शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

क्रांतिकारी संशोधन!

By admin | Updated: May 20, 2017 03:04 IST

विसाव्या शतकात खनिज तेलाने जगाची ऊर्जेची गरज भागवली. एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या दोन दशकातही खनिज तेल हाच ऊर्जेचा मुख्य स्रोत राहिला आहे आणि आणखी

विसाव्या शतकात खनिज तेलाने जगाची ऊर्जेची गरज भागवली. एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या दोन दशकातही खनिज तेल हाच ऊर्जेचा मुख्य स्रोत राहिला आहे आणि आणखी काही दशके तरी हीच स्थिती कायम राहणार आहे; मात्र हे शतक संपता संपता मानवाला ऊर्जेचा पर्यायी स्रोत शोधावाच लागणार आहे. खनिज तेलाचे साठे संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याने, ते संपण्यापूर्वी दुसरा ऊर्जास्रोत शोधणे अपरिहार्य आहे. संशोधकांनी त्यासाठी हायड्रोजन वायूवर लक्ष केंद्रित केले आहे. पृथ्वीच्या वातावरणात हायड्रोजन वायू अत्यल्प प्रमाणात आहे; मात्र पृथ्वीचा तीन-चतुर्थांश भाग व्यापून टाकलेल्या पाण्याचा तो प्रमुख घटक आहे. हायड्रोजनचे दोन अणू आणि आॅक्सिजनचा एक अणू यांच्या रासायनिक प्रक्रियेतून तयार होणारे संयुग म्हणजे पाणी! थोडक्यात काय, तर पाण्यातून हायड्रोजन वेगळा करता आल्यास, अत्यंत स्वच्छ, मुबलक व स्वस्त इंधन उपलब्ध होऊ शकते; मात्र अडचण ही आहे, की पाण्यापासून हायड्रोजन वेगळा करण्याच्या उपलब्ध प्रक्रिया एक तर अत्यंत खर्चिक आहेत किंवा त्यासाठी लागणारी ऊर्जा, प्राप्त होणाऱ्या हायड्रोजनपासून मिळणाऱ्या ऊर्जेपेक्षा जास्त असते. त्यामुळे या प्रक्रिया करून हायड्रोजन मिळविणे आणि तो ऊर्जास्रोत म्हणून वापरणे, हा आतबट्ट्याचा व्यवहार ठरतो. त्यामुळे गत अनेक वर्षांपासून, पाण्यातून स्वस्त व जलदगतीने हायड्रोजन वेगळा कसा करता येईल, यावर संशोधकांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या प्रयत्नांना पहिले यश लाभल्याची सुखद बातमी अमेरिकेतील हुस्टन विद्यापीठातून आली आहे. त्या विद्यापीठातील भौतिक शास्त्रज्ञांनी पाण्यापासून हायड्रोजन वेगळा करण्याची एक कार्यक्षम प्रक्रिया शोधून काढली आहे. पाण्याचे हायड्रोजन व आॅक्सिजनमध्ये विभाजन करण्यासाठी, प्रत्येक वायूसाठी एक याप्रमाणे दोन प्रक्रिया कराव्या लागतात. त्यापैकी आॅक्सिजन वेगळा करण्यासाठी कार्यक्षम उत्प्रेरक शोधण्यात शास्त्रज्ञांना आजवर यश मिळाले नव्हते. हुस्टन विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना नेमके तसे उत्प्रेरक शोधून काढण्यात यश लाभले आहे. हे उत्प्रेरक सध्या वापरात असलेल्या उत्प्रेरकांच्या तुलनेत अत्यंत कार्यक्षमरीत्या आॅक्सिजन वेगळा करण्यात सक्षम आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते स्वस्त पडेल, असा हुस्टन विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचा दावा आहे. विशेष म्हणजे, त्यांनी शोधलेल्या प्रक्रियेत कार्बनही निर्माण होत नाही. हे संशोधन ‘सुफळ संपूर्ण’ झाल्यास ऊर्जेची प्रत्येक गरज पाण्यापासून भागविली जाऊ शकेल. विशेष म्हणजे, त्यामुळे पर्यावरणास कोणतीही हानी पोहचणार नाही; कारण ऊर्जा निर्मितीसाठी हायड्रोजनचे ज्वलन करताना त्यापासून कोणतेही घातक वायू निर्माण होत नाहीत, तर केवळ पाणीच निर्माण होते. त्यामुळे हुस्टन विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे संशोधन अत्यंत क्रांतिकारी सिद्ध होणार आहे. ते लवकरात लवकर पूर्णत्वास जाओ, हीच प्रत्येक पर्यावरणप्रेमीची इच्छा असणार आहे!