शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

संमेलनातील ठराव!

By admin | Updated: February 6, 2017 00:06 IST

सध्या डोंबिवलीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. गेल्या आठवड्यात अकोल्यात राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाचे सूप वाजले.

सध्या डोंबिवलीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. गेल्या आठवड्यात अकोल्यात राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाचे सूप वाजले. फेब्रुवारीअखेर गडचिरोलीमध्ये अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन होऊ घातले आहे. हल्ली दर महिना-दोन महिन्यांनी कुठे तरी साहित्य संमेलन होत असते. साहित्य व साहित्यिकांचा उत्सव साजरा व्हावा, त्यामध्ये विविध विषयांवर मंथन व्हावे याबाबत दुमत नाही; पण साहित्य संमेलनांची जेवढी संख्यात्मक वाढ झाली, तेवढीच गुणात्मक वाढ झाली आहे का, याचाही विचार झाला पाहिजे. या साहित्य संमेलनामध्ये ज्या विषयांवर चर्चा होते, त्या चर्चांमधून समाजाला, सत्ताधाऱ्यांना संदेश देण्याचा प्रयत्न होतो; मात्र एकाच दिवशी पार पडणाऱ्या चार ते पाच परिसंवादांमधून असा संदेश प्रसृत होण्याऐवजी, केवळ संमेलनाचा उत्सवी उपचार तेवढा पार पडतो असा आक्षेप इतर कुणाकडून नव्हे, तर साहित्य क्षेत्रातील धुरिणांकडूनच घेतला गेला आहे. सर्व साहित्य संमेलनामध्ये ग्रंथदिंडी व ठराव या दोन गोष्टी समान असतात. अलीकडे ग्रंथदिंडीमध्ये इतर ग्रंथांसोबतच लोकशाहीची मूल्ये रुजविणाऱ्या राज्यघटनेलाही सन्मानाने स्थान दिले जाते, ही बाब गौरवास्पद; मात्र साहित्य संमेलनांमध्ये पारित होणाऱ्या ठरावांची दखल घेतली जाते का, यावर विचारमंथन झाले पाहिजे. साहित्य संमेलनातील ठराव व त्यांचे भवितव्य हा विषय तसा नवा नाही. या विषयावर अनेकदा भाष्य झाले आहे; मात्र उत्तर मिळाले नाही. साहित्य संमेलनात पारित होणारे ठराव हे समाजमनाचा विचार बोलून दाखविणारे ठराव असतात. त्यामुळे या ठरावांची दखल घेऊन त्या अनुषंगाने राज्यकर्त्यांनी धोरण ठरविणे, उपाययोजना करणे अभिप्रेत आहे. प्रत्यक्षात मात्र हे ठराव म्हणजे केवळ औपचारिकता झाली आहे. ठरावांच्या अंमलबजावणीचे सोडा; पण त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी कुठलीही यंत्रणा साहित्य क्षेत्रातील संस्थांनी एवढ्या वर्षांत विकसित केलेली नाही. सत्तेमधील जे धुरीण संमेलनाला उपस्थित राहतात, तेदेखील संमेलनात पारित झालेल्या ठरावांची दखल घेण्याऐवजी, संमेलनाच्या माध्यमातून आपलेच वलय वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करतात. बदलत्या काळात मराठी भाषा, भाषिक व साहित्य क्षेत्र यांच्यासमोर नवी आव्हाने उभी आहेत. या आव्हानांचा मागोवा प्रत्येक संमेलनाध्यक्ष त्यांच्या भाषणामध्ये घेतो. काही उपायांचे सूतोवाचही केले जाते; मात्र त्या उपायांची चर्चा जशी भाषणांपुरती मर्यादित राहते, तसेच ठरावांच्या बाबतीत होते. नवा विचार समाजात पेरण्याचा प्रयत्न करण्याचा दावा करणाऱ्या अशा संमेलनांमध्ये, आपल्याच संमेलनांच्या ठरावांसारख्या औपचारिक परंपरांचा मागोवा घेत, नवी परंपरा सुरू केली तर ती संमेलनांसाठी ‘अक्षय’ ठरू शकेल!