शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

गुलाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2017 23:30 IST

मला माझ्या घराविषयी, गावाविषयी, राज्याविषयी आणि राष्ट्राबद्दल काय वाटतं? असा प्रश्न खुपदा विचारला जातो.

मला माझ्या घराविषयी, गावाविषयी, राज्याविषयी आणि राष्ट्राबद्दल काय वाटतं? असा प्रश्न खुपदा विचारला जातो. म्हणजे देशभक्त आणि देशद्रोह या एकाच नाण्याच्या दोन गोष्टी आहेत. मी एकाचवेळी दोन्ही असतो. देशाचे कोणतेही नुकसान जेव्हा कळत नकळत माझ्या हातून घडते तेव्हा मी द्रोही असतोच. केळाचे साल रस्त्यात टाकणे, वरच्या मजल्यावरून केसांचे गुंते फेकणे, लाइनी मोडणे, सिग्नल तोडणे आणि हो अलीकडेच हेल्मेट घालणे हे सारं करताना आपण नकळत द्रोह करतोच. मग देशभक्ती कोणती? तर या सगळ्या सांगितलेल्या गोष्टी नाकारणे, परकीय मालाची होळी करणे, १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारी धडाक्यात साजरी करणे. मग हे सगळे उत्सव करताना बेंबीच्या देठापासून ओरडणे हेही चालूच असते. आपण एखादी गोष्ट ठरवून करून टाकली की शिक्का बसतोच ! म्हणूनच देशभक्त ठरणे आणि असणे हेही विरळच आणि तसाच देशद्रोही ठरविणे कठीणच ! आपल्या महाकाय देशाला हजारो माणसांनी घडवलंय, गंमत पहा, माझा तेलगू, मल्याळम, तामीळ बांधव तिकडे राष्ट्रभक्त म्हणून देशप्रेमाच्या गोष्टी सांगत असतो, ज्या मला कळत नसतात. इकडे मी मराठीत ‘जय भारत’ पुकारत असतो. ते त्याला कळत नसतं. आपण एकाच देशाचे घटक आहोत, मग भगतसिंग असो की चाफेकर बंधू असो, वासुदेव बळवंत फडके असो की बंगालचा बोस असो एकच चिवट धागा आपल्याला जोडून आहे आणि तो म्हणजे भारत देश आणि या देशातील एका विभागाचा मी एक घटक. आपण आपल्या देशाच्या या वैविध्यपूर्ण माहितीचा कधी विचार केला आहे. त्यामुळेच कदाचित कट्टर मुस्लीम आणि देशभक्त मुस्लीम यांच्यात आपल्याला फरक करता येत नाही. आणि त्यामुळेच एकत्वाची भावना कायम साशंक राहते म्हणून ‘भारत माता की जय’ हा फक्त सवाल नाही तर उत्तरच आहे. भारताबद्दल मत मांडताना आपण काय म्हणतो हा प्रश्न आहे.मी म्हणालो, भारत माता की जयत्यांनी माझ्यावर गुलाब उधळलेआणि देशभक्तीचा अंगारा लावला, मी पुढे गेलो आणिपुन्हा म्हणालो, भारत माता की जयत्यांनी काट्यांनी मला रक्तबंबाळ केलेआणि देशद्रोहाची राख फासलीएकाचवेळी द्रोह आणि भक्ती सांभाळणाऱ्यागुलाबाचा मला राग आला आणिमी गुलाबाला खुडले, चिरडले, त्याला चुरगळले आणि बघता बघता भारत माता सुगंधित झाली...मी या देशाचा कोण लागतो? गुलाबाला कुठे बसायचे? कुणाबरोबर जायचे हे कुठे माहीत? त्याला असेपर्यंत फक्त सुगंध उधळीत रहायचे एवढेच माहीत, तरीही गुलाब आपल्याला प्रिय कारण आपण त्याला वाहतो देवाला किंवा टाकतो प्रेतावर. तो दोन्ही ठिकाणी स्थितप्रज्ञ सुगंधी म्हणून नेहरूंच्या कोटाला असलेला गुलाब केरात जातोही! आपण एवढेच, सर्वत्र गुलाब लावायचे, सर्वत्र गुलाब व्हायचे ! ते शक्य झाले की झालो आपण जिंदगीच्या मैफलीचे खरे शिलेदार. खरे गुलाब !-किशोर पाठक