शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

संकल्प अवयवदानाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 00:21 IST

मृत्यूनंतरही जगण्याची प्रेरणा देणारे महादान म्हणजे अवयवदान. अवयव निकामी झालेल्या रुग्णांसाठी अवयवदान एक आशेचा किरण आहे. अवयवदानातून दुस-यांना जीवनदान देण्याचे पुण्यकर्म कितीही मोठे असले तरी याबाबत मात्र अजूनही व्यापक जनजागृती आवश्यक आहे.

मृत्यूनंतरही जगण्याची प्रेरणा देणारे महादान म्हणजे अवयवदान. अवयव निकामी झालेल्या रुग्णांसाठी अवयवदान एक आशेचा किरण आहे. अवयवदानातून दुस-यांना जीवनदान देण्याचे पुण्यकर्म कितीही मोठे असले तरी याबाबत मात्र अजूनही व्यापक जनजागृती आवश्यक आहे. नागपुरात २०१३ मध्ये केवळ एका ब्रेनडेड व्यक्तीकडून अवयवदान झाले. गेल्या चार वर्षात हा आकडा वाढून १४वर गेला. मात्र यात आणखी भर पडणे आवश्यक आहे. कारण, भारतात दरवर्षी दोन लाख किडनीची (मूत्रपिंड) गरज भासते. मात्र, प्रत्यक्षात पाच ते सहा हजार किडनी उपलब्ध होतात. दरवर्षी ५० हजार लिव्हरची (यकृत) गरज असताना ७५० लिव्हर प्रत्यारोपण होतात. नेत्रदानातही आपण मागे आहोत. नव्या वर्षात प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प केल्यास व आपल्या कुटुंबीयास याची माहिती दिल्यास जीवन-मृत्यूच्या रेषेवरील अवयवाच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो रुग्णांना नवे जीवन मिळू शकेल. भारतीय संस्कृतीत दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, सोबतच अवयवदान व देहदानाला अंधश्रद्धा नामक अविचाराने ग्रासून टाकले आहे. यामुळे दानाच्या तुलनेत अवयवदान हे श्रेष्ठ दान असले तरी लोक हे दान करण्यास टाळतात. एकीकडे अंधश्रद्धेमुळे अवयवदानाविषयी लोकांमध्ये संभ्रम असताना सुशिक्षित माणसे जवळची व्यक्ती गेल्याच्या दु:खात अवयवदानाची जबाबदारी विसरून जातात. तर काही डॉक्टर ब्रेनडेड व्यक्तीच्या नातेवाईकांपासून अवयवदानाची माहिती जाणीवपूर्वक दडवून ठेवतात. याच कारणास्तव अवयवदानाला हवा तसा प्रतिसाद नाही. २०१२ मध्ये शासनाने नागपुरात विभागीय प्रत्यारोपण समिती (झेडटीसीसी) स्थापन करून अवयवदानाच्या चळवळीला गती आणली. परंतु २०१३ ते २०१७ या वर्षापर्यंत २८ ब्रेनडेड व्यक्तींकडून अवयवदान होऊ शकले. २०१८ मध्ये जनजागृतीवर अधिक भर दिल्यास हा आकडा वाढू शकतो. नुकतेच एका मातने आपल्या एकुलत्या एक मुलाच्या दुर्दैवी मृत्यूचे दु:ख बाजूला सारून अवयवदानाला परवानगी दिली. या निर्णयाने तिघांचे प्राण वाचले. मानवी जीवन वाचविण्यासाठी अवयवदानाचे हे महत्त्व घराघरात पोहचणे आवश्यक आहे. ‘मरावे परि कीर्तिरुपे उरावे’. असे म्हणतात. मरणोत्तर अवयवदानामुळे अन्य कुणीतरी हे सुंदर जीवन जगू शकेल. यामुळे आता जनसामान्यांनीच पुढे यावे, घरातील मृत माणसाचे अवयवदान करून समाजात एक नवा आदर्श निर्माण करावा. नुकतेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि कामगार नेत्या मालतीताई रुईकर यांचे निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार देहदान करण्यात आले. ही चळवळही अवयवदानासारखीच गतिमान होणे आवश्यक आहे. आपण नशीबवान आहोत. आपले सर्व अवयव शाबूत आहेत. जे या समस्येला सामोरे जातात त्यांच्या जागी क्षणभर स्वत:ला पाहून विचार करण्याची गरज आहे.

टॅग्स :Organ donationअवयव दानIndiaभारतHealthआरोग्य