शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
3
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
4
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
5
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
6
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
7
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
8
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
9
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
10
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
11
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
12
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
13
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
14
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार
15
"माझ्यासाठीच नाही, तर १४० कोटी भारतीयांसाठीही..."; ब्राझीलचा सर्वोच्च सन्मान मिळाल्यावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
16
अरे देवा! ज्या सावत्र आईचा आशीर्वाद घ्यायचा, तिच्यासोबत पळाला अल्पवयीन मुलगा; केलं लग्न
17
Kangana Ranaut : "लोकांना तिला निवडून दिल्याबद्दल पश्चात्ताप होतोय"; कंगना राणौतवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल
18
पुणे : बाहेरून दिसायचा स्पा, आत चालायचा देह व्यापार; १८ मुलींची सुटका, परदेशी मुलींचाही समावेश
19
Video - संतापजनक! राजस्थानमध्ये उद्घाटनापूर्वीच वाहून गेला नवा रस्ता; पावसाने केली पोलखोल
20
अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात काय?; कारण अद्यापही गुलदस्त्यात

गुलाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2017 23:30 IST

मला माझ्या घराविषयी, गावाविषयी, राज्याविषयी आणि राष्ट्राबद्दल काय वाटतं? असा प्रश्न खुपदा विचारला जातो.

मला माझ्या घराविषयी, गावाविषयी, राज्याविषयी आणि राष्ट्राबद्दल काय वाटतं? असा प्रश्न खुपदा विचारला जातो. म्हणजे देशभक्त आणि देशद्रोह या एकाच नाण्याच्या दोन गोष्टी आहेत. मी एकाचवेळी दोन्ही असतो. देशाचे कोणतेही नुकसान जेव्हा कळत नकळत माझ्या हातून घडते तेव्हा मी द्रोही असतोच. केळाचे साल रस्त्यात टाकणे, वरच्या मजल्यावरून केसांचे गुंते फेकणे, लाइनी मोडणे, सिग्नल तोडणे आणि हो अलीकडेच हेल्मेट घालणे हे सारं करताना आपण नकळत द्रोह करतोच. मग देशभक्ती कोणती? तर या सगळ्या सांगितलेल्या गोष्टी नाकारणे, परकीय मालाची होळी करणे, १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारी धडाक्यात साजरी करणे. मग हे सगळे उत्सव करताना बेंबीच्या देठापासून ओरडणे हेही चालूच असते. आपण एखादी गोष्ट ठरवून करून टाकली की शिक्का बसतोच ! म्हणूनच देशभक्त ठरणे आणि असणे हेही विरळच आणि तसाच देशद्रोही ठरविणे कठीणच ! आपल्या महाकाय देशाला हजारो माणसांनी घडवलंय, गंमत पहा, माझा तेलगू, मल्याळम, तामीळ बांधव तिकडे राष्ट्रभक्त म्हणून देशप्रेमाच्या गोष्टी सांगत असतो, ज्या मला कळत नसतात. इकडे मी मराठीत ‘जय भारत’ पुकारत असतो. ते त्याला कळत नसतं. आपण एकाच देशाचे घटक आहोत, मग भगतसिंग असो की चाफेकर बंधू असो, वासुदेव बळवंत फडके असो की बंगालचा बोस असो एकच चिवट धागा आपल्याला जोडून आहे आणि तो म्हणजे भारत देश आणि या देशातील एका विभागाचा मी एक घटक. आपण आपल्या देशाच्या या वैविध्यपूर्ण माहितीचा कधी विचार केला आहे. त्यामुळेच कदाचित कट्टर मुस्लीम आणि देशभक्त मुस्लीम यांच्यात आपल्याला फरक करता येत नाही. आणि त्यामुळेच एकत्वाची भावना कायम साशंक राहते म्हणून ‘भारत माता की जय’ हा फक्त सवाल नाही तर उत्तरच आहे. भारताबद्दल मत मांडताना आपण काय म्हणतो हा प्रश्न आहे.मी म्हणालो, भारत माता की जयत्यांनी माझ्यावर गुलाब उधळलेआणि देशभक्तीचा अंगारा लावला, मी पुढे गेलो आणिपुन्हा म्हणालो, भारत माता की जयत्यांनी काट्यांनी मला रक्तबंबाळ केलेआणि देशद्रोहाची राख फासलीएकाचवेळी द्रोह आणि भक्ती सांभाळणाऱ्यागुलाबाचा मला राग आला आणिमी गुलाबाला खुडले, चिरडले, त्याला चुरगळले आणि बघता बघता भारत माता सुगंधित झाली...मी या देशाचा कोण लागतो? गुलाबाला कुठे बसायचे? कुणाबरोबर जायचे हे कुठे माहीत? त्याला असेपर्यंत फक्त सुगंध उधळीत रहायचे एवढेच माहीत, तरीही गुलाब आपल्याला प्रिय कारण आपण त्याला वाहतो देवाला किंवा टाकतो प्रेतावर. तो दोन्ही ठिकाणी स्थितप्रज्ञ सुगंधी म्हणून नेहरूंच्या कोटाला असलेला गुलाब केरात जातोही! आपण एवढेच, सर्वत्र गुलाब लावायचे, सर्वत्र गुलाब व्हायचे ! ते शक्य झाले की झालो आपण जिंदगीच्या मैफलीचे खरे शिलेदार. खरे गुलाब !-किशोर पाठक