शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दुसरे पर्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 05:04 IST

धर्म आणि राजकारण या गोष्टी जेव्हा एकमेकांना चिकटतात, तेव्हा त्यातून एक दुधारी शस्त्र तयार होते व त्याचे स्वरूप कमालीचे परिणामकारक व विदारक असते.

धर्म आणि राजकारण या गोष्टी जेव्हा एकमेकांना चिकटतात, तेव्हा त्यातून एक दुधारी शस्त्र तयार होते व त्याचे स्वरूप कमालीचे परिणामकारक व विदारक असते. परवाच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच शस्त्राचा अत्यंत खुबीने वापर केला. ते राजकारण म्हणत होते आणि त्यांचे दुय्यम दर्जाचे सहकारी धर्माचे नाव घेत होते. समाजातील सामान्य वर्ग व त्यावर वर्चस्व असणारा उच्च मध्यमवर्ग या दोहोंनाही हे दुहेरी राजकारण भावते. कारण त्यात त्यांना त्यांच्या मिळकतीची व प्रतिष्ठेची सुरक्षितता दिसत असते. गरिबांचे व बेरोजगारांचे वर्ग बोलतात वा ओरडतात, पण त्यांच्यात एकवाक्यता नसते. ते जातीधर्मात, भाषापंथात, तर कधी एकेका जातीच्या पक्षात विभागलेले असतात. त्यांचे पुढारी खुजे व फारसे दूरचे न पाहणारे असतात.

परिणामी, आपापले वर्ग सोबत घेऊन ते पराभवाचीच वाटचाल करीत असतात. पं. नेहरू एकदा म्हणाले, ‘एका धर्मनिष्ठ समाजाचे सेक्युलर राष्ट्रात रूपांतर करणे हे आमच्यासमोरचे मोठे आव्हान आहे.’ त्या आव्हानाला आता मिळालेले उत्तर नेमके उलट आहे आणि ते स्वातंत्र्यलढ्याच्या जुन्या परंपरांचा पराभव करणारे आहे. तरीदेखील मोदी व त्यांचा पक्ष यांनी गेल्या काही वर्षांत केलेल्या आपल्या उभारणीचे व निवडणुकीतील आखणीचे कौतुक करणे आवश्यक आहे. त्यांनी अमेठीत राहुल गांधींचा पराभव केला. ज्योतिरादित्य शिंदे, मिलिंद देवरा, दिग्विजयसिंग आणि अशोक चव्हाण यांचाही पराभव केला. जी राज्ये गेल्या वर्षी काँग्रेसने जिंकली, ती सारी त्यांनी परत मिळविली, शिवाय आपले पूर्वीचे गडही त्यांनी राखले. प्रचारात काही माध्यमे व प्रचारी ट्रोल्स ताब्यात घेतले आणि सारी लढाई एकतर्फी जिंकली. मोदींचा प्रचार धुव्वाधार होता. बाकीचे सारे नेते त्यांनी झाकोळून टाकले होते. धर्माला विकासाच्या नावाची जोड व राजकारणाची साथ, संघाची मदत आणि धनवंतांचा पाठिंबा असे सारे त्यांना जुळविता आले. आताच्या त्यांच्यापुढच्या आव्हानात सुषमा स्वराज नाहीत, सुमित्रा महाजन नाहीत, गडकरी स्पर्धेत राहिले नाहीत, प्रादेशिक पुढारी पांगले आहेत आणि दिल्ली पूर्णपणे ताब्यात आली आहे. परिणामी, यापुढला त्यांचा कारभार लोकशाहीची मान्यता असलेला एकछत्री कारभार असेल. त्याला गंभीर व वास्तवाचे वळण यावे लागेल. त्याचे स्वरूप ट्रम्पच्या राजकारणासारखे होऊ नये.

आताचा त्यांचा कार्यक्रम देश एकात्म राखण्याचा व त्यासाठी जाती, धर्म, भाषा यांच्यातील संघर्ष संपविण्याचा व तडजोडीचा राहिला पाहिजे. पूर्वीची एकारलेली भाषा व भयतंत्र त्यांना थांबविता आले पाहिजे. वाचाळ माणसांची तोंडे कुलूपबंद केली पाहिजेत. कारण विरोधी पक्ष पराभूत असले, तरी ते शमणार नाहीत. राहुल गांधी दक्षिणेतून आठ लक्ष मतांनी निवडून आले आहेत. सात राज्यांत काँग्रेसची सरकारे आहेत. पूर्ण बहुमत मिळाले असले, तरी आपल्या सर्व मित्रपक्षांना याही वेळी सरकारमध्ये सोबत घेणार असल्याचे मोदींनी जाहीर केले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा जनता दल (युनायटेड), अकाली दल, शिवसेनेला व इतर मित्रपक्षांना मंत्रिमंडळात अधिक प्रतिनिधित्व द्यावे लागेल. त्यामुळे सरकार सुरळीत चालेल.

देशाला शेतीचा विकास हवा. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य मोबदला मिळायला हवा. रोजगाराच्या संधी वाढवायला हव्यात. लष्कराची ताकद वाढायला हवी. बुलेट ट्रेन नंतर आली तरी चालेल, पण आधी बेरोजगार माणसांच्या हाताला काम मिळाले पाहिजे. शेतीला व पिण्यासाठी पाणी मिळाले पाहिजे. महागाई कमी झाली पाहिजे आणि जिणे सुकर झाले पाहिजे. समाजजीवन सदैव पुढे जाणारे असते, ही जाणीव ठेवूनच मोदींना काम करावे लागणार आहे, तसे ते करतील, याची अपेक्षा जनतेला आहे.