शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

संकल्प अवयवदानाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 00:21 IST

मृत्यूनंतरही जगण्याची प्रेरणा देणारे महादान म्हणजे अवयवदान. अवयव निकामी झालेल्या रुग्णांसाठी अवयवदान एक आशेचा किरण आहे. अवयवदानातून दुस-यांना जीवनदान देण्याचे पुण्यकर्म कितीही मोठे असले तरी याबाबत मात्र अजूनही व्यापक जनजागृती आवश्यक आहे.

मृत्यूनंतरही जगण्याची प्रेरणा देणारे महादान म्हणजे अवयवदान. अवयव निकामी झालेल्या रुग्णांसाठी अवयवदान एक आशेचा किरण आहे. अवयवदानातून दुस-यांना जीवनदान देण्याचे पुण्यकर्म कितीही मोठे असले तरी याबाबत मात्र अजूनही व्यापक जनजागृती आवश्यक आहे. नागपुरात २०१३ मध्ये केवळ एका ब्रेनडेड व्यक्तीकडून अवयवदान झाले. गेल्या चार वर्षात हा आकडा वाढून १४वर गेला. मात्र यात आणखी भर पडणे आवश्यक आहे. कारण, भारतात दरवर्षी दोन लाख किडनीची (मूत्रपिंड) गरज भासते. मात्र, प्रत्यक्षात पाच ते सहा हजार किडनी उपलब्ध होतात. दरवर्षी ५० हजार लिव्हरची (यकृत) गरज असताना ७५० लिव्हर प्रत्यारोपण होतात. नेत्रदानातही आपण मागे आहोत. नव्या वर्षात प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प केल्यास व आपल्या कुटुंबीयास याची माहिती दिल्यास जीवन-मृत्यूच्या रेषेवरील अवयवाच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो रुग्णांना नवे जीवन मिळू शकेल. भारतीय संस्कृतीत दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, सोबतच अवयवदान व देहदानाला अंधश्रद्धा नामक अविचाराने ग्रासून टाकले आहे. यामुळे दानाच्या तुलनेत अवयवदान हे श्रेष्ठ दान असले तरी लोक हे दान करण्यास टाळतात. एकीकडे अंधश्रद्धेमुळे अवयवदानाविषयी लोकांमध्ये संभ्रम असताना सुशिक्षित माणसे जवळची व्यक्ती गेल्याच्या दु:खात अवयवदानाची जबाबदारी विसरून जातात. तर काही डॉक्टर ब्रेनडेड व्यक्तीच्या नातेवाईकांपासून अवयवदानाची माहिती जाणीवपूर्वक दडवून ठेवतात. याच कारणास्तव अवयवदानाला हवा तसा प्रतिसाद नाही. २०१२ मध्ये शासनाने नागपुरात विभागीय प्रत्यारोपण समिती (झेडटीसीसी) स्थापन करून अवयवदानाच्या चळवळीला गती आणली. परंतु २०१३ ते २०१७ या वर्षापर्यंत २८ ब्रेनडेड व्यक्तींकडून अवयवदान होऊ शकले. २०१८ मध्ये जनजागृतीवर अधिक भर दिल्यास हा आकडा वाढू शकतो. नुकतेच एका मातने आपल्या एकुलत्या एक मुलाच्या दुर्दैवी मृत्यूचे दु:ख बाजूला सारून अवयवदानाला परवानगी दिली. या निर्णयाने तिघांचे प्राण वाचले. मानवी जीवन वाचविण्यासाठी अवयवदानाचे हे महत्त्व घराघरात पोहचणे आवश्यक आहे. ‘मरावे परि कीर्तिरुपे उरावे’. असे म्हणतात. मरणोत्तर अवयवदानामुळे अन्य कुणीतरी हे सुंदर जीवन जगू शकेल. यामुळे आता जनसामान्यांनीच पुढे यावे, घरातील मृत माणसाचे अवयवदान करून समाजात एक नवा आदर्श निर्माण करावा. नुकतेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि कामगार नेत्या मालतीताई रुईकर यांचे निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार देहदान करण्यात आले. ही चळवळही अवयवदानासारखीच गतिमान होणे आवश्यक आहे. आपण नशीबवान आहोत. आपले सर्व अवयव शाबूत आहेत. जे या समस्येला सामोरे जातात त्यांच्या जागी क्षणभर स्वत:ला पाहून विचार करण्याची गरज आहे.

टॅग्स :Organ donationअवयव दानIndiaभारतHealthआरोग्य