शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
2
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
3
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
4
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
5
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
6
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
7
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
8
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
11
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
12
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
13
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
14
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
15
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
16
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
17
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
18
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
19
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
20
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 

सेवा शुल्क अवैध नाही

By admin | Updated: January 8, 2017 01:43 IST

सेवा शुल्क हे अन्य शुल्कांप्रमाणेच उपाहारगृहांद्वारे संभाव्य ग्राहकांसाठी आकारले जाते. अशा उपाहारगृहांना प्रोत्साहन द्यायचे की नाही, याचा निर्णय घेण्याचा अधिकार सर्वस्वी ग्राहकांचा आहे.

- दिलीप दातवानी सेवा शुल्क हे अन्य शुल्कांप्रमाणेच उपाहारगृहांद्वारे संभाव्य ग्राहकांसाठी आकारले जाते. अशा उपाहारगृहांना प्रोत्साहन द्यायचे की नाही, याचा निर्णय घेण्याचा अधिकार सर्वस्वी ग्राहकांचा आहे. एखादे उपाहारगृह अथवा हॉटेल ग्राहकांकडून घेतलेल्या उरलेल्या शुल्कांमध्ये (पदार्थाच्या किमतीत जोडून) ते वळते करू शकते. सेवा शुल्क हे लाभदायी देयक मानले जाते. कारण त्यातून त्या आस्थापनातील कर्मचाऱ्यांचे हित साधले जाते. त्यामुळे काही आस्थापनांमध्ये काळजीपूर्वक त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी लाभदायी धोरण राबवले जाते. त्यात त्यांना किमान टिप मिळेल, असे पाहिले जाते. हे अन्य आकारांतून काही टक्के असते. काही अशी प्रकरणेही आहेत की, ज्यात सेवा शुल्काची आकारणी करणे कायद्यानेच ग्राह्य मानले आहे. राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग, नवी दिल्ली यांनी नितीन मित्तल विरुद्ध पिंड बलुची, (२०१२) एनसीडीआरसी ४४४, ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार ही पद्धत चुकीची व्यापार पद्धती नाही, असे म्हटले आहे. अन्य एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानेही विशेषकरून, सेवाशुल्क आकारणी हॉटेलांनी करण्यास मान्यता दिली आहे. त्याशिवाय अन्य काही प्रकरणांतही कनिष्ठ न्यायालयांनी या पद्धतीला मान्यता दिली आहे. सेवा शुल्क उपाहारगृह अथवा त्यासारख्या आस्थापनांतील कर्मचाऱ्यांसाठी दिली जाणारी रक्कम असते. एखादी संस्था ही रक्कम बिलामध्येच वळती करू शकते. हे प्रमाण बिलाच्या रकमेच्या ५ ते १५ टक्क्यांदरम्यान असू शकते. सेवा शुल्क हा सरकारी आकार नसल्याने सेवाकर अथवा व्हॅटशी त्याची सांगड घालून गोंधळ निर्माण व्हायला नको. अशा प्रकारचे निर्देश ग्राहक व्यवहार खात्याने दिल्यामुळे आम्हाला खेद वाटतो. हे निर्देश चुकीची माहिती देणारे असून, त्यामुळे हॉटेल्स तसेच उपाहारगृहांबाबत त्यांच्या ग्राहकांच्या मनात चुकीचा संदेश जाऊ शकतो. ग्राहकांचे हक्क सर्वोच्च आहेत, मात्र त्याखाली एखाद्या आस्थापनांचे अधिकार चिरडले जाऊ नये. साधारणपणे एकदा सेवेसाठी शुल्क आकारले की टिप दिली जाऊ नये, यासाठी प्रोत्साहन दिले जाते. हे सेवा शुल्क केवळ स्टुवर्ड्सनाच दिले जाते असे नाही तर आचाऱ्यांपासून भांडी विसळणाऱ्या साहाय्याकांपर्यंत सर्वांनाच दिले जाते. बिलामध्ये ही रक्कम वेगळी ठेवण्यामागील कारण हे आहे की, काही रक्कम त्यांना सेवा देणाऱ्या आस्थापनातील कर्मचाऱ्यांसाठी असते.(लेखक हे हॉटेल्स अ‍ॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन आॅफ वेस्टर्न इंडियाचे उपाध्यक्ष आहेत.)