शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
3
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
4
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
5
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
6
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
8
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
9
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
10
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
11
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
12
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
13
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
14
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
15
Women violence: देशात आपल्याच घरात महिलांचा होतोय छळ, आकडे बघा काय सांगताहेत?
16
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
17
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
18
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
19
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
20
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...

साखेरचा ‘सुकाळ’, मदतीचा ‘दुष्काळ’

By admin | Updated: February 7, 2015 00:11 IST

दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्राच्या हातावर केंद्र सरकार तुरी देत आहे, राज्यातील मंत्री हसऱ्या चेहऱ्याने चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगत आहेत, तर विरोधकांना काहीच वाटेनासे झाले आहे.

दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्राच्या हातावर केंद्र सरकार तुरी देत आहे, राज्यातील मंत्री हसऱ्या चेहऱ्याने चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगत आहेत, तर विरोधकांना काहीच वाटेनासे झाले आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राबद्दल अढी ठेवून वागत आहे का? काँग्रेस आघाडी सरकारविरुद्ध पोटाला पीळ बसेस्तोवर ओरडणारे विरोधक सत्तेत येताच सुस्त झाले आहेत! मागील तीन महिन्यांत महाराष्ट्राच्या जिव्हारी लागलेल्या दुष्काळ व साखर कारखान्यांच्या मदतीच्या विषयावर केंद्राने उत्तर शोधलेले नाही. उलट, टाळाटाळ करून गोड बोलून वेळ मारून नेण्याचा जालीम उद्योग सुरू आहे. त्यामुळे पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांबद्दल केंद्राला ममत्व उरले की नाही ही चिंता आहे. या दोन्ही विषयांवर केंद्रातील बड्या नेत्यांना भेटून परतलेले राज्यातील मंत्री हसऱ्या चेहऱ्याने चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगतात. प्रत्यक्षात केंद्र सरकार महाराष्ट्राच्या हातावर तुरी देत आहे! भांडवलदार, उद्योगपतींचे सरकार असल्याचे केंद्राबद्दल बोलले जाते. विरोधकांनाही शेतकऱ्यांबद्दल काहीच वाटेनासे झाले आहे. विरोधक म्हणून काही काम असते याचा विसर अनेक वर्षे सत्तेत राहिल्याने त्यांना पडला असावा. दुष्काळाच्या मुद्द्यावरून खासदार अशोक चव्हाण, राजीव सातव, सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत सभात्याग केला, ते बातमीत झळकले. पुढे तेही पाय गाळून बसले. चव्हाण, सातव तर ज्या भागात भीषण दुष्काळ आहे, त्याच मराठवाड्यातील आहेत. पण त्यांनीही रखडलेल्या केंद्राच्या दुष्काळी मदतीवर दोन महिन्यांत चकार शब्द काढलेला नाही. उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दुष्काळी दौऱ्यावर होते, तेव्हा संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होते. तेव्हा एक दिवस धावपळीत शिवसेनेच्या खासदारांनी कृषिमंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेऊन निवेदन दिले. फोटो काढले. शेतकऱ्यांना समाधान देण्याचा तेवढ्यापुरता त्यांचाही उपचार संपला ! महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिल्लीत येऊन कृषिमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण समितीचे अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन मदतीबाबत आग्रह धरला. पण भाजपाशासित महाराष्ट्राला मदतीच्या यादीतून वगळल्याचे पुढे आले. महाराष्ट्रातील दुष्काळ व गारपिटीसाठी आर्थिक पॅकेजच्या मागणीबाबत केंद्राने काहीही निर्णय घेतला नाही. अंतिम आणेवारी १५ जानेवारीला आली, त्यानंतर केंद्राकडे अहवाल आला. भीषण दुष्काळ व गारपिटीनंतर राज्यातील १५ जिल्ह्यांसाठी महाराष्ट्राने केंद्राकडे पॅकेज मागितले होते. पाहणी झाली, अहवाल आले, मंत्र्यांच्या बैठकीही झाल्या; पण फाईलींचा प्रवास काही संपत नाही. लोक आता माजी कृषिमंत्री शरद पवार व आताचा कारभार याची तुलना करू लागले! लोकांचे काय चुकले? ही तुलना झाली की मग पवार विरोधकांचे पित्त खवळते. मदत नक्कीच मिळेल, ती द्यावीच लागेल. पण डोळ्यासमोर अंधार दाटलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारची चालढकल धक्कादायक आहे. असाच प्रकार महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना मदत करण्याबाबत झाला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळाने अर्थमंत्री अरुण जेटली व केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरणमंत्री रामविलास पासवान यांची वीस दिवसांपूर्वी भेट घेतली. पंतप्रधानांना उद्देशून असलेले मागण्यांचे निवेदनही दिले. तीन दिवसांत मार्ग काढू असे जेटली म्हणाले. शिष्टमंडळाने आठवडा धरला. पण आता वीस दिवस होत आहेत. स्थितीत कवडीचाही सुधार नाही. दोन्ही विरोधी पक्षेनेते विखे पाटील व मुंडे यांनी ‘मदत न मिळाल्यास आठवडाभरात भूमिका जाहीर करू’ अशी पोकळ घोषणाही केली. कुठे आहेत हे दोन्ही विरोधी पक्षनेते व त्यांची भूमिका? राज्यातील ७० ते ८० टक्के शेतकरी या साखर उद्योगावर अवलंबून आहेत. कंत्राटदार, कामगार, छोटे-मोठे उद्योगधंदे साखर उद्योगावर अवलंबून आहेत. हंगाम सुरू झाल्यापासून प्रतिक्विंटलचा दर सतत घसरत आहे. हे सारे सांगून झाले आहे, पण केंद्र ढिम्म आहे. एकाच पक्षाचे सरकार राज्य व केंद्रात असल्यास सुसूत्रता येते व जनतेला दिलासा देणे सोपे जाते असे सांगितले गेले; पण प्रत्यक्षात साखरेचा ‘सुकाळ’ आणि मदतीचा ‘दुष्काळ’आहे. - रघुनाथ पांडे