शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

‘परभणी शक्ती’ची श्रीमंती

By गजानन दिवाण | Updated: July 16, 2018 23:18 IST

ज्वारी हे तसे गरिबांचे अन्न. आज ती श्रीमंताच्या ताटात दिसत आहे आणि म्हणूनच गव्हापेक्षाही जास्त भाव खाऊन जात आहे.

ज्वारी हे तसे गरिबांचे अन्न. आज ती श्रीमंताच्या ताटात दिसत आहे आणि म्हणूनच गव्हापेक्षाही जास्त भाव खाऊन जात आहे. आरोग्याच्या दृष्टीने ज्वारीचे महत्त्व गव्हापेक्षा कितीतरी अधिक आहे आणि दिवसेंदिवस ते वाढतेच आहे. ज्वारीत प्रथिनांचे प्रमाण साधारण १० ते १२ टक्के असते. यामुळे पोट साफ राहते. मधुमेहींसाठी ती अधिक उपयोगी असते. शरिरातील अतिरिक्त चरबी, वजन कमी करण्यासाठी ती उपयोगाची समजली जाते. थोडक्यात तुम्हाला ‘फिट’ ठेवण्यासाठी ज्वारी उपयोगी ठरते. म्हणूनच अलिकडच्या काळात ज्वारीची ‘श्रीमंती’ वाढलेली दिसते. हे मूळ पीक आफ्रिकेचे. द्वारका येथे झालेल्या उत्खननात, सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीच्या एका जात्याच्या भागात सापडलेल्या पुराव्यावरून ज्वारीची शेती भारतात प्राचिन काळापासून अस्तित्वात असल्याचे सिद्ध झाले आहे. सध्या जगभरात ज्वारीचे क्षेत्र भारतात पहिल्या क्रमांकाचे आहे. त्यातही ज्वारीचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य म्हणून आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे. रबी हंगामातील शाळू जातीची ज्वारी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात घेतली जाते. तिलाच राज्यातील सर्वोत्तम दर्जा प्राप्त झाला आहे. अशाच उत्तम दर्जाच्या ज्वारीत परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने हैदराबाद येथील इक्रिसॅट संस्थेच्या सहकार्यातून ‘परभणी शक्ती’ची भर घातली आहे. नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे, या उद्देशाने ‘अन्न हेच औषध’ ही संकल्पना समोर ठेवून हे जैवसमृद्ध वाण विकसित करण्यात आले आहे. विद्यापीठाने या वाणाच्या सात वर्षांत तब्बल १२५ चाचण्या घेतल्या. देशात कुपोषण, गरोदर मातांच्या समस्या, रक्तक्षय, महिलांमधील लोहाचे प्रमाण अशा आरोग्याच्या प्रश्नांवर हे वाण उपयुक्त आहे. जस्त आणि लोह अधिक देणारे ‘परभणी शक्ती’ हे ज्वारीचे वाण विद्यापीठाने विकसित केले. पारंपारिक ज्वारीच्या तुलनेत जस्ताचे प्रमाण ४२ ते ४६ मिलीग्रॅम प्रतिकिलो आणि लोहाचे प्रमाण ३० ते ३७ मिलीग्रॅम प्रतिकिलो ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले गेले. केवळ जस्त आणि लोह वाढविणे एवढ्यापुरते मर्यादित न ठेवता हे वाण आरोग्यवर्धक ठरण्याबरोबरच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पैसा कसा मिळवून देईल, या दृष्टीनेही जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले. यातून कडबा १० टक्के अधिक येतो़ या कडब्याचे वजन सरासरी ११० किलो एवढे भरते़ याशिवाय हवामानाचा परिणाम या वाणावर होऊ नये तसेच किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासही सक्षम असलेले हे वाण विकसित करण्यात विद्यापीठाला यश आले आहे. ज्वारीला मागणी वाढत असली तरी गेल्या काही वर्षांत मराठवाड्यात ज्वारीचे पीक झपाट्याने कमी का होत आहे, हे कळायला मार्ग नाही. मात्र, या जैवसमृद्ध वाणामुळे ज्वारीचे क्षेत्र घटण्याची चिंताही दूर होईल, असा आशावाद आहे. गरज आहे ती या वाणाचा प्रचार आणि प्रसार होण्याची. तो कसा होतो, यावरच त्याची बाजारातील ‘श्रीमंती’ अवलंबून असणार आहे.