शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतिकारी संशोधन!

By admin | Updated: May 20, 2017 03:04 IST

विसाव्या शतकात खनिज तेलाने जगाची ऊर्जेची गरज भागवली. एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या दोन दशकातही खनिज तेल हाच ऊर्जेचा मुख्य स्रोत राहिला आहे आणि आणखी

विसाव्या शतकात खनिज तेलाने जगाची ऊर्जेची गरज भागवली. एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या दोन दशकातही खनिज तेल हाच ऊर्जेचा मुख्य स्रोत राहिला आहे आणि आणखी काही दशके तरी हीच स्थिती कायम राहणार आहे; मात्र हे शतक संपता संपता मानवाला ऊर्जेचा पर्यायी स्रोत शोधावाच लागणार आहे. खनिज तेलाचे साठे संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याने, ते संपण्यापूर्वी दुसरा ऊर्जास्रोत शोधणे अपरिहार्य आहे. संशोधकांनी त्यासाठी हायड्रोजन वायूवर लक्ष केंद्रित केले आहे. पृथ्वीच्या वातावरणात हायड्रोजन वायू अत्यल्प प्रमाणात आहे; मात्र पृथ्वीचा तीन-चतुर्थांश भाग व्यापून टाकलेल्या पाण्याचा तो प्रमुख घटक आहे. हायड्रोजनचे दोन अणू आणि आॅक्सिजनचा एक अणू यांच्या रासायनिक प्रक्रियेतून तयार होणारे संयुग म्हणजे पाणी! थोडक्यात काय, तर पाण्यातून हायड्रोजन वेगळा करता आल्यास, अत्यंत स्वच्छ, मुबलक व स्वस्त इंधन उपलब्ध होऊ शकते; मात्र अडचण ही आहे, की पाण्यापासून हायड्रोजन वेगळा करण्याच्या उपलब्ध प्रक्रिया एक तर अत्यंत खर्चिक आहेत किंवा त्यासाठी लागणारी ऊर्जा, प्राप्त होणाऱ्या हायड्रोजनपासून मिळणाऱ्या ऊर्जेपेक्षा जास्त असते. त्यामुळे या प्रक्रिया करून हायड्रोजन मिळविणे आणि तो ऊर्जास्रोत म्हणून वापरणे, हा आतबट्ट्याचा व्यवहार ठरतो. त्यामुळे गत अनेक वर्षांपासून, पाण्यातून स्वस्त व जलदगतीने हायड्रोजन वेगळा कसा करता येईल, यावर संशोधकांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या प्रयत्नांना पहिले यश लाभल्याची सुखद बातमी अमेरिकेतील हुस्टन विद्यापीठातून आली आहे. त्या विद्यापीठातील भौतिक शास्त्रज्ञांनी पाण्यापासून हायड्रोजन वेगळा करण्याची एक कार्यक्षम प्रक्रिया शोधून काढली आहे. पाण्याचे हायड्रोजन व आॅक्सिजनमध्ये विभाजन करण्यासाठी, प्रत्येक वायूसाठी एक याप्रमाणे दोन प्रक्रिया कराव्या लागतात. त्यापैकी आॅक्सिजन वेगळा करण्यासाठी कार्यक्षम उत्प्रेरक शोधण्यात शास्त्रज्ञांना आजवर यश मिळाले नव्हते. हुस्टन विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना नेमके तसे उत्प्रेरक शोधून काढण्यात यश लाभले आहे. हे उत्प्रेरक सध्या वापरात असलेल्या उत्प्रेरकांच्या तुलनेत अत्यंत कार्यक्षमरीत्या आॅक्सिजन वेगळा करण्यात सक्षम आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते स्वस्त पडेल, असा हुस्टन विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचा दावा आहे. विशेष म्हणजे, त्यांनी शोधलेल्या प्रक्रियेत कार्बनही निर्माण होत नाही. हे संशोधन ‘सुफळ संपूर्ण’ झाल्यास ऊर्जेची प्रत्येक गरज पाण्यापासून भागविली जाऊ शकेल. विशेष म्हणजे, त्यामुळे पर्यावरणास कोणतीही हानी पोहचणार नाही; कारण ऊर्जा निर्मितीसाठी हायड्रोजनचे ज्वलन करताना त्यापासून कोणतेही घातक वायू निर्माण होत नाहीत, तर केवळ पाणीच निर्माण होते. त्यामुळे हुस्टन विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे संशोधन अत्यंत क्रांतिकारी सिद्ध होणार आहे. ते लवकरात लवकर पूर्णत्वास जाओ, हीच प्रत्येक पर्यावरणप्रेमीची इच्छा असणार आहे!