शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
9
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
10
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
11
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
12
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
13
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
14
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
15
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
16
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
17
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
18
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
19
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
20
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई

संमेलनातील ठराव!

By admin | Updated: February 6, 2017 00:06 IST

सध्या डोंबिवलीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. गेल्या आठवड्यात अकोल्यात राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाचे सूप वाजले.

सध्या डोंबिवलीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. गेल्या आठवड्यात अकोल्यात राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाचे सूप वाजले. फेब्रुवारीअखेर गडचिरोलीमध्ये अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन होऊ घातले आहे. हल्ली दर महिना-दोन महिन्यांनी कुठे तरी साहित्य संमेलन होत असते. साहित्य व साहित्यिकांचा उत्सव साजरा व्हावा, त्यामध्ये विविध विषयांवर मंथन व्हावे याबाबत दुमत नाही; पण साहित्य संमेलनांची जेवढी संख्यात्मक वाढ झाली, तेवढीच गुणात्मक वाढ झाली आहे का, याचाही विचार झाला पाहिजे. या साहित्य संमेलनामध्ये ज्या विषयांवर चर्चा होते, त्या चर्चांमधून समाजाला, सत्ताधाऱ्यांना संदेश देण्याचा प्रयत्न होतो; मात्र एकाच दिवशी पार पडणाऱ्या चार ते पाच परिसंवादांमधून असा संदेश प्रसृत होण्याऐवजी, केवळ संमेलनाचा उत्सवी उपचार तेवढा पार पडतो असा आक्षेप इतर कुणाकडून नव्हे, तर साहित्य क्षेत्रातील धुरिणांकडूनच घेतला गेला आहे. सर्व साहित्य संमेलनामध्ये ग्रंथदिंडी व ठराव या दोन गोष्टी समान असतात. अलीकडे ग्रंथदिंडीमध्ये इतर ग्रंथांसोबतच लोकशाहीची मूल्ये रुजविणाऱ्या राज्यघटनेलाही सन्मानाने स्थान दिले जाते, ही बाब गौरवास्पद; मात्र साहित्य संमेलनांमध्ये पारित होणाऱ्या ठरावांची दखल घेतली जाते का, यावर विचारमंथन झाले पाहिजे. साहित्य संमेलनातील ठराव व त्यांचे भवितव्य हा विषय तसा नवा नाही. या विषयावर अनेकदा भाष्य झाले आहे; मात्र उत्तर मिळाले नाही. साहित्य संमेलनात पारित होणारे ठराव हे समाजमनाचा विचार बोलून दाखविणारे ठराव असतात. त्यामुळे या ठरावांची दखल घेऊन त्या अनुषंगाने राज्यकर्त्यांनी धोरण ठरविणे, उपाययोजना करणे अभिप्रेत आहे. प्रत्यक्षात मात्र हे ठराव म्हणजे केवळ औपचारिकता झाली आहे. ठरावांच्या अंमलबजावणीचे सोडा; पण त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी कुठलीही यंत्रणा साहित्य क्षेत्रातील संस्थांनी एवढ्या वर्षांत विकसित केलेली नाही. सत्तेमधील जे धुरीण संमेलनाला उपस्थित राहतात, तेदेखील संमेलनात पारित झालेल्या ठरावांची दखल घेण्याऐवजी, संमेलनाच्या माध्यमातून आपलेच वलय वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करतात. बदलत्या काळात मराठी भाषा, भाषिक व साहित्य क्षेत्र यांच्यासमोर नवी आव्हाने उभी आहेत. या आव्हानांचा मागोवा प्रत्येक संमेलनाध्यक्ष त्यांच्या भाषणामध्ये घेतो. काही उपायांचे सूतोवाचही केले जाते; मात्र त्या उपायांची चर्चा जशी भाषणांपुरती मर्यादित राहते, तसेच ठरावांच्या बाबतीत होते. नवा विचार समाजात पेरण्याचा प्रयत्न करण्याचा दावा करणाऱ्या अशा संमेलनांमध्ये, आपल्याच संमेलनांच्या ठरावांसारख्या औपचारिक परंपरांचा मागोवा घेत, नवी परंपरा सुरू केली तर ती संमेलनांसाठी ‘अक्षय’ ठरू शकेल!