन्य बाबतीत भाजपाचे आरोप खोडून काढणाऱ्या वा भाजपावर कडाडून टीका करणाऱ्या अखिलेश यादवना या विषयावर गप्प राहावे लागत आहे. तीच अडचण समाजवादी पक्षाशी आघाडी करणाऱ्या काँग्रेसचीही झाली आहे. उत्तर प्रदेशच्या राजकारणात बाहुबली हा प्रकार काही नवा नाही. भाजपा, बसपा, काँग्रेस अशा सर्वच पक्षांत ही मंडळी आहेत. पण गायत्री प्रजापतींमुळे समाजवादी पक्ष आणि अखिलेश यादव यांची पुरती लाजच गेली आहे.