शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

गुलाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2017 23:30 IST

मला माझ्या घराविषयी, गावाविषयी, राज्याविषयी आणि राष्ट्राबद्दल काय वाटतं? असा प्रश्न खुपदा विचारला जातो.

मला माझ्या घराविषयी, गावाविषयी, राज्याविषयी आणि राष्ट्राबद्दल काय वाटतं? असा प्रश्न खुपदा विचारला जातो. म्हणजे देशभक्त आणि देशद्रोह या एकाच नाण्याच्या दोन गोष्टी आहेत. मी एकाचवेळी दोन्ही असतो. देशाचे कोणतेही नुकसान जेव्हा कळत नकळत माझ्या हातून घडते तेव्हा मी द्रोही असतोच. केळाचे साल रस्त्यात टाकणे, वरच्या मजल्यावरून केसांचे गुंते फेकणे, लाइनी मोडणे, सिग्नल तोडणे आणि हो अलीकडेच हेल्मेट घालणे हे सारं करताना आपण नकळत द्रोह करतोच. मग देशभक्ती कोणती? तर या सगळ्या सांगितलेल्या गोष्टी नाकारणे, परकीय मालाची होळी करणे, १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारी धडाक्यात साजरी करणे. मग हे सगळे उत्सव करताना बेंबीच्या देठापासून ओरडणे हेही चालूच असते. आपण एखादी गोष्ट ठरवून करून टाकली की शिक्का बसतोच ! म्हणूनच देशभक्त ठरणे आणि असणे हेही विरळच आणि तसाच देशद्रोही ठरविणे कठीणच ! आपल्या महाकाय देशाला हजारो माणसांनी घडवलंय, गंमत पहा, माझा तेलगू, मल्याळम, तामीळ बांधव तिकडे राष्ट्रभक्त म्हणून देशप्रेमाच्या गोष्टी सांगत असतो, ज्या मला कळत नसतात. इकडे मी मराठीत ‘जय भारत’ पुकारत असतो. ते त्याला कळत नसतं. आपण एकाच देशाचे घटक आहोत, मग भगतसिंग असो की चाफेकर बंधू असो, वासुदेव बळवंत फडके असो की बंगालचा बोस असो एकच चिवट धागा आपल्याला जोडून आहे आणि तो म्हणजे भारत देश आणि या देशातील एका विभागाचा मी एक घटक. आपण आपल्या देशाच्या या वैविध्यपूर्ण माहितीचा कधी विचार केला आहे. त्यामुळेच कदाचित कट्टर मुस्लीम आणि देशभक्त मुस्लीम यांच्यात आपल्याला फरक करता येत नाही. आणि त्यामुळेच एकत्वाची भावना कायम साशंक राहते म्हणून ‘भारत माता की जय’ हा फक्त सवाल नाही तर उत्तरच आहे. भारताबद्दल मत मांडताना आपण काय म्हणतो हा प्रश्न आहे.मी म्हणालो, भारत माता की जयत्यांनी माझ्यावर गुलाब उधळलेआणि देशभक्तीचा अंगारा लावला, मी पुढे गेलो आणिपुन्हा म्हणालो, भारत माता की जयत्यांनी काट्यांनी मला रक्तबंबाळ केलेआणि देशद्रोहाची राख फासलीएकाचवेळी द्रोह आणि भक्ती सांभाळणाऱ्यागुलाबाचा मला राग आला आणिमी गुलाबाला खुडले, चिरडले, त्याला चुरगळले आणि बघता बघता भारत माता सुगंधित झाली...मी या देशाचा कोण लागतो? गुलाबाला कुठे बसायचे? कुणाबरोबर जायचे हे कुठे माहीत? त्याला असेपर्यंत फक्त सुगंध उधळीत रहायचे एवढेच माहीत, तरीही गुलाब आपल्याला प्रिय कारण आपण त्याला वाहतो देवाला किंवा टाकतो प्रेतावर. तो दोन्ही ठिकाणी स्थितप्रज्ञ सुगंधी म्हणून नेहरूंच्या कोटाला असलेला गुलाब केरात जातोही! आपण एवढेच, सर्वत्र गुलाब लावायचे, सर्वत्र गुलाब व्हायचे ! ते शक्य झाले की झालो आपण जिंदगीच्या मैफलीचे खरे शिलेदार. खरे गुलाब !-किशोर पाठक