शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

संमेलनातील ठराव!

By admin | Updated: February 6, 2017 00:06 IST

सध्या डोंबिवलीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. गेल्या आठवड्यात अकोल्यात राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाचे सूप वाजले.

सध्या डोंबिवलीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. गेल्या आठवड्यात अकोल्यात राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाचे सूप वाजले. फेब्रुवारीअखेर गडचिरोलीमध्ये अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन होऊ घातले आहे. हल्ली दर महिना-दोन महिन्यांनी कुठे तरी साहित्य संमेलन होत असते. साहित्य व साहित्यिकांचा उत्सव साजरा व्हावा, त्यामध्ये विविध विषयांवर मंथन व्हावे याबाबत दुमत नाही; पण साहित्य संमेलनांची जेवढी संख्यात्मक वाढ झाली, तेवढीच गुणात्मक वाढ झाली आहे का, याचाही विचार झाला पाहिजे. या साहित्य संमेलनामध्ये ज्या विषयांवर चर्चा होते, त्या चर्चांमधून समाजाला, सत्ताधाऱ्यांना संदेश देण्याचा प्रयत्न होतो; मात्र एकाच दिवशी पार पडणाऱ्या चार ते पाच परिसंवादांमधून असा संदेश प्रसृत होण्याऐवजी, केवळ संमेलनाचा उत्सवी उपचार तेवढा पार पडतो असा आक्षेप इतर कुणाकडून नव्हे, तर साहित्य क्षेत्रातील धुरिणांकडूनच घेतला गेला आहे. सर्व साहित्य संमेलनामध्ये ग्रंथदिंडी व ठराव या दोन गोष्टी समान असतात. अलीकडे ग्रंथदिंडीमध्ये इतर ग्रंथांसोबतच लोकशाहीची मूल्ये रुजविणाऱ्या राज्यघटनेलाही सन्मानाने स्थान दिले जाते, ही बाब गौरवास्पद; मात्र साहित्य संमेलनांमध्ये पारित होणाऱ्या ठरावांची दखल घेतली जाते का, यावर विचारमंथन झाले पाहिजे. साहित्य संमेलनातील ठराव व त्यांचे भवितव्य हा विषय तसा नवा नाही. या विषयावर अनेकदा भाष्य झाले आहे; मात्र उत्तर मिळाले नाही. साहित्य संमेलनात पारित होणारे ठराव हे समाजमनाचा विचार बोलून दाखविणारे ठराव असतात. त्यामुळे या ठरावांची दखल घेऊन त्या अनुषंगाने राज्यकर्त्यांनी धोरण ठरविणे, उपाययोजना करणे अभिप्रेत आहे. प्रत्यक्षात मात्र हे ठराव म्हणजे केवळ औपचारिकता झाली आहे. ठरावांच्या अंमलबजावणीचे सोडा; पण त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी कुठलीही यंत्रणा साहित्य क्षेत्रातील संस्थांनी एवढ्या वर्षांत विकसित केलेली नाही. सत्तेमधील जे धुरीण संमेलनाला उपस्थित राहतात, तेदेखील संमेलनात पारित झालेल्या ठरावांची दखल घेण्याऐवजी, संमेलनाच्या माध्यमातून आपलेच वलय वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करतात. बदलत्या काळात मराठी भाषा, भाषिक व साहित्य क्षेत्र यांच्यासमोर नवी आव्हाने उभी आहेत. या आव्हानांचा मागोवा प्रत्येक संमेलनाध्यक्ष त्यांच्या भाषणामध्ये घेतो. काही उपायांचे सूतोवाचही केले जाते; मात्र त्या उपायांची चर्चा जशी भाषणांपुरती मर्यादित राहते, तसेच ठरावांच्या बाबतीत होते. नवा विचार समाजात पेरण्याचा प्रयत्न करण्याचा दावा करणाऱ्या अशा संमेलनांमध्ये, आपल्याच संमेलनांच्या ठरावांसारख्या औपचारिक परंपरांचा मागोवा घेत, नवी परंपरा सुरू केली तर ती संमेलनांसाठी ‘अक्षय’ ठरू शकेल!